शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडच्या २२ महाविद्यालयांचे प्रवेश रोखले, येत्या शैक्षणिक वर्षापासून कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:10 IST

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आदेश पाळण्यात संस्थेला अपयश आल्याने अखेर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्यांच्या सर्व २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आदेश पाळण्यात संस्थेला अपयश आल्याने अखेर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्यांच्या सर्व २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे वडगाव, नºहे, कोंढवा, वारजे, लोणावळा, सोलापूर आदी ठिकाणी २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ३ हजार प्राध्यापक व ५ हजार शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाºयांचे १५ महिन्यांपासून वेतन रखडले आहे. या पार्श्वभूमीवर एआयसीटीईकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ३१ जानेवारी २०१८च्या आत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले होते; मात्र त्याचे पालन करण्यात सिंहगड संस्थेला अपयश आल्याने अखेर त्यांच्या सर्व २२ महाविद्यालयांमधील प्रवेशाचा इंटक शून्य करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला असून, त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाकडून येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन आॅक्टोबर २०१६ पासून रखडले आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन खर्च, दवाखाना, घरभाडे किंवा बँकेचे हप्ते कसे भरायचे, असे प्रश्न या शिक्षकांपुढे आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या कुचंबणेचा सामना करावा लागत आहे. एआयसीटीईच्या निर्णयानंतर तरी ३१ जानेवारीपर्यंत वेतन जमा होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना होती; मात्र तीदेखील फोल ठरली आहे.एआयसीटीईने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संस्थेवर प्रशासक नेमून महाविद्यालयांचा कारभार सुरळीत करावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर, शिक्षकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तीत न्यायालयाकडून दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.>सध्या शिकणाºया विद्यार्थ्यांचे काय ?एआयसीटीईने येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या द्वितीय, तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.शिक्षकांनी अनेक दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारलेले आहे. त्यामुळे संस्थेचा पुढील दैनंदिन कारभार सांभाळण्यासाठी प्रशासक नेमावा किंवा शिक्षकांच्या समितीला महाविद्यालय चालविण्यास द्यावे, अशी मागणी केली जात आहे.>एआयसीटीईच्यानिर्णयाची अंमलबजावणीएआयसीटीईने सिंहगड संस्थेच्या २२ महाविद्यालयांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा इंटक शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाकडून येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.- अभय वाघ, संचालक,तंत्र शिक्षण विभाग