शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाणीपट्टीवाढ विरोधात गदारोळ

By admin | Updated: February 17, 2016 01:40 IST

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीमध्ये पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्याने ८७ टक्के

पुणे : शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीमध्ये पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्याने ८७ टक्के, त्यापुढील २५ वर्षे सलग ५ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. मनसेने निषेधार्थ काळे कपडे परिधान करून, तर शिवसेनेने वारकऱ्यांच्या वेषात टाळ वाजवीत पाणीपट्टीवाढीचा विरोध केला. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या पाणीपट्टीवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सभा सुरू करताच शिवसेना, मनसेच्या सभासदांनी त्यांच्यासमोरील जागेत धाव घेऊन पाणीपट्टीवाढ विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या सदस्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर महापौरांनी सर्वांना जागेवर बसण्याचे आदेश दिल्यानंतर सभागृहात प्रस्तावावर चर्चा सुरू झाली.अभय छाजेड म्हणाले, ‘आयुक्तांनी कोणत्या कलमाखाली हा प्रस्ताव आणला आहे. कलम ९९ खाली केवळ एक वर्षासाठी करवाढ करता येते; मग २०४७ पर्यंत करवाढीचा प्रस्ताव का ठेवला आहे?’प्रशासनाला २०४७ पर्यंतची पाणीपट्टीवाढ करण्याचा अधिकार नाही. झोपडपट्टी भागातील लोकांच्या घरात पाणी भरून ठेवण्यासाठी हंडे नाहीत. त्यांनी टट्ी भरायची कुठून, असा सवाल कमल व्यवहारे यांनी केला. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘मलकापूर येथे मीटरने पाणीपुरवठा होत असल्यामुळे तिथे अत्यंत काळपूर्वक पाणी वापरले जात असल्याचे आम्हांला दिसून आले.’ बाबुराव चांदेरे म्हणाले, ‘शहराला २४ तास पाणीपुरवठा होणे ही काळाजी गरज आहे. चेतन तुपे, सुभाष जगताप, धनंजय जाधव,अविनाश बागवे,सचिन भगत, संजय भोसले,महेंद्र पठारे,अनिता वागस्कर,दत्ता बहिरट,वसंत मोरे,बाळा शेडगे,अशोक येनपुरे,पृथ्वीराज सुतार, अस्मिता शिंदे, किशोर शिंदे, दिलीप बराटे, वसंत मोरे,संजय बालगुडे यांनीही विचार मांडले.२४ तास पाणीपुरवठा योजनेच्या फायद्याबद्दल कोणीच बोलत नाहीत. आपले ४ टीएमसी पाणी वाचणार आहे. एका धरणाएवढी आपली क्षमता वाढते आहे. पाण्याच्या १६१८ किलोमीटर पाइपलाइन होणार आहेत. यामुळे या योजनेला मंजुरी द्यावी.’ - बंडू केमसे, सभागृह नेते पाणीपट्टीवाढीच्या डॉकेटलाच आमचा विरोध आहे. हे डॉकेट नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. ३० वर्षांसाठी तुम्हांला करवाढ लावता येत नाही. कलम ९९ नुसार केवळ सरकारी वर्षापुरतीच करवाढ करता येते. आयुक्तांच्या प्रस्तावानुसार ३० वर्षांत पाणीपट्टीमध्ये २३२ टक्के वाढ होणार आहे. फक्त पाणीपट्टीवाढ नाही, तर मलनिस्सारण करातदेखील वाढ सुचविली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही दरवाढ आणताय त्याला आमचा विरोध आहे.’- अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते ‘राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने मिळून पुणेकरांचे पाकीट मारायचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाणीपट्टीवाढ विरोधात नागरिकांची मते जाणून घेतली. त्यांनी कळकळीने त्यावर मते व्यक्त केली आहेत.’- बाबू वागस्कर, मनसेचे गटनेते