शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:46 IST

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब

दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील बंधाºयाची गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. पाटबंधारे विभागाने गळती रोखण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, या बंधाऱ्यातून हजारो लिटर रोज पाण्याची नासाडी होत आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणी वाया जात असल्याचे शेतकरी आरोप करीत आहेत.

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरला आहे. या बंधाºयाच्या पाण्यावर खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मलघेवाडी, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म) या परिसरातील शेतकरी शेकडो एकर हेक्टर क्षेत्रावर रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके घेत असतो. महिन्यापूर्वी या बंधाºयाला लोखंडी ढापे बसवण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाने यंदा काळजीपूर्वक लोखंडी ढापे बसवण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी जीर्ण झालेले ढापे बसवण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून सतत पाण्यात राहिल्याने लोखंडी ढाप्यांना गंज चढला आहे. तसेच पत्रा सडला असून मोठी मोठी छिद्रे पडली असून त्या वाटून पाण्याचे फवारे उडत आहेत. तसेच काही ठिकाणी गाळ्यांचे दगड निखळले आहेत.पाटबंधारे विभागाने मागील वर्षी सत्तर लोखंडी ढापे नवीन आणले होते. पण ते अपूर्ण ठरले. यंदा पाटबंधारे विभागाने नवीन आणि जुने ढापे बसविले. मात्र, जीर्ण झालेल्या ढाप्यांवाटे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.बंधाºयाचा निखळला होता ढापामागील आठवड्यात बंधाºयाचा एक ढापा पाण्याचा दाब वाढल्याने निखळला होता. त्या निखळलेल्या ढाप्याद्वारे दोन दिवस लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाने घाईघाईने या ढाप्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंधाºयाच्या एका गाळ्याला पोत्यात झाडपाल्याची पाने घालून ही पोती निखळलेल्या ढाप्याला लावण्यात आली.मात्र, गळती थांबली नाही, या बंधाºयाला टाकलेल्या सर्व गाळ्यातील ढाप्यांमधून पाण्याची गळती सुरू आहे. एका ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. लोखंडी ढापे बसवण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंट वाहून गेले आहे.ही गळती अशीच सुरू राहिली तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. तसेच यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने चासकमान धरणाचेही पाणी मिळेल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही होणारी पाण्याची गळती रोखणे गरजेचे बनले असून पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून पाटबंधारे विभागाने काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे