शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:46 IST

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब

दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील बंधाºयाची गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. पाटबंधारे विभागाने गळती रोखण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, या बंधाऱ्यातून हजारो लिटर रोज पाण्याची नासाडी होत आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणी वाया जात असल्याचे शेतकरी आरोप करीत आहेत.

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरला आहे. या बंधाºयाच्या पाण्यावर खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मलघेवाडी, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म) या परिसरातील शेतकरी शेकडो एकर हेक्टर क्षेत्रावर रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके घेत असतो. महिन्यापूर्वी या बंधाºयाला लोखंडी ढापे बसवण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाने यंदा काळजीपूर्वक लोखंडी ढापे बसवण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी जीर्ण झालेले ढापे बसवण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून सतत पाण्यात राहिल्याने लोखंडी ढाप्यांना गंज चढला आहे. तसेच पत्रा सडला असून मोठी मोठी छिद्रे पडली असून त्या वाटून पाण्याचे फवारे उडत आहेत. तसेच काही ठिकाणी गाळ्यांचे दगड निखळले आहेत.पाटबंधारे विभागाने मागील वर्षी सत्तर लोखंडी ढापे नवीन आणले होते. पण ते अपूर्ण ठरले. यंदा पाटबंधारे विभागाने नवीन आणि जुने ढापे बसविले. मात्र, जीर्ण झालेल्या ढाप्यांवाटे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.बंधाºयाचा निखळला होता ढापामागील आठवड्यात बंधाºयाचा एक ढापा पाण्याचा दाब वाढल्याने निखळला होता. त्या निखळलेल्या ढाप्याद्वारे दोन दिवस लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाने घाईघाईने या ढाप्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंधाºयाच्या एका गाळ्याला पोत्यात झाडपाल्याची पाने घालून ही पोती निखळलेल्या ढाप्याला लावण्यात आली.मात्र, गळती थांबली नाही, या बंधाºयाला टाकलेल्या सर्व गाळ्यातील ढाप्यांमधून पाण्याची गळती सुरू आहे. एका ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. लोखंडी ढापे बसवण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंट वाहून गेले आहे.ही गळती अशीच सुरू राहिली तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. तसेच यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने चासकमान धरणाचेही पाणी मिळेल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही होणारी पाण्याची गळती रोखणे गरजेचे बनले असून पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून पाटबंधारे विभागाने काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे