शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:46 IST

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब

दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील बंधाºयाची गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. पाटबंधारे विभागाने गळती रोखण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, या बंधाऱ्यातून हजारो लिटर रोज पाण्याची नासाडी होत आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणी वाया जात असल्याचे शेतकरी आरोप करीत आहेत.

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरला आहे. या बंधाºयाच्या पाण्यावर खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मलघेवाडी, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म) या परिसरातील शेतकरी शेकडो एकर हेक्टर क्षेत्रावर रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके घेत असतो. महिन्यापूर्वी या बंधाºयाला लोखंडी ढापे बसवण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाने यंदा काळजीपूर्वक लोखंडी ढापे बसवण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी जीर्ण झालेले ढापे बसवण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून सतत पाण्यात राहिल्याने लोखंडी ढाप्यांना गंज चढला आहे. तसेच पत्रा सडला असून मोठी मोठी छिद्रे पडली असून त्या वाटून पाण्याचे फवारे उडत आहेत. तसेच काही ठिकाणी गाळ्यांचे दगड निखळले आहेत.पाटबंधारे विभागाने मागील वर्षी सत्तर लोखंडी ढापे नवीन आणले होते. पण ते अपूर्ण ठरले. यंदा पाटबंधारे विभागाने नवीन आणि जुने ढापे बसविले. मात्र, जीर्ण झालेल्या ढाप्यांवाटे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.बंधाºयाचा निखळला होता ढापामागील आठवड्यात बंधाºयाचा एक ढापा पाण्याचा दाब वाढल्याने निखळला होता. त्या निखळलेल्या ढाप्याद्वारे दोन दिवस लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाने घाईघाईने या ढाप्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंधाºयाच्या एका गाळ्याला पोत्यात झाडपाल्याची पाने घालून ही पोती निखळलेल्या ढाप्याला लावण्यात आली.मात्र, गळती थांबली नाही, या बंधाºयाला टाकलेल्या सर्व गाळ्यातील ढाप्यांमधून पाण्याची गळती सुरू आहे. एका ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. लोखंडी ढापे बसवण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंट वाहून गेले आहे.ही गळती अशीच सुरू राहिली तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. तसेच यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने चासकमान धरणाचेही पाणी मिळेल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही होणारी पाण्याची गळती रोखणे गरजेचे बनले असून पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून पाटबंधारे विभागाने काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे