शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

तीन वर्षांत शिक्षण मंडळाकडून पुस्तक खरेदीच नाही

By admin | Updated: January 3, 2016 04:38 IST

शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या ‘अवांतर वाचना’साठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून गेल्या ३ वर्षांत एकाही पुस्तकाची खरेदी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात

पुणे : शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या ‘अवांतर वाचना’साठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून गेल्या ३ वर्षांत एकाही पुस्तकाची खरेदी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. दरवर्षी तीनशे कोटी खर्च करणाऱ्या मंडळाकडून या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने शहरामध्ये ३०० शाळा चालविल्या जातात, यामध्ये ८० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंडळातील शिक्षकांचा पगार, पायाभूत सुविधा व इतर उपक्रमांसाठी दरवर्षी त्यांना महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. नुकत्याच शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ या वर्षीच्या ३४१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली. शिक्षण मंडळाच्या या अंदाजपत्रकाची पडताळणी करीत असताना शिक्षण मंडळाकडून अवांतर वाचनासाठी गेल्या ३ वर्षांत पुस्तकांची खरेदीच करण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. २०१६-१७ च्या अंदाजपत्रकामध्ये पुस्तक खरेदीसाठी आयुक्तांनी ३० लाख रुपयांची तरतूद सुचविली होती, मात्र स्थायी समितीने त्यामध्ये कपात करून ती १० लाखांवर आणली आहे.शिक्षण मंडळाने २०१२-१३, १४-१५ या वर्षात पुस्तकांवर एका रुपयाचाही खर्च केला नाही. २०१५-१६ मध्ये अंदाजपत्रकामध्ये पुस्तक खरेदीसाठी साडेआठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यामधून किती रुपयांच्या पुस्तकांची खरेदी झाली आहे, याची आकडेवारी अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. मनसेचे सभासद बाळा शेडगे यांनी अवांतर वाचनाच्या पुस्तक खरेदीबाबत शिक्षण मंडळाकडून दाखविण्यात येत असलेल्या अनास्थेबाबात टीका केली. औपचारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागणे आवश्यक आहे. त्याकरिता शिक्षण मंडळाकडून योग्य प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता सभासदांनी व्यक्त केली. ...म्हणून ते पुस्तक खरेदी करीत नसावेतमुख्याध्यापकांची बदली झाली किंवा ते निवृत्त झाल्यानंतर त्यांना सर्व पुस्तकांचा हिशेब द्यावा लागतो. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पुस्तके वाचायला देतच नाहीत. सर्व पुस्तके कपाटात कुलूप लावून बंद स्थितीमध्ये ठेवली जातात, असा आरोप काँग्रेसचे सभासद रवींद्र माळवदकर यांनी केला. मात्र मुख्याध्यापकांनी पुस्तकांचा हिशेब देण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी त्याचा वापर होऊन ती जितकी फाटतील तितके योग्य राहील, असा ठराव शिक्षण मंडळामध्ये करण्यात आला असल्याचे बाळा शेडगे यांनी या वेळी स्पष्ट केले.