शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

चांदूस-कोरेगाव रस्त्याचे तीन तेरा

By admin | Updated: May 1, 2017 02:10 IST

विमानतळ होणार म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या आणि जमिनीला लाख मोलाचा भाव आलेल्या चांदूस-कोरेगाव या

आंबेठाण : विमानतळ होणार म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या आणि जमिनीला लाख मोलाचा भाव आलेल्या चांदूस-कोरेगाव या गावांना जोडणा-या रस्त्याची अवस्था आता मात्र अतिशय दयनीय झाली आहे. एरवी विमानतळ येणार म्हणून चर्चेत असणारी हीच गावे आता खराब रस्त्यांची गावे म्हणून ओळखू लागली आहेत. काही ठिकाणी पडलेले फुटभर खोल खड्डे, रस्त्याच्या तुटलेल्या कडा आणि विस्तारलेली खडी असेच या रस्त्याचे वर्णन करावे लागेल.याशिवाय अनेक वेळा मोठ्या गाड्यांच्या टायरने अशी वर आलेली खडी जोरात उडते आणि मग त्यामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक, रस्त्याने प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि पायी प्रवास करणा-या नागरिकांना विनाकारण अशी खडी लागून त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तर या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून त्यामुळे अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहे. अनेक वेळा या खड्ड्याचा अंदाज न आल्याने या खड्ड्यात वाहने पडून अपघात झाले आहे. त्यामुळे पुन्हा अशी अपघाताची घटना घडू नये म्हणून आजूबाजूच्या नागरिकांनी तर या खड्ड्यात मोठाले दगड टाकले असून त्यावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत जेणेकरून हा खड्डा लोकांना समजावा. अशी भयानक अवस्था या रस्त्याची झाली आहे.या रस्त्याचा प्रमुख वापर हा शालेय विद्यार्थी आणि शेतकरी वगार्ला होत आहे. तालुक्याच्या गावाला जोडणारा हा रस्ता असल्याने अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे. दुचाकी वाहने तर या रस्त्याने प्रवास करून पार खिळखिळी झाली असून दररोज प्रवास करणा?्या नागरिकांचे तर या रस्त्याने प्रवास करून कंबरडे मोडण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चांदूस ते कोरेगाव बुद्रुक या अंतरापैकी चांदूस येथील हायस्कूल ते कोरेगाव या अंतरामधील रस्ता काही प्रमाणात बरा असून त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे बुजवावे, अशी माफक अपेक्षा प्रवाशांकडून केली जात आहे. केवळ म्हणायला आणि कागदोपत्री डांबरी असणारा हा रास्ता सध्या मात्र धुळीचा आणि प्रवासी नागरिकांच्या जीवावर उठलेला रस्ता ठरत आहे. काही ठिकाणी तर रस्त्यावर ५-५ फुट व्यासाचे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून रस्त्यावर डबके साचल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. (वार्ताहर)रस्ता अपुरा : कडा तुटल्याने धोकाचांदूस-कोरेगाव बुद्रुक हा जवळपास चार किलोमीटर लांबीचा रस्ता असून राजगुरुनगर या तालुक्याच्या गावाला जोडणा-या अनेक महत्वाच्या रस्त्यांपैकी हा महत्वाचा रस्ता आहे. परंतु सध्या डांबरी रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. त्या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्य म्हणावे लागेल. रस्त्याच्या कडा तुटत चालल्याने रस्ता रुंदीचा विचार केला तर तो निम्म्यावर आला असल्याने रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे. पाईट रोडपासून चांदूस या गावाकडे येताना येथील हायस्कूलपर्यंत येणारा रस्ता हा आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण होतो. कारण या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पावलोपावली असणारे ३-३ फुट व्यासाचे खड्डे, आणि त्यामधून खडी निघाली आहे. अशी निघालेली खडी रस्त्यावर विखुरली आहे. त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास केल्यासारखे आहे. कारण अनेक वेळा या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत असून त्यामुळे अनेकांना लहान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे.