शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

चांदूस-कोरेगाव रस्त्याचे तीन तेरा

By admin | Updated: May 1, 2017 02:10 IST

विमानतळ होणार म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या आणि जमिनीला लाख मोलाचा भाव आलेल्या चांदूस-कोरेगाव या

आंबेठाण : विमानतळ होणार म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या आणि जमिनीला लाख मोलाचा भाव आलेल्या चांदूस-कोरेगाव या गावांना जोडणा-या रस्त्याची अवस्था आता मात्र अतिशय दयनीय झाली आहे. एरवी विमानतळ येणार म्हणून चर्चेत असणारी हीच गावे आता खराब रस्त्यांची गावे म्हणून ओळखू लागली आहेत. काही ठिकाणी पडलेले फुटभर खोल खड्डे, रस्त्याच्या तुटलेल्या कडा आणि विस्तारलेली खडी असेच या रस्त्याचे वर्णन करावे लागेल.याशिवाय अनेक वेळा मोठ्या गाड्यांच्या टायरने अशी वर आलेली खडी जोरात उडते आणि मग त्यामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक, रस्त्याने प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि पायी प्रवास करणा-या नागरिकांना विनाकारण अशी खडी लागून त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तर या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून त्यामुळे अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहे. अनेक वेळा या खड्ड्याचा अंदाज न आल्याने या खड्ड्यात वाहने पडून अपघात झाले आहे. त्यामुळे पुन्हा अशी अपघाताची घटना घडू नये म्हणून आजूबाजूच्या नागरिकांनी तर या खड्ड्यात मोठाले दगड टाकले असून त्यावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत जेणेकरून हा खड्डा लोकांना समजावा. अशी भयानक अवस्था या रस्त्याची झाली आहे.या रस्त्याचा प्रमुख वापर हा शालेय विद्यार्थी आणि शेतकरी वगार्ला होत आहे. तालुक्याच्या गावाला जोडणारा हा रस्ता असल्याने अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे. दुचाकी वाहने तर या रस्त्याने प्रवास करून पार खिळखिळी झाली असून दररोज प्रवास करणा?्या नागरिकांचे तर या रस्त्याने प्रवास करून कंबरडे मोडण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चांदूस ते कोरेगाव बुद्रुक या अंतरापैकी चांदूस येथील हायस्कूल ते कोरेगाव या अंतरामधील रस्ता काही प्रमाणात बरा असून त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे बुजवावे, अशी माफक अपेक्षा प्रवाशांकडून केली जात आहे. केवळ म्हणायला आणि कागदोपत्री डांबरी असणारा हा रास्ता सध्या मात्र धुळीचा आणि प्रवासी नागरिकांच्या जीवावर उठलेला रस्ता ठरत आहे. काही ठिकाणी तर रस्त्यावर ५-५ फुट व्यासाचे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून रस्त्यावर डबके साचल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. (वार्ताहर)रस्ता अपुरा : कडा तुटल्याने धोकाचांदूस-कोरेगाव बुद्रुक हा जवळपास चार किलोमीटर लांबीचा रस्ता असून राजगुरुनगर या तालुक्याच्या गावाला जोडणा-या अनेक महत्वाच्या रस्त्यांपैकी हा महत्वाचा रस्ता आहे. परंतु सध्या डांबरी रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. त्या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्य म्हणावे लागेल. रस्त्याच्या कडा तुटत चालल्याने रस्ता रुंदीचा विचार केला तर तो निम्म्यावर आला असल्याने रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत आहे. पाईट रोडपासून चांदूस या गावाकडे येताना येथील हायस्कूलपर्यंत येणारा रस्ता हा आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण होतो. कारण या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पावलोपावली असणारे ३-३ फुट व्यासाचे खड्डे, आणि त्यामधून खडी निघाली आहे. अशी निघालेली खडी रस्त्यावर विखुरली आहे. त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास केल्यासारखे आहे. कारण अनेक वेळा या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत असून त्यामुळे अनेकांना लहान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे.