शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 20:43 IST

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़ 

ठळक मुद्दे गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली.

पुणे : डेक्कन भागात भाड्याने घेतलेल्या हॉटेल व्यवसायात पाऊण कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने नाशिकमधील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़ भारत बाळासाहेब ढेरिंगे (वय २७, रा. मिडोरी सोसायटी, बावधन) असे या तरुणाचे नाव आहे. हॉटेल व्यावसायिक नरेंद्र तापकीर, उमेश शिंदे आणि वरुणराज शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी बाळासाहेब ढेंरिगे (वय ५०, रा.पळसे, जि. नाशिक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश शिंदे यांचे डेक्कन भागात वरुणराज हॉटेल आहे. उमेश शिंदे आणि त्यांचा मुलगा वरुणराज यांनी हे हॉटेल नरेंद्र तापकीर यांना चालवायला दिले होते. शिंदे यांनी तापकीर यांच्याबरोबर करार केला होता.  नाशिक भागातील शेतकरी बाळासाहेब ढेरिंगे यांचा मुलगा भारत तेथे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. दोन वर्षांपूर्वी तो पुण्यात आला होता. विवाहित असलेल्या भारत यांचा तापकीर यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर तापकीर यांनी वरुणराज हॉटेल भारत यांना चालवायला दिले होते. हॉटेलचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यापोटी २५ ते ३० लाख रुपये खर्च झाल्याचे तापकीर यांनी त्याला सांगितले होते. भारतने तापकीर यांना ५० लाख रुपये दिले होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तापकीर यांचा करारनामा संपल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्याकडे पुन्हा हॉटेल चालविण्यास मागितले होते. त्यानंतर तापकीर यांनी भारत याला हॉटेल सोडण्यास सांगितले होते. तेव्हापासून भारत नैराश्यात होता. त्याने तापकीर आणि वरुणराज हॉटेलचे मालक शिंदे यांची भेट घेतली होती. या प्रकरणात काही तोडगा काढा, असे त्याने सांगितले होते. महिनाभरापूर्वी भारतने पुन्हा काही रक्कम त्यांना दिली होती. हॉटेलवरचा ताबा सोडण्यास त्याला सांगण्यात आले होते. गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली. हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले तसेच फसवणूक झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे भारत यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करत आहेत.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीhotelहॉटेलPolice Stationपोलीस ठाणे