शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन शतकांची साक्षीदार मावळकन्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:43 IST

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे.

- बजरंग लोहारकर्वेनगर : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. तीन शतकांच्या साक्षीदार असलेल्या या निरोगी व शतायुषी मावळकन्येचे नाव आहे रोशनबी नूरमहंमद शेख. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.संशोधक दत्ता नलावडे तसेच पुणे जिल्हा कल्याण समितीचे सदस्य बाजीराव पारगे यांनी या मावळकन्येचा शतायुषी जीवनपट पुढे आणला आहे.रोशनबी यांचा जन्म १८९७ च्या सुमारास पानशेत धरण भागातील आंबेगाव बुद्रुक (तालुका वेल्हे) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोंडेखान पानसरे असे होते. त्यांना दोन भाऊ होते. सर्व भावंडांत त्या मोठ्या आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी रोशनबी यांचे लग्न डोणजे येथील नूरमहंमद शेख यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. त्यापैकी मोठा मुलगा युसूफ हा दुसरीकडे स्थायिक झाला. धाकटा मुलगा मकबूल याचे निधन झाले. त्यांच्या पत्नी रहेमदबी या त्यांचा सांभाळ करत आहेत. रहेमदबी यांना मूलबाळ नाही.रोशनबी यांना कोणताही आजार नाही. काही वर्षांपूर्वी रोशनबी शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांचा डॉक्टरकडे जावे लागले. त्यावेळी त्यांचा उजवा पाय शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. हा अपवाद वगळता त्या आयुष्यात कधीही दवाखान्यात गेल्या नाहीत.रोशनबी स्पष्ट बोलतात. त्यांना कमी ऐकू येते. सून बाहेरगावी गेल्यावर त्या घरात एकट्या असतात. अस्सल मावळी भाषेत तसेच पारंपरिक उर्दू भाषेत त्या बोलतात. रोशनबी शेख यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य येथील रहिवाशांना चकित करित आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे व सुनील भामे यांनी याबाबत खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका चक्करवार यांनी रोशनबी शेख यांची तपासणी केली असता त्यांचे वय पाहून त्या थक्क झाल्या, रोशनबी शेख यांचा रक्तदाब तसेच ठणठणीत प्रकृती पाहून काही लाखांत अशा वयोवृद्ध महिला असाव्यात असे डॉ. चक्कवार म्हणाल्या. मतदान ओळखपत्रावरील वयानुसार रोशनबी यांचे वय ११० वर्षे आहे. मात्र, त्यांचे वय ११५ ते १२० वर्षे इतके असावे, असे डॉ. चक्करवार यांनी सांगितले.अपंगत्वावर मात करत त्या स्वत: शौचास जातात. चालताना थकवा येत असल्याने त्या अंथरूणावर झोपून असतात, मात्र त्या अंथरूणावर उठून बसतात. दररोज सकाळी ७ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सून रहेमतबी त्यांना आंघोळ करून चहा, नाष्टा देतात. दुपारी एक वाजता वरण-भात, भाजी व रात्री जेवण घेतात. जेवणात मटण, मासे त्या घेतात. मिश्री, तंबाखूची त्यांना सवय आहे.

टॅग्स :Puneपुणे