शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

तीन शतकांची साक्षीदार मावळकन्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:43 IST

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे.

- बजरंग लोहारकर्वेनगर : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. तीन शतकांच्या साक्षीदार असलेल्या या निरोगी व शतायुषी मावळकन्येचे नाव आहे रोशनबी नूरमहंमद शेख. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.संशोधक दत्ता नलावडे तसेच पुणे जिल्हा कल्याण समितीचे सदस्य बाजीराव पारगे यांनी या मावळकन्येचा शतायुषी जीवनपट पुढे आणला आहे.रोशनबी यांचा जन्म १८९७ च्या सुमारास पानशेत धरण भागातील आंबेगाव बुद्रुक (तालुका वेल्हे) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोंडेखान पानसरे असे होते. त्यांना दोन भाऊ होते. सर्व भावंडांत त्या मोठ्या आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी रोशनबी यांचे लग्न डोणजे येथील नूरमहंमद शेख यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. त्यापैकी मोठा मुलगा युसूफ हा दुसरीकडे स्थायिक झाला. धाकटा मुलगा मकबूल याचे निधन झाले. त्यांच्या पत्नी रहेमदबी या त्यांचा सांभाळ करत आहेत. रहेमदबी यांना मूलबाळ नाही.रोशनबी यांना कोणताही आजार नाही. काही वर्षांपूर्वी रोशनबी शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांचा डॉक्टरकडे जावे लागले. त्यावेळी त्यांचा उजवा पाय शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. हा अपवाद वगळता त्या आयुष्यात कधीही दवाखान्यात गेल्या नाहीत.रोशनबी स्पष्ट बोलतात. त्यांना कमी ऐकू येते. सून बाहेरगावी गेल्यावर त्या घरात एकट्या असतात. अस्सल मावळी भाषेत तसेच पारंपरिक उर्दू भाषेत त्या बोलतात. रोशनबी शेख यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य येथील रहिवाशांना चकित करित आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे व सुनील भामे यांनी याबाबत खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका चक्करवार यांनी रोशनबी शेख यांची तपासणी केली असता त्यांचे वय पाहून त्या थक्क झाल्या, रोशनबी शेख यांचा रक्तदाब तसेच ठणठणीत प्रकृती पाहून काही लाखांत अशा वयोवृद्ध महिला असाव्यात असे डॉ. चक्कवार म्हणाल्या. मतदान ओळखपत्रावरील वयानुसार रोशनबी यांचे वय ११० वर्षे आहे. मात्र, त्यांचे वय ११५ ते १२० वर्षे इतके असावे, असे डॉ. चक्करवार यांनी सांगितले.अपंगत्वावर मात करत त्या स्वत: शौचास जातात. चालताना थकवा येत असल्याने त्या अंथरूणावर झोपून असतात, मात्र त्या अंथरूणावर उठून बसतात. दररोज सकाळी ७ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सून रहेमतबी त्यांना आंघोळ करून चहा, नाष्टा देतात. दुपारी एक वाजता वरण-भात, भाजी व रात्री जेवण घेतात. जेवणात मटण, मासे त्या घेतात. मिश्री, तंबाखूची त्यांना सवय आहे.

टॅग्स :Puneपुणे