शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तीन शतकांची साक्षीदार मावळकन्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:43 IST

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे.

- बजरंग लोहारकर्वेनगर : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. तीन शतकांच्या साक्षीदार असलेल्या या निरोगी व शतायुषी मावळकन्येचे नाव आहे रोशनबी नूरमहंमद शेख. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.संशोधक दत्ता नलावडे तसेच पुणे जिल्हा कल्याण समितीचे सदस्य बाजीराव पारगे यांनी या मावळकन्येचा शतायुषी जीवनपट पुढे आणला आहे.रोशनबी यांचा जन्म १८९७ च्या सुमारास पानशेत धरण भागातील आंबेगाव बुद्रुक (तालुका वेल्हे) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोंडेखान पानसरे असे होते. त्यांना दोन भाऊ होते. सर्व भावंडांत त्या मोठ्या आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी रोशनबी यांचे लग्न डोणजे येथील नूरमहंमद शेख यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. त्यापैकी मोठा मुलगा युसूफ हा दुसरीकडे स्थायिक झाला. धाकटा मुलगा मकबूल याचे निधन झाले. त्यांच्या पत्नी रहेमदबी या त्यांचा सांभाळ करत आहेत. रहेमदबी यांना मूलबाळ नाही.रोशनबी यांना कोणताही आजार नाही. काही वर्षांपूर्वी रोशनबी शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांचा डॉक्टरकडे जावे लागले. त्यावेळी त्यांचा उजवा पाय शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. हा अपवाद वगळता त्या आयुष्यात कधीही दवाखान्यात गेल्या नाहीत.रोशनबी स्पष्ट बोलतात. त्यांना कमी ऐकू येते. सून बाहेरगावी गेल्यावर त्या घरात एकट्या असतात. अस्सल मावळी भाषेत तसेच पारंपरिक उर्दू भाषेत त्या बोलतात. रोशनबी शेख यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य येथील रहिवाशांना चकित करित आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे व सुनील भामे यांनी याबाबत खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका चक्करवार यांनी रोशनबी शेख यांची तपासणी केली असता त्यांचे वय पाहून त्या थक्क झाल्या, रोशनबी शेख यांचा रक्तदाब तसेच ठणठणीत प्रकृती पाहून काही लाखांत अशा वयोवृद्ध महिला असाव्यात असे डॉ. चक्कवार म्हणाल्या. मतदान ओळखपत्रावरील वयानुसार रोशनबी यांचे वय ११० वर्षे आहे. मात्र, त्यांचे वय ११५ ते १२० वर्षे इतके असावे, असे डॉ. चक्करवार यांनी सांगितले.अपंगत्वावर मात करत त्या स्वत: शौचास जातात. चालताना थकवा येत असल्याने त्या अंथरूणावर झोपून असतात, मात्र त्या अंथरूणावर उठून बसतात. दररोज सकाळी ७ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सून रहेमतबी त्यांना आंघोळ करून चहा, नाष्टा देतात. दुपारी एक वाजता वरण-भात, भाजी व रात्री जेवण घेतात. जेवणात मटण, मासे त्या घेतात. मिश्री, तंबाखूची त्यांना सवय आहे.

टॅग्स :Puneपुणे