शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराला अटक; ५ महिन्यांनंतर सुरक्षा दलांना मोठं यश, ऑपरेशन महादेव यशस्वी!
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
4
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
5
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
6
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
7
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
8
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
9
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
10
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
11
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
12
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
13
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
14
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
15
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
16
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
18
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
19
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
20
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप

कुकडी प्रकल्पातून सोडणार साडेतीन टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून १ हजार ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी डावा कालवा हा २४९ किलोमीटर लांबीचा असून, या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाच तालुक्यांना होणार आहे. टेल टू हेड या पद्धतीने पाणीवाटप केले जाणार आहे.

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणातून १ हजार क्‍युसेकने, डिंभे धरणातून ६०० क्‍युसेकने, पिंपळगाव जोगा धरणातून १ हजार १०० क्‍युसेकने, चिल्हेवाडी धरणातून २३० क्‍युसेकने येडगाव धरणात असे एकूण २ हजार ९३० क्‍युसेकने पाणी जमा होत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने जलविद्युत विमोचनातून शुक्रवारी (दि. २१) १४०० क्‍युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे येथे दररोज सुमारे ३० हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीत )व कंसात टक्केवारी

येडगाव १.०२८ (५२.८९ टक्के)

माणिकडोह ०.५२३ (५.१४ टक्के )

वडज ०.२९४ ( २५.०७टक्के)

डिंभे ४.२०० (३३.६२ टक्के)

पिंपळगाव जोगे ०. (० टक्के)

३.५७४ मृतसाठा

चौकट

नदीवरील बंधाऱ्यांनाही आले पाणी

कुकडी नदीवरील वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पाटबंधारे विभागाने कालव्याबरोबर कुकडी नदीवरील बंधाऱ्यातही पाणी सोडले आहे. या पाण्याअभावी बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू होणार आहे.

चौकट

शेतकऱ्यांना दिलासा

कुकडी डाव्या कालव्याला पाणी सुटावे यासाठी जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाचही तालुक्यांतील शेतकरी पाण्याची वाट पाहत होते. विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.

चौकट

दररोज ३० हजार युनिट वीजनिर्मिती

कुकडी डाव्या कालव्याला येडगाव (ता. जुन्नर) येथून जलविद्युत विमोचकातून १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना होणार आहे. याबरोबरच दररोज ३० हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे.

कोट

२८ दिवसांत कुकडी डाव्या कालव्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार

आहे. याचा लाभ पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्‍यासाठी डिंभे उजव्या कालव्यात १५० क्‍युसेकने पाणी सोडले आहे. पाणीटंचाईचा विचार करता काटेकोर नियोजन करण्यता आले आहे.

- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १.