शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
4
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
5
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
6
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
7
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
8
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
9
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
10
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
11
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
12
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
13
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
14
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
16
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
17
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
18
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
19
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
20
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस

कुकडी प्रकल्पातून सोडणार साडेतीन टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून १ हजार ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी डावा कालवा हा २४९ किलोमीटर लांबीचा असून, या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाच तालुक्यांना होणार आहे. टेल टू हेड या पद्धतीने पाणीवाटप केले जाणार आहे.

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणातून १ हजार क्‍युसेकने, डिंभे धरणातून ६०० क्‍युसेकने, पिंपळगाव जोगा धरणातून १ हजार १०० क्‍युसेकने, चिल्हेवाडी धरणातून २३० क्‍युसेकने येडगाव धरणात असे एकूण २ हजार ९३० क्‍युसेकने पाणी जमा होत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने जलविद्युत विमोचनातून शुक्रवारी (दि. २१) १४०० क्‍युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे येथे दररोज सुमारे ३० हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीत )व कंसात टक्केवारी

येडगाव १.०२८ (५२.८९ टक्के)

माणिकडोह ०.५२३ (५.१४ टक्के )

वडज ०.२९४ ( २५.०७टक्के)

डिंभे ४.२०० (३३.६२ टक्के)

पिंपळगाव जोगे ०. (० टक्के)

३.५७४ मृतसाठा

चौकट

नदीवरील बंधाऱ्यांनाही आले पाणी

कुकडी नदीवरील वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पाटबंधारे विभागाने कालव्याबरोबर कुकडी नदीवरील बंधाऱ्यातही पाणी सोडले आहे. या पाण्याअभावी बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू होणार आहे.

चौकट

शेतकऱ्यांना दिलासा

कुकडी डाव्या कालव्याला पाणी सुटावे यासाठी जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाचही तालुक्यांतील शेतकरी पाण्याची वाट पाहत होते. विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.

चौकट

दररोज ३० हजार युनिट वीजनिर्मिती

कुकडी डाव्या कालव्याला येडगाव (ता. जुन्नर) येथून जलविद्युत विमोचकातून १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना होणार आहे. याबरोबरच दररोज ३० हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे.

कोट

२८ दिवसांत कुकडी डाव्या कालव्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार

आहे. याचा लाभ पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्‍यासाठी डिंभे उजव्या कालव्यात १५० क्‍युसेकने पाणी सोडले आहे. पाणीटंचाईचा विचार करता काटेकोर नियोजन करण्यता आले आहे.

- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १.