शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
5
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
6
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
7
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
8
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
9
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
10
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
11
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
12
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
13
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
14
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
15
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
16
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
17
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
18
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
19
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

कुकडी प्रकल्पातून सोडणार साडेतीन टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून १ हजार ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी डावा कालवा हा २४९ किलोमीटर लांबीचा असून, या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाच तालुक्यांना होणार आहे. टेल टू हेड या पद्धतीने पाणीवाटप केले जाणार आहे.

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणातून १ हजार क्‍युसेकने, डिंभे धरणातून ६०० क्‍युसेकने, पिंपळगाव जोगा धरणातून १ हजार १०० क्‍युसेकने, चिल्हेवाडी धरणातून २३० क्‍युसेकने येडगाव धरणात असे एकूण २ हजार ९३० क्‍युसेकने पाणी जमा होत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने जलविद्युत विमोचनातून शुक्रवारी (दि. २१) १४०० क्‍युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे येथे दररोज सुमारे ३० हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीत )व कंसात टक्केवारी

येडगाव १.०२८ (५२.८९ टक्के)

माणिकडोह ०.५२३ (५.१४ टक्के )

वडज ०.२९४ ( २५.०७टक्के)

डिंभे ४.२०० (३३.६२ टक्के)

पिंपळगाव जोगे ०. (० टक्के)

३.५७४ मृतसाठा

चौकट

नदीवरील बंधाऱ्यांनाही आले पाणी

कुकडी नदीवरील वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पाटबंधारे विभागाने कालव्याबरोबर कुकडी नदीवरील बंधाऱ्यातही पाणी सोडले आहे. या पाण्याअभावी बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू होणार आहे.

चौकट

शेतकऱ्यांना दिलासा

कुकडी डाव्या कालव्याला पाणी सुटावे यासाठी जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाचही तालुक्यांतील शेतकरी पाण्याची वाट पाहत होते. विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.

चौकट

दररोज ३० हजार युनिट वीजनिर्मिती

कुकडी डाव्या कालव्याला येडगाव (ता. जुन्नर) येथून जलविद्युत विमोचकातून १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना होणार आहे. याबरोबरच दररोज ३० हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे.

कोट

२८ दिवसांत कुकडी डाव्या कालव्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार

आहे. याचा लाभ पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्‍यासाठी डिंभे उजव्या कालव्यात १५० क्‍युसेकने पाणी सोडले आहे. पाणीटंचाईचा विचार करता काटेकोर नियोजन करण्यता आले आहे.

- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १.