शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पातून सोडणार साडेतीन टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून १ हजार ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी डावा कालवा हा २४९ किलोमीटर लांबीचा असून, या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाच तालुक्यांना होणार आहे. टेल टू हेड या पद्धतीने पाणीवाटप केले जाणार आहे.

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणातून १ हजार क्‍युसेकने, डिंभे धरणातून ६०० क्‍युसेकने, पिंपळगाव जोगा धरणातून १ हजार १०० क्‍युसेकने, चिल्हेवाडी धरणातून २३० क्‍युसेकने येडगाव धरणात असे एकूण २ हजार ९३० क्‍युसेकने पाणी जमा होत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने जलविद्युत विमोचनातून शुक्रवारी (दि. २१) १४०० क्‍युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे येथे दररोज सुमारे ३० हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीत )व कंसात टक्केवारी

येडगाव १.०२८ (५२.८९ टक्के)

माणिकडोह ०.५२३ (५.१४ टक्के )

वडज ०.२९४ ( २५.०७टक्के)

डिंभे ४.२०० (३३.६२ टक्के)

पिंपळगाव जोगे ०. (० टक्के)

३.५७४ मृतसाठा

चौकट

नदीवरील बंधाऱ्यांनाही आले पाणी

कुकडी नदीवरील वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पाटबंधारे विभागाने कालव्याबरोबर कुकडी नदीवरील बंधाऱ्यातही पाणी सोडले आहे. या पाण्याअभावी बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू होणार आहे.

चौकट

शेतकऱ्यांना दिलासा

कुकडी डाव्या कालव्याला पाणी सुटावे यासाठी जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाचही तालुक्यांतील शेतकरी पाण्याची वाट पाहत होते. विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.

चौकट

दररोज ३० हजार युनिट वीजनिर्मिती

कुकडी डाव्या कालव्याला येडगाव (ता. जुन्नर) येथून जलविद्युत विमोचकातून १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना होणार आहे. याबरोबरच दररोज ३० हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे.

कोट

२८ दिवसांत कुकडी डाव्या कालव्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार

आहे. याचा लाभ पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्‍यासाठी डिंभे उजव्या कालव्यात १५० क्‍युसेकने पाणी सोडले आहे. पाणीटंचाईचा विचार करता काटेकोर नियोजन करण्यता आले आहे.

- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १.