शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

भावनेतून विचार अन् विचारांतून कृती घडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविडच्या काळात सकारात्मक विचारांची खूप चर्चा झाली; पण नेहमीच सकारात्मक राहिले पाहिजे, असे नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोविडच्या काळात सकारात्मक विचारांची खूप चर्चा झाली; पण नेहमीच सकारात्मक राहिले पाहिजे, असे नाही. नकारात्मक भावनादेखील जगण्याची समृद्धता वाढविते; पण त्याचे परिवर्तन झाले पाहिजे. जे आपल्याला वाचून, पाहून व ऐकून घडते. कृती करीत असताना भावना व विचारदेखील महत्त्वाचा असतो. भावनेतून विचार अन् विचारांतून कृती घडावी, असे विचार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी मांडले.

डॉ. विजय देशमुखलिखित ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ या मराठी अनुवादित पुस्तकांचे रविवारी सायंकाळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. मोहन आगाशे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मंजूळ प्रकाशनचे चेतन कोळी, लेखक डॉ. विजय देशमुख, डॉ. सोनाली देशमुख आदी उपस्थित होते. डॉ. आगाशे म्हणाले, ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ या पुस्तकात ४८ सूत्रे मंडळी आहेत. ती रोज एक वाचा; पण केवळ विचार करू नका, तर कृतीदेखील करा. सर्वांत छोटे आयुष्य हे तीव्र भावनेचे असते. त्याच्यापेक्षा जास्त विचारांचे आयुष्य असते आणि त्याहून जास्त आयुष्य असते, ते कृतीचे. त्यामुळे कृती महत्त्वाची ठरते.

विजय बाविस्कर म्हणाले, विचार हा परिवर्तनाचा मूलमंत्र आहे. जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे परिर्वतनात रूपांतर झाले पाहिजे. डॉ. विजय देशमुखांनी लिहिलेल्या या पुस्तकांत परिवर्तनाचा विचार मांडला आहे. ते दातांचे डॉक्टर आहेत. दातांचे नाते सौंदर्याशी आहे. सौंदर्याचे नाते संवेदनांशी आहे. संवेदनांचे नाते वेदनेशी आहे अन् वेदनेचे नाते विचारांशी आहे. विजय देशमुख म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून वाचनाची आवड आहे. वाचनात रमतो तर, लेखनातून ध्यान करतो. आयुष्यात बदल घडण्यासाठी एक विचारदेखील पुरेसा ठरतो. पुस्तकाच्या प्रत्येक पानातून वाचकांना काही तरी मिळायला हवे. यावेळी पुणेरी पगडी घालून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चेतन कोळी यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय वाटवे यांनी केले. डॉ. सोनाली देशमुख यांनी पुस्तकातील निवडक भागाचे अभिवाचन केले.

.....

एकांत हे तर विचारांचे पर्यटन स्थळ : प्रा मिलिंद जोशी

कोरोनापूर्वी आपण केवळ स्वतःसाठी धावत होतो. त्या धावण्यातून विवेक हरवला होता. आता परिस्थिती बदलली आहे. निराशेच्या पोटातदेखील आशेचा किरण आहे. सगळीकडे केवळ अंधाराच्या पारंब्यांच आहेत, असे नाही. त्या पारंब्यांतून प्रकाशाचे कवडसेदेखील आहेत. त्यांचा विचार करा. आपल्या मनात नेहमी सकारत्मक विचारांची आरास करा. या पुस्तकात सकारात्मक विचार मांडले आहेत. त्यांचा आनंदाने स्वीकार करा. आपल्या दुःखांना सजवू नका. एकांत म्हणजे एकटेपणा नाही. एकांत हे तर विचारांचे पर्यटन स्थळ आहे. त्याच्या भेटीला जावे, असे विचार प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले.

फोटो ओळी : पुस्तक प्रकाशनप्रसंगी डावीकडून चेतन कोळी, लेखक डॉ. विजय देशमुख, प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विजय बाविस्कर, डॉ. सोनाली देशमुख.