शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भावनेतून विचार अन् विचारांतून कृती घडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविडच्या काळात सकारात्मक विचारांची खूप चर्चा झाली; पण नेहमीच सकारात्मक राहिले पाहिजे, असे नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोविडच्या काळात सकारात्मक विचारांची खूप चर्चा झाली; पण नेहमीच सकारात्मक राहिले पाहिजे, असे नाही. नकारात्मक भावनादेखील जगण्याची समृद्धता वाढविते; पण त्याचे परिवर्तन झाले पाहिजे. जे आपल्याला वाचून, पाहून व ऐकून घडते. कृती करीत असताना भावना व विचारदेखील महत्त्वाचा असतो. भावनेतून विचार अन् विचारांतून कृती घडावी, असे विचार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी मांडले.

डॉ. विजय देशमुखलिखित ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ या मराठी अनुवादित पुस्तकांचे रविवारी सायंकाळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. मोहन आगाशे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मंजूळ प्रकाशनचे चेतन कोळी, लेखक डॉ. विजय देशमुख, डॉ. सोनाली देशमुख आदी उपस्थित होते. डॉ. आगाशे म्हणाले, ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ या पुस्तकात ४८ सूत्रे मंडळी आहेत. ती रोज एक वाचा; पण केवळ विचार करू नका, तर कृतीदेखील करा. सर्वांत छोटे आयुष्य हे तीव्र भावनेचे असते. त्याच्यापेक्षा जास्त विचारांचे आयुष्य असते आणि त्याहून जास्त आयुष्य असते, ते कृतीचे. त्यामुळे कृती महत्त्वाची ठरते.

विजय बाविस्कर म्हणाले, विचार हा परिवर्तनाचा मूलमंत्र आहे. जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे परिर्वतनात रूपांतर झाले पाहिजे. डॉ. विजय देशमुखांनी लिहिलेल्या या पुस्तकांत परिवर्तनाचा विचार मांडला आहे. ते दातांचे डॉक्टर आहेत. दातांचे नाते सौंदर्याशी आहे. सौंदर्याचे नाते संवेदनांशी आहे. संवेदनांचे नाते वेदनेशी आहे अन् वेदनेचे नाते विचारांशी आहे. विजय देशमुख म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून वाचनाची आवड आहे. वाचनात रमतो तर, लेखनातून ध्यान करतो. आयुष्यात बदल घडण्यासाठी एक विचारदेखील पुरेसा ठरतो. पुस्तकाच्या प्रत्येक पानातून वाचकांना काही तरी मिळायला हवे. यावेळी पुणेरी पगडी घालून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चेतन कोळी यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय वाटवे यांनी केले. डॉ. सोनाली देशमुख यांनी पुस्तकातील निवडक भागाचे अभिवाचन केले.

.....

एकांत हे तर विचारांचे पर्यटन स्थळ : प्रा मिलिंद जोशी

कोरोनापूर्वी आपण केवळ स्वतःसाठी धावत होतो. त्या धावण्यातून विवेक हरवला होता. आता परिस्थिती बदलली आहे. निराशेच्या पोटातदेखील आशेचा किरण आहे. सगळीकडे केवळ अंधाराच्या पारंब्यांच आहेत, असे नाही. त्या पारंब्यांतून प्रकाशाचे कवडसेदेखील आहेत. त्यांचा विचार करा. आपल्या मनात नेहमी सकारत्मक विचारांची आरास करा. या पुस्तकात सकारात्मक विचार मांडले आहेत. त्यांचा आनंदाने स्वीकार करा. आपल्या दुःखांना सजवू नका. एकांत म्हणजे एकटेपणा नाही. एकांत हे तर विचारांचे पर्यटन स्थळ आहे. त्याच्या भेटीला जावे, असे विचार प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले.

फोटो ओळी : पुस्तक प्रकाशनप्रसंगी डावीकडून चेतन कोळी, लेखक डॉ. विजय देशमुख, प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विजय बाविस्कर, डॉ. सोनाली देशमुख.