शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘त्या’ २४ गावांचा स्वतंत्र आराखडा करणार

By admin | Updated: May 6, 2015 06:21 IST

भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुणे : माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक राव यांच्या अध्यक्षतेखील मंगळारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, सैन्यदलाचे कर्नल मराठे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी राव यांनी सांगितले, की माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये जिल्ह्यात २४ गावांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी या गावांचा स्वतंत्र आराखडा करावा, याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात पुन्हा माळीणसारखी दुर्घटना झालीच, तर त्या गावातील लोकांना कोठे हलविणार, बचाव आणि मदत कार्य कसे राबविणार, याबाबत आराखडा तयार करताना प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.दरम्यान, याशिवाय पूरग्रस्त, प्रवण गावांचा आराखडा तयार करून आश्रयासाठी गावांतील शाळा, समाज मंदिरे आदी ठिकाणे निश्चित करून ठेवली जावीत, याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही महापालिकांनादेखील त्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यास सांगण्यात आले आहे.४पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्ती करावी, यंत्रसामग्री सज्ज ठेवा.४मोबाईल रेंज पोहोचू शकत नाही, असे परिसर निश्चित करून तेथे पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.४शहर आणि जिल्ह्यातील पूल व महत्त्वाच्या ठिकाणी पुराच्या पाण्याच्या पातळीचे रेखाकंन करावे.४आरोग्य विभागाने रुग्णावहिकांची सेवा अव्याहत सुरू राहील,याची खात्री करावी.४जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा करावा.