शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

‘त्या’ २४ गावांचा स्वतंत्र आराखडा करणार

By admin | Updated: May 6, 2015 06:21 IST

भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुणे : माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक राव यांच्या अध्यक्षतेखील मंगळारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, सैन्यदलाचे कर्नल मराठे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी राव यांनी सांगितले, की माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये जिल्ह्यात २४ गावांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी या गावांचा स्वतंत्र आराखडा करावा, याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात पुन्हा माळीणसारखी दुर्घटना झालीच, तर त्या गावातील लोकांना कोठे हलविणार, बचाव आणि मदत कार्य कसे राबविणार, याबाबत आराखडा तयार करताना प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.दरम्यान, याशिवाय पूरग्रस्त, प्रवण गावांचा आराखडा तयार करून आश्रयासाठी गावांतील शाळा, समाज मंदिरे आदी ठिकाणे निश्चित करून ठेवली जावीत, याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही महापालिकांनादेखील त्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यास सांगण्यात आले आहे.४पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्ती करावी, यंत्रसामग्री सज्ज ठेवा.४मोबाईल रेंज पोहोचू शकत नाही, असे परिसर निश्चित करून तेथे पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.४शहर आणि जिल्ह्यातील पूल व महत्त्वाच्या ठिकाणी पुराच्या पाण्याच्या पातळीचे रेखाकंन करावे.४आरोग्य विभागाने रुग्णावहिकांची सेवा अव्याहत सुरू राहील,याची खात्री करावी.४जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा करावा.