शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

एमआयडीसीसह ३0 हजार ग्रामस्थ तहानले

By admin | Updated: April 23, 2016 00:55 IST

बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा गेल्या ५ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे येथील उद्योगांसमोर गंभीर पाणीसंकट निर्माण झाले

बारामती : बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा गेल्या ५ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे येथील उद्योगांसमोर गंभीर पाणीसंकट निर्माण झाले आहे. या परिसरातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. उजनी जलाशयाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे जवळपास १० मोठ्या कंपन्या, त्यांच्यावर अवलंबून असलेले जवळपास ३०० लघुउद्योग अडचणीत आले आहेत. बारामतीच्या या उद्योगनगरीतील अर्थव्यवस्था पाण्यामुळे धोक्यात आली आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र शनिवारपासून (दि. २३) पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा केला आहे. तरीदेखील पाण्याची गंभीर समस्या असताना पाणी उपलब्ध होणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एमआयडीसीतील रहिवासी झोनसह कटफळ, वंजारवाडी, गोजूबावी, रूई, तांदूळवाडी येथील २५ ते ३० हजार नागरिक तहानलेले आहेत. या नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर काही नागरी वसाहती वर्गणी करून टँकरने पाणी विकत घेत आहेत. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी उद्योगनगरीतील नागरी वस्त्यांमध्ये जारमधील पाण्याची विक्री जोरदार सुरू आहे. यासह कंपन्यांमध्ये दैनंदिन वापराच्या व पिण्याच्या पाण्यावर मर्यादा आली आहे. उजनीचे पाणी घेण्यासाठी चारी खोदून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. आणखी दीड ते दोन महिने ही कसरत करावी लागणार आहे, अशी स्थिती या परिसरात आहे. (प्रतिनिधी)जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. रस्त्याला आडवे छिद्र घेण्याचे काम सुरू आहे. १५ ते २० दिवसांत जुन्या जलवाहिनीतून पाणी सोडणे बंद होईल. त्यामुळे पाणीचोरीचा प्रश्न मार्गी लागेल. नवीन जलवाहिनीतून प्रतिदिन १६ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा होईल. उजनी जलाशयात पावसाळ्यापर्यंत पुरवठा होईल, एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे उद्योजकांना पाण्याची चिंता नाही. याशिवाय पाणी न देऊ शकणाऱ्या भागात उद्योजकांना विंधनविहीर घेण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र, त्यासाठी भूजल संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पाणीपुरवठा सुरू होऊनदेखील उपयोग होण्याची शक्यता नाही. अजूनही जुन्या जलवाहिनीतून पाणीगळती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्या पाणी मिळण्याची शाश्वती नाही. याबाबत पाणी न मिळाल्यास शनिवारी उद्योजकांना घेऊन एमआयडीसी प्रशासनाला जाब विचारण्यात येईल. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. ते रोखण्यावर एमआयडीसीने भर दिला पाहिजे. - प्रमोद काकडे , अध्यक्ष, बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजवापरासाठी टँकरने विकतचे पाणी येथील नागरिक घेत आहेत. तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आम्हाला पोहोचावे लागत आहे. ५ हजार लिटर पाण्यासाठी ६०० ते ७०० रुपये व्यावसायिकांकडून घेतले जात आहे. तर, पैसे भरून देखील सध्या टँकरचे पाणी विकतदेखील मिळत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. किमान पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यावर एमआयडीसीने उपाय शोधला पाहिजे. - अण्णा पवळ, एमआयडीसीतील रहिवासी जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही. याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपण शुक्रवारी (दि. २२) सकाळी भेट घेतली. तसेच, या प्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली. त्याची दखल घेऊन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले आहे. जलशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे केवळ याच काळात प्रलंबित कामे पूर्ण करणे शक्य आहे. - धनंजय जामदार, अध्यक्ष, बारामती इंडस्ट्रीअल असोसिएशन