शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कुटुंबाचा विचार करुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:05 IST

\Sपुण्याचे उद्योजक पाषाणकरांनी उलगडला ''''त्या'''' ३३ दिवसांचा प्रवास लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्या लोकांची तोंड वर करून बोलायची ...

\Sपुण्याचे उद्योजक पाषाणकरांनी उलगडला ''''त्या'''' ३३ दिवसांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्या लोकांची तोंड वर करून बोलायची हिंमत नव्हती़, ते वाट्टेल ते बोलू लागले, ते सहन होत नव्हते़ व्यवसायात काही चुकीचे निर्णय झाल्याने आर्थिक नुकसान झाले होते़ त्याच्या तणावातून आत्महत्येचा विचार आल्याने घरातून निघून गेलो होतो़ पण बाहेर पडल्यावर कुटुंबाचा विचार मनात आल्याने आत्महत्येचा विचार दूर सारला़ पण पुण्यात परत न येण्याचा विचार होता, असे प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सांगितले़

पुणे पोलिसांच्या पथकाने गौतम पाषाणकर यांना जयपूर येथील चंद्रगुप्त फोर्ट या हॉटेलमधून मंगळवारी ताब्यात घेतले़ त्यांना बुधवारी सायंकाळी पुण्यात आणण्यात आले़ यावेळी पाषाणकर हे पत्रकारांशी बोलत होते़

पाषाणकर यांनी सांगितले की, गेल्या २ -३ महिन्यांपासून ताणतणावात होतो़ त्यातून माझ्यावर मानसिक भडीमार झाला़ कुठलीही परिस्थिती साथ देत नव्हती़ किरकोळ रक्कमेसाठी लोक बोलू लागल्याने त्याचा मानसिक त्रास झाला़ ते सहनशीलतेच्या बाहेर होते़ त्यातूनच आत्महत्येचा विचार करुन पुण्यातून कोल्हापूरला गेलो़ तेथून बसने बंगलोर व तेथून तिरुपती बालाजी करीत कन्याकुमारीपर्यंत गेलो होतो़ या प्रवासादरम्यान शांतपणे विचार करत गेलो़ तेव्हा कुटुंबाचा विचार मनात आला़ हे आपले काम नाही, असे मनाने घेतले़ पण पुण्यात परत येण्याचा विचार नव्हता़ त्यामुळे मी बसने फिरत राहिलो़ पोलीस आले नसते तर दुसºया दिवशी आपण उदयपूरला निघून जाणार होतो़

पुण्यातून निघताना ९० हजार रुपये बरोबर घेतले होते़ छोट्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा़ साधे जेवण घ्यायचे़ बसने फिरायचे़ खूप विचार करायचा असा दिनक्रम सुरु होता, असे त्यांनी सांगितले़

गौतम पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय करतो़ मी महत्वाच्या निर्णयाच्या वेळी वडिलांचा सल्ला घेतो़ आमची ८०० कोटींची उलाढाल होती़ आम्ही मोटारीची डिलरशीप बंद झाली़ त्या कठीण काळामधून बाहेर पडलो होतो़ पण वडिलांनी त्यांच्या आर्थिक अडचणी, मानसिक स्थितीची कधी माहिती दिली नाही़ त्यांना आता व्यवसायातून तुम्ही रिटायर व्हा़ पुढील ६ महिन्यात सर्व स्थिरस्थावर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

-------------

''''पोलीस इतका शोध घेतील असे वाटले नव्हते''''

आपण घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार होईल़ पोलीस शोध घेतील, याची कल्पना होती़ परंतु, पोलीस इतका शोध घेतील, असे वाटले नव्हते, असे गौतम पाषाणकर यांनी सांगितले़. आपण महाराष्ट्राबाहेर होतो़ तसेच बरोबर मोबाईल अथवा कोणाशी संपर्क नसल्याने आपला इतका ठिकाणी शोध घेतला जात असल्याचे समजले नसल्याचे त्यांनी सांगितले़.