शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

...त्यांना मिळाला मानसिक आधार

By admin | Updated: July 30, 2016 05:01 IST

एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेले... नातेवाईक, रोज ज्यांच्यासोबत शाळेत जातो ते जिवाभावाचे मित्र आणि अगदी शेजारपाजारही सगळे त्या रात्रीत धरतीने आपल्या पोटात घेतलेले...

- सायली जोशी-पटवर्धन, पुणे

एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेले... नातेवाईक, रोज ज्यांच्यासोबत शाळेत जातो ते जिवाभावाचे मित्र आणि अगदी शेजारपाजारही सगळे त्या रात्रीत धरतीने आपल्या पोटात घेतलेले... मदतीचे अनेक हात पुढे आले... मात्र, या धक्क्यातून मनाला सावरायचे कसे, हा प्रश्न या चिमुरड्यांपुढे कायम होता... भोई प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला असून या विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे काम संस्था मागील दोन वर्षापासून करत आहे. डॉ. मिलींद भोई म्हणाले, आपले जीवलग गमावलेल्या या लोकांना मानसिकरित्या सावरण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे वाटले. त्यासाठीच प्रतिष्ठानने चला माळीण पुन्हा उभारुया हा प्रकल्प चालू केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी घडलेल्या घटनेचे दु:ख विसरुन पुढे जावे हा मूळ उद्देश होता. यामध्ये मानसोपचारतज्ज्ञ आणि मान्यवर कलाकारांना समाविष्ट करुन विविध उपक्रम राबविण्यात आले. विक्रम गोखले, अलका कुबल या कलाकारांनी प्रत्यक्ष माळीणमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांचे मानिसक स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी त्यांना गणपती पहाण्यासाठी पुण्यात आणण्यात आले तर राखीपौर्णिमेला त्यांना राख्या आणि शुभेच्छापत्र पाठविण्यात आली. या मुलांनी याची देही याची डोळा पाहीलेले हे दु:ख विसरुन त्यातून लवकरात लवकर बाहेर पडावे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचेही डॉ. भोई म्हणाले. याबरोबरच या विद्यार्थ्यांना १० वी नंतर पुण्यात येऊन शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास त्यांचे पालकत्व भोई प्रतिष्ठान घेणार असून पुण्यातील अनेक नामवंत संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. माळीणमधील शाळेतील शिक्षक मच्छींद्र झांजरे व तुकाराम लेंबे यांनीही कुटुुंबियांना या दुर्घटनेत गमावले आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहून हे दोन्हीही शिक्षक विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला आपला विद्यार्थी खंबीरपणे कसा सामोरा जाईल याचाच प्रयत्न ते करत आहेत. याबरोबरच रेणू गावसकर, समुपदेशक निरुपमा दिवेकर, डॉ. नितीन बोरा यांसारख्या समाजातील अनेक व्यक्तींनीही या उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.मळभ झाले दूरपुण्याच्या खगोलशास्त्र विषयात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या आयुका या संस्थेतही विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी खगोलशास्त्रातील गोष्टी जाणून घेत मनमोकळा संवाद साधला. या भेटीनंतर आपल्या गावी परतलेल्या एका विद्यार्थ्याने प्रतिष्ठानला एक पत्र लिहिले आहे. या उपक्रमामुळे आपल्या आयुष्यात आलेले मळभ कशाप्रकारे दूर झाले त्याचे वर्णन विद्यार्थ्याने अतिशय नेमक्या शब्दात मांडले आहे.