शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

लसीकरणाबाबत अजूनही समाजात गैरसमजुती अन अंधश्रद्धा...प्रबोधनाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

कोरोनावर ‘लस’ हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील आणि आता दुस-या ...

कोरोनावर ‘लस’ हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील आणि आता दुस-या टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरच शरीरात आजाराशी लढा देणारी प्रतिजैविके तयार होणार आहेत. असे असताना देखील लसीकरणाबाबत अद्यापही अशिक्षित मंडळींसह काही सुशिक्षितांमध्येही अनेक प्रकारच्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा असल्याची धक्कादायक बाब पाहायला मिळत आहे.

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते म्हणाले, गोसावी वस्तीमधल्या मराई समाजातील (पोतराज) माणसांचा देवावर अधिक विश्वास आहे. देवी त्यांच्या अंगात येते. देवीने सांगितल्यामुळे आम्ही लसीकरण करणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते लस घेत नाहीत. लस घेतली तर मृत्युमुखी पडू किंवा मुलं दगावतील अशी त्यांची मानसिकता आहे.

दुसरीकडे गोसावी समाजातील काही लोकांना लस घ्यायची इच्छा आहे पण भट्क्या विमुक्त जमातीतील लोकांकडे आधारकार्ड नाही, ना त्यांची शासनस्तरावर कोणती नोंदणी आहे. त्यामुळे त्यांना लस मिळणे अवघड झाले आहे. इतक्या वर्षात त्यांची शासनाने दखलच घेतलेली नाही.

---------------------------

भटक्या आणि विमुक्त समाजातील लोकांमध्ये अंधश्रद्धा असून, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आजपर्यंत कुठलीही लस घेतलेली नाही. आम्हाला काही झालेलं नाही. आम्ही केवळ अंगारा लावतो. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, असे सांगून कुणी घाबरत किंवा फसवत असेल, तर जादुटोणा विरोधी कायद्यानुसार तो गुन्हा आहे. मात्र या लोकांना कायदे माहिती नाहीत. गावाकडची अशिक्षित मंडळीं देखील लस घेतल्याने माणसं मरतात म्हणतात. आम्हाला आत्तापर्यंत झाला का कोरोना? मग आता काय होणार? अशी त्यांची धारणा आहे.

- नंदिनी जाधव, अंनिस, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष

------

लस घेणे का आवश्यक आहे?

कोणतीही लस ही आजाराचा प्रतिकार करण्यासाठी घेतली जाते. एखादा विषाणू शरीरात गेल्यानंतर त्याला निष्क्रीय करण्याचे काम लसीच्या माध्यमातून होते. विषाणूची रोग निर्माण करण्याची क्षमता काढून घेण्याचे काम ही लस करते. एकप्रकारे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी प्रतिजैविके तयार होतात. एखादा विषाणू जर शरीरात आला, तर त्याच्याविरूद्ध लढण्यासाठी पांढ-या पेशी सज्ज होतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर सौम्य ताप येणे, अशक्तपणा येणे अशा गोष्टी होऊ शकतात. काही दिवसानंतर जर रोग निर्माण करणा-या एखादया विषाणूने जर शरीरात प्रवेश केला तर त्याला प्रतिकार करण्याचे काम या पेशी करतात. कुणीही लस घेणार नाही असे म्हणत असेल तर जनजागृती करणे महत्वाचे आहे.

- डॉ. संजीव वावरे, महापालिका आरोग्य अधिकारी

------------------------