शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांपासून संसर्गाचा धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बरे झालेले इतरांंना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बरे झालेले इतरांंना संसर्ग करू शकतात का? त्यांना कार्यालयीन कामकाज करता येईल का? त्यांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता किती? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बऱ्या झालेल्या रुग्णांपासून धोका नाही, पण तरीही काळजी घेणे गरजेचेच आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

* कोरोना रुग्ण बरा होऊन आल्यानंतर इतरांना संसर्ग करू शकत नाही. त्याच्यातील त्या आजाराच्या विषाणूंची त्याला व त्याच्यापासून इतरांंना संसर्ग देण्याची तीव्रता संपलेली असते.

* ही तीव्रता १० दिवसांनंतरच संपते, पण सुरक्षा म्हणून कमी आजारी रुग्णांसाठी १४ व मध्यम, तीव्र स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी २१ दिवसांचा कालावधी शास्त्रीयदृष्टया निश्चित करण्यात आला आहे.

* कोरोनातून बरा झाला आहे, अशा रुग्णाची पुन्हा तपासणी केली तर ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते, पण ते विषाणू फॉल्स पॉझिटिव्ह असतात. त्यांचा संसर्गही होत नाही व रुग्णाला त्रासही नाही.

* बरा होऊन आलेल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना टेस्ट करून घेण्याची गरज नाही.

* बरा होऊन आलेल्या कोरोना रुग्णालाच पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी असते, कारण त्याच्यात भरपूर अँटिबॉडिज तयार झालेल्या असतात. हा परिणाम बरे झाल्यावर किमान ४ आठवडे, कमाल ६ महिने तरी टिकतो.

* बरा झालेल्या रुग्णाने लस घेणे आवश्यक आहे, पण ती ३ किंवा ६ महिन्यांनी घ्यावी व घेण्याआधी शरीरातील अँटिबॉडिज लेवल तपासून मगच घ्यावी.

* कोरोनाचे कमी, मध्यम, तीव्र असे प्रकार आहे. यातील मध्यम, तीव्र कोरोना रुग्णाला बरा झाल्यावर कोरोना होण्याची शक्यता नसते, मात्र कमी तीव्रता असलेला रुग्ण पुन्हा त्याची शिकार होऊ शकतो.

* यासाठीच बऱ्या झालेल्या रुग्णांनी मास्क, सॅनिटायझर वापरलेच पाहिजे, कारण त्यांना आजार झालाच तर ते त्वरित दुसऱ्याला संसर्ग पोहचवू शकतात.

डॉ. सुहृद सरदेसाई, कन्सल्टिंग फिजिशियन

---///

* बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णाला परत कोरोना होण्याचे प्रमाण फक्त ३ ते ४ टक्के आहे. कमी तीव्रतेचा आजार होता, तो थोड्या उपचारांनी बरा झाला अशा रुग्णांच्या बाबतीत ही शक्यता जास्त असते. पण तरीही बरा होऊन आलेल्या रुग्णाने काळजी घेणे आवश्यकच आहे. होम आयसोलेशन झालेल्या रुग्णांंनीही काळजी जास्त घ्यावी.

* रुग्णालयातून बरे होऊन घरी आलेल्या रुग्णाने लगेच लस घेऊ नये. कारण त्याच्या शरीरात आधीच अँटिबॉडिज असतात. अशा वेळी लस घेतली तर उपयोग तर नाहीच, शिवाय प्रकृतीतील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.

* त्याच्यावर उपचार झाल्यामुळे तसाही त्याला पुन्हा तोच आजार होण्याची शक्यता नसते. त्यामुळे लस घेण्याआधी शरीरातील अँटिबॉडिजची तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

* कोरोनाचा संसर्ग वेगात होत असल्याने बरे झालेल्या व कोरोना झाला नाही अशांनाही काळजी घेणे गरजेचेच आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, गर्दी टाळणे या सर्व सूचना सर्वांनीच काळजीपूर्वक पाळायला हव्यात. सध्या तेच सर्वांच्या हिताचे आहे.

डॉ. परवेज ग्रँट, संचालक, रुबी हॉल क्लिनिक

---///

* बरा झालेला रुग्ण त्याची सर्व दैनंदिन कामे, कार्यालयीन कामकाज व्यवस्थित करू शकतो. फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांना सुरुवातीच्या काळात कोरोना झाला, पण ते त्यातून बरे होऊन कार्यरत झालेही आहेत.

* कोरोना संसर्गावर बराच अभ्यास झाला आहे. बरा झालेला रुग्ण इतरांंना संसर्ग करू शकत नाही. मात्र कोरोना विषाणू हवेत फिरणारा आहे, तो बऱ्या झालेल्या रुग्णाच्या नाकात जाऊन तिथून दुसऱ्याला संसर्गित करू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचेच आहे.

* वय वाढते तशी प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे प्रतिकारशक्ती किती आहे, त्याची तपासणी वाढत्या वयाचा विचार करता करून घेणे सुरक्षेचे आहे.

* लस तुम्हाला काही प्रमाणात सुरक्षित करत असते. पण सामूहिक सुरक्षा तेव्हाच निर्माण होईल ज्यावेळी आपल्या देशाचे ८० ते ९० टक्के लसीकरण होईल.

* त्यामुळे सध्या तरी बऱ्या झालेल्या रुग्णांसह सर्वांनीच मास्क, सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करायलाच हवे.

डॉ. अमित द्रविड, संसर्ग रोगतज्ज्ञ. नोबेल रुग्णालय