शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच नाही

By admin | Updated: October 17, 2015 01:03 IST

बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती.

पुणे : बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती. तसेच ३५ हजार ६0८ विद्यार्थी बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, सकाळपासूनच ही वेबसाईट चालूच होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत याची आकडेवारी मिळू शकली नाही. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना शालेय दस्तऐवज संगणीकृत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. यात जिल्ह्यातील एकूण शाळा, चालू शाळा, विद्यार्थी संख्या याचबरोबर सुविधांची माहिती यात भरावयाची होती. ही माहिती भरण्यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख होती. मात्र आज ही साईटच ओपन झाली नसल्याने बहुतांश शाळांना नोंदीच करता आल्या नाहीत. वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील शाळांची पटसंख्येची माहिती शासनाने मागविली होती. त्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ५ हजार २९३ शाळांमध्ये ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थीसंख्या असल्याचे शिक्षण विभागाने कळविले होते. त्या माहितीच्या अधारे ‘सरल’च्या माध्यमातून आॅनलाईन नोंदी करण्याचे आवाहन शाळांना शासनाने केले होते. १३ आॅक्टोबरपर्यंत या माध्यमातून झालेल्या नोंदींनुसार जिल्ह्यात ५ हजार २00 शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. म्हणजे ९३ शाळांच्या अद्याप नोंदीच झाल्या नाहीत.जर शेवटच्या दोन दिवसांत काही शाळांनी नोंदी केल्या असल्या तरी सुमारे ६0 ते ६५ शाळा या विविध कारणांनी बंद असल्याचे सुत्रांनी सांगितले. यात कमी पटसंख्या हे महत्वाचे कारण आहे. (प्रतिनिधी)>>३५,६०८ विद्यार्थी गायबजिल्ह्यातील ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख १० हजार ९७५ विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. सुमारे ३५ हजार ६०८ विद्यार्थी गायब आहेत. यातही सर्वाधिक हवेली तालुक्यात २७ हजार २५१, जुन्नरमध्ये ३ हजार ५१६, मुळशीत १ हजार १८४, दौंडमध्ये १ हजार १२४ तर भोरमध्ये १ हजार ११५ विद्यार्थ्यांची नोंदच नाही. इतर तालुक्यांत मावळमध्ये ९६७, आंबेगावमध्ये ९४३, खेडमध्ये ५४६, शिरूरमध्ये ४४०, विद्यार्थ्यांच्या नोंदी नाहीत., तर इंदापूर तालुक्यात शाळांची संख्या कमी होऊनही विद्यार्थिसंख्या १ हजार २४ नी वाढली आहे. त्यापाठोपाठ बारामतीती ३१५, पुरंदरमध्ये १२५ तर वेल्हेमध्ये १३ विद्यार्थी जास्त झाले आहेत.>>शेवटच्या दिवसापर्यंत ज्या शाळांच्या नोंदी झाल्या नाहीत, त्या कशामुळे बंद आहेत किंवा त्यांनी का नोंदी केल्या नाहीत, याची माहिती घेण्याच्या सूचना तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या जातील. त्यानंतरच वास्तव परिस्थिती समोर येईल.- संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकार, प्राथमिक