शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच नाही

By admin | Updated: October 17, 2015 01:03 IST

बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती.

पुणे : बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती. तसेच ३५ हजार ६0८ विद्यार्थी बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, सकाळपासूनच ही वेबसाईट चालूच होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत याची आकडेवारी मिळू शकली नाही. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना शालेय दस्तऐवज संगणीकृत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. यात जिल्ह्यातील एकूण शाळा, चालू शाळा, विद्यार्थी संख्या याचबरोबर सुविधांची माहिती यात भरावयाची होती. ही माहिती भरण्यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख होती. मात्र आज ही साईटच ओपन झाली नसल्याने बहुतांश शाळांना नोंदीच करता आल्या नाहीत. वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील शाळांची पटसंख्येची माहिती शासनाने मागविली होती. त्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ५ हजार २९३ शाळांमध्ये ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थीसंख्या असल्याचे शिक्षण विभागाने कळविले होते. त्या माहितीच्या अधारे ‘सरल’च्या माध्यमातून आॅनलाईन नोंदी करण्याचे आवाहन शाळांना शासनाने केले होते. १३ आॅक्टोबरपर्यंत या माध्यमातून झालेल्या नोंदींनुसार जिल्ह्यात ५ हजार २00 शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. म्हणजे ९३ शाळांच्या अद्याप नोंदीच झाल्या नाहीत.जर शेवटच्या दोन दिवसांत काही शाळांनी नोंदी केल्या असल्या तरी सुमारे ६0 ते ६५ शाळा या विविध कारणांनी बंद असल्याचे सुत्रांनी सांगितले. यात कमी पटसंख्या हे महत्वाचे कारण आहे. (प्रतिनिधी)>>३५,६०८ विद्यार्थी गायबजिल्ह्यातील ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख १० हजार ९७५ विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. सुमारे ३५ हजार ६०८ विद्यार्थी गायब आहेत. यातही सर्वाधिक हवेली तालुक्यात २७ हजार २५१, जुन्नरमध्ये ३ हजार ५१६, मुळशीत १ हजार १८४, दौंडमध्ये १ हजार १२४ तर भोरमध्ये १ हजार ११५ विद्यार्थ्यांची नोंदच नाही. इतर तालुक्यांत मावळमध्ये ९६७, आंबेगावमध्ये ९४३, खेडमध्ये ५४६, शिरूरमध्ये ४४०, विद्यार्थ्यांच्या नोंदी नाहीत., तर इंदापूर तालुक्यात शाळांची संख्या कमी होऊनही विद्यार्थिसंख्या १ हजार २४ नी वाढली आहे. त्यापाठोपाठ बारामतीती ३१५, पुरंदरमध्ये १२५ तर वेल्हेमध्ये १३ विद्यार्थी जास्त झाले आहेत.>>शेवटच्या दिवसापर्यंत ज्या शाळांच्या नोंदी झाल्या नाहीत, त्या कशामुळे बंद आहेत किंवा त्यांनी का नोंदी केल्या नाहीत, याची माहिती घेण्याच्या सूचना तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या जातील. त्यानंतरच वास्तव परिस्थिती समोर येईल.- संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकार, प्राथमिक