शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

चोवीस तास पाणी देण्याचा उद्देशच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:08 IST

पुणे : मोठा गाजावाजा करीत आणलेल्या समान पाणी पुरवठा योजनेचा पुणेकरांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचा उद्देशच नसल्याची कबुली ...

पुणे : मोठा गाजावाजा करीत आणलेल्या समान पाणी पुरवठा योजनेचा पुणेकरांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचा उद्देशच नसल्याची कबुली पालिकेच्या अधिका-यांनी सजग नागरिक मंचाच्या ऑनलाईन चर्चासत्रात दिली. या योजनेचे डिझाईन तशा पद्धतीने करण्यात आलेले असले तरी एक समान पाणी देण्यासाठी ही योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यासाठी किती पाणी द्यायचे हे सर्वस्वी पाटबंधारे विभागावर अवलंबून असल्याने २४ तास पाणी पुरवठा नेमका कधी होऊ शकेल याबाबत सांगता येत नसल्याचेही अधिकारी म्हणाले. त्यामुळे चर्चासत्रात सहभागी झालेल्यांनी या योजनेच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली.

सजग नागरिक मंचाच्या मासिक सभेमध्ये या योजनेची माहिती देण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता नंदकुमार जगताप, कनिष्ठ अभियंता व्ही. सी. क्षीरसागर उपस्थित होते. तर, सजगचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी, सारंग यादवडकर, कनीज सुखरानी आदी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी, क्षीरसागर यांनी योजनेची माहिती देताना, जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या, मीटर बसविणे याच्या नियोजनाबाबत सांगितले. तसेच, आजमितीस असलेले लिकेज बंद करणे, टाक्यांची धारण क्षमता वाढविणे, पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित करणे यासोबतच नागरिकांचा ‘हेल्थ इंडेक्स’ वाढविण्याचा उद्देश असल्याचेही सांगितले. या योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा डिजीटाईज असून त्याचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. २०४७ सालापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरुन योजनेचे नियोजन केल्याचे अधिका-यांनी सांगितले.

यावेळी, राठी, यादवडकर, वेलणकर आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र अधिका-यांची तारांबळ उडाली. २४ तास पाणी देण्याकरिता किती पाणी गृहीत धरावे लागेल? याचे गणितच अधिका-यांना मांडता आले नाही.

====