शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

संमेलनात पक्षीय बडेजाव नको

By admin | Updated: September 22, 2016 01:55 IST

राजकारणातील अथवा या प्रसंगी औचित्य नसणाऱ्या राजकीय व्यक्तींची अकारण उपस्थिती व अन्यबाबींसाठी संमेलनाचा वापर केला जाणार नाही, असा फतवाच निमंत्रक संस्थेसाठी काढला आहे.

पुणे : गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनामध्ये वाढत असलेल्या राजकीय हस्तक्षेपाला लगाम घालण्यासाठी साहित्य महामंडळाने पक्षीय बडेजावासह राजकारणातील अथवा या प्रसंगी औचित्य नसणाऱ्या राजकीय व्यक्तींची अकारण उपस्थिती व अन्यबाबींसाठी संमेलनाचा वापर केला जाणार नाही, असा फतवाच निमंत्रक संस्थेसाठी काढला आहे. महामंडळाकडून निमंत्रक संस्थेवर अशा प्रकारे बंधन आणण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. आजवर राजकीय पाठबळ आणि राजकारण्यांशिवाय संमेलनाचे कोणतेच पान हललेले नाही, असा इतिहास असल्यामुळे महामंडळाच्या या तंबीने संस्था चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलन हे साधेपणाने असावे, भपकेबाजपणा नसावा, असा सूर अनेक वर्षांपासून आळविला जात आहे, संमेलन आटोपशीर करायचे झाले, तरी ते कोटीच्या घरात पोहोचतेच, असा दावा निमंत्रक संस्थांकडून अनेकदा करण्यात आला आहे. संमेलनासाठी शासनाकडे भीक कशाला मागायची? अशी टिवटिव करणाऱ्या महामंडळाच्या अध्यक्षांनी शासनाकडेच संमेलनासाठी १ कोटी रुपयांची मागणी करून ‘यू टर्न’ घेतला असल्याचे सर्वश्रुत आहेच! यातच तीन ते चार वर्षांपासून संमेलन पुढे रेटण्यासाठी स्वागताध्यक्षापासून उद्घाटनापर्यंतची दोरी राजकारण्यांच्या हातात देण्यात आल्याने त्यांच्या जिवावरच संमेलनाची कोटीच्या कोटी उड्डाणे झाली आहेत, हे सत्यही नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)ऐश्वर्याचे, संपत्तीचे प्रदर्शन टाळापुढील वर्षी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. डोंबिवलीसारख्या भागात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने राजकीय पक्षाला डावलून हे संमेलन घेणे आयोजकांनाही डोईजड होणार आहे. मात्र, महामंडळाने संमेलनाच्या आयोजनातच कोणत्याही व्यक्तिगत अथवा पक्षीय बडेजावाचे, ऐश्वर्याचे, संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ व या संमेलनाचा वापर होणार नाही. उद्घाटन व समारोपाच्याप्रसंगी, तसेच अन्यथा या क्षेत्रातील मान्यवरांशिवाय, महामंडळ तसेच निमंत्रक संस्थेचे मान्यवर पदाधिकारी वगळता इतर क्षेत्रातील अत्यंत आवश्यक व मोजक्याच अशा एखाद- दुसऱ्या अतिमहत्त्वाच्या जनप्रतिनिधी वा व्यक्तींव्यतिरिक्त अन्य उपस्थितीने अकारण व्यापले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास निमंत्रक संस्थेला सांगितले आहे. यामुळे संस्थेच्या अडचणीतच अधिक भर पडण्याची शक्यता आहे.