शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

चार महिने प्रभाग समितीची बैठक नाही

By admin | Updated: July 4, 2017 03:32 IST

जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांपैकी काही सदस्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रभाग समितीची एकही बैठक घेतले नाही. त्यामुळे स्थानिक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांपैकी काही सदस्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रभाग समितीची एकही बैठक घेतले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अधिकारी, नवीन सदस्यांना व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने प्रभाग समितीच्या बैठका होत नाही, असे एका सदस्याने सांगितले. प्रभाग समितीच्या बैठका महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घेणे आवश्यक आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई म्हणाले, सर्व मतदार संघामध्ये प्रभाग समितीच्या बैठका होतात. नुकतेच भोर आणि वेल्हा तालुक्यामध्ये बैठका झाल्या आहेत. जर कुठल्या मतदार संघामध्ये बैठका होत नसल्यास तसे सदस्यांनी त्वरित कळवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. प्रभाग समितीच्या बैठका घेतल्यास स्थानिक पातळीवर समस्या सुटतात. नाही तर, या समस्या सोडविण्यासाठी नागरिक जिल्हा परिषदेकडे येतात. यामुळे नागरिक आणि अधिकाऱ्यांचा वेळ जातो. यामुळे प्रभाग समितीच्या बैठका होणे आवश्यक आहे. - शरद बुट्टे-पाटील, भाजपाचे गटनेते, जिल्हा परिषदप्रभाग समितीच्या बैठका नियमितपणे घेतल्यास अनेक समस्या सुटतील. त्यामुळे नागरिकांना जिल्हा परिषदेत फेऱ्या माराव्या लागणार नाही. त्यातून नागरिकांची कामे स्थानिक पातळीवर सुटून विकासकामांना चालना मिळेल.- राणी शेळके, सभापती, महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या प्रभाग समितीच्या बैठकी नियमितपणे होणे गरजेचे आहे. या बैठका जर झाल्या तर खोळंबलेली अनेक विकासकामे मार्गी लागतील. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सदस्यांना यामध्ये सहकार्य करून बैठका घेण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. - प्रवीण माने, सभापती, आरोग्य व बांधकाम, जिल्हा परिषदअधिकारी सहकार्य करीत नाहीतप्रभाग समितीमध्ये सुचविलेल्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषद देणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सदस्य प्रभाग समितीच्या बैठका घेत नाही. अधिकारी प्रभाग समिती घेण्यासाठी मदत करत नाहीत. यामुळे प्रभाग समितीच्या बैठका घेता येत नाही, असा आरोप सदस्यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे. बैठका होत नसल्याने समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.