शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

रेडीरेकनर दरामध्ये वाढ नाही, बांधकाम व्यवसाय, घर खरेदीदारांना मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे लावाव्या लागलेल्या लॉकडाऊनचा बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वषी रेडीरेकनरच्या दरामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे लावाव्या लागलेल्या लॉकडाऊनचा बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वषी रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ होणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सलग तीन वर्ष रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

राज्याच्या मुद्रांकशुल्क विभागाने तएक एप्रिलपासून लागू होणाऱ्या रेडीरेकनर मध्ये जास्तीत जास्त दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली होती. परंतु शासनाने कोणतीही दरवाढ न करता सध्या असणारे मुद्रांक शुल्काचे दर कायम ठेवले आहेत.

महिला खरेदीदारांसाठी एक टक्का सवलत

राज्य शासनाने महिला खरेदीदारांसाठी मुद्रांकशुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल पासून ही योजना लागू होईल. या योजनेचा लाभ घेतलेल्या महिला खरेदीदाराला रहिवासी घटकाच्या खरेदीच्या दिनांकापासून पुढे पंधरा वर्षाच्या कालावधी पर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदाराला मिळकत विकता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन केल्यास कमी भरलेले एक टक्का मुद्रांकशुल्क दंड म्हणून भरावा लागेल, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या मुद्रांकशुल्क सवलतीचा लाभ हा केवळ एक किंवा अनेक महिला खरेदीदार असलेल्या केवळ कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाशी संबंधित उदा. सदिनका, प्लॉट, वैयक्तिक बंगला, रो हाउस किंवा कोणतेही स्वतंत्र घर यांच्या खरेदी-विक्रीसाठी होणाऱ्या दस्तावर ही सवलत दे असेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

उद्दिष्ट पूर्ण, 22 हजार कोटी रुपयांचा महसूल

कोरोना महामारी तसेच नागरिकांना मुद्रांक शुल्क सवलती देऊनही राज्यात गेल्या वर्षभरात मुद्रांक शुल्काचा 22 हजार 370 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. वर्षभरात 21 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. ते साध्य झाले असून जवळपास 26 लाख 64 हजार दस्त नोंदणी झाली आहे.

राज्य सरकारने गेल्या वर्षभरात सप्टेंबर ते मार्च या कालावधीमध्ये मुद्रांक शुल्कात सवलत योजना जाहीर केली होती. कोरोना महामारी आणि मंदीचे वातावरण असूनही मुद्रांक शुल्क सवलतीमुळे उद्दिष्ट प्राप्त करता आले. एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये दत्त नोंदीला अत्यल्प प्रतिसाद होता. त्यानंतर जून ते ऑगस्ट दरम्यान काही प्रमाणात दस्तनोंदणी वाढली. सवलत योजना घोषित केल्यानंतर नागरिकांनी दस्तनोंदणीला मोठा प्रतिसाद दिला.