शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती नाही

By admin | Updated: July 8, 2015 01:20 IST

‘‘राज्यात पुढच्या वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा साखर उद्योग आणखीन अडचणीत येतो की काय असे वाटते,’’

दौंड : ‘‘राज्यात पुढच्या वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा साखर उद्योग आणखीन अडचणीत येतो की काय असे वाटते,’’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पवार म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत साखरेचे भाव कमी झाले आहेत. परिणामी ऊसउत्पादक सभासदांना एफआरपीप्रमाणे दर देता आला नाही. साखरेचे भाव कमी झाल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसला आहे. ही गंभीर बाब आहे. तेव्हा साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन साखर कारखान्यांच्या संदर्भात सकारात्मक धोरण अवलंबिले पाहिजे, की जेणेकरून साखर कारखानदारी मोडीत निघणार नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’’ पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांबरोबरीने समाजातील इतर अन्य घटक अडचणीत येईल आणि याचा परिणाम आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होण्यात होईल. तेव्हा उपलब्ध आहे ते पाणी जपून वापरावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.