शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती नाही

By admin | Updated: July 8, 2015 01:20 IST

‘‘राज्यात पुढच्या वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा साखर उद्योग आणखीन अडचणीत येतो की काय असे वाटते,’’

दौंड : ‘‘राज्यात पुढच्या वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा साखर उद्योग आणखीन अडचणीत येतो की काय असे वाटते,’’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पवार म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत साखरेचे भाव कमी झाले आहेत. परिणामी ऊसउत्पादक सभासदांना एफआरपीप्रमाणे दर देता आला नाही. साखरेचे भाव कमी झाल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसला आहे. ही गंभीर बाब आहे. तेव्हा साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन साखर कारखान्यांच्या संदर्भात सकारात्मक धोरण अवलंबिले पाहिजे, की जेणेकरून साखर कारखानदारी मोडीत निघणार नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’’ पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांबरोबरीने समाजातील इतर अन्य घटक अडचणीत येईल आणि याचा परिणाम आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होण्यात होईल. तेव्हा उपलब्ध आहे ते पाणी जपून वापरावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.