शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

टाळेबंदीमुळे संसर्गाची साखळी तुटल्याचा नाही पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST

वैद्यकतज्ज्ञांचे ठाम मत : ''आम्ही काहीतरी करत आहोत'' हे दाखवण्याचा सरकारचा अट्टहास तज्ज्ञांचे स्पष्टीकरण : टाळेबंदी कशासाठी लादतात कोण ...

वैद्यकतज्ज्ञांचे ठाम मत : ''आम्ही काहीतरी करत आहोत'' हे दाखवण्याचा सरकारचा अट्टहास

तज्ज्ञांचे स्पष्टीकरण : टाळेबंदी कशासाठी लादतात कोण जाणे?

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षीच्या टाळेबंदीचा उपयोग कोरोना प्रसार रोखण्यासाठी कितपत झाला, याबाबत भारतात कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. टाळेबंदी आणि कोरोना संसर्ग रोखणे यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यास शास्त्रीय आधार नाही किंवा याचा अभ्यासही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याचे सांगत लादलेली टाळेबंदी अशास्त्रीय आणि अतार्किक असल्याचा सूर तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

कोरोना विषाणूच्या सुप्तावस्थेचा (इनक्युबेशन पीरियड) कालावधी साधारणपणे १४ दिवसांचा असतो. या १४ दिवसांनी विषाणूची घातकता आणि प्रसाराची ताकद कमी होऊ लागते. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी योग्य मानला जातो. गेल्यावर्षी २४ मार्च रोजी देशभर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीचा उपयोग हा प्रामुख्याने वैद्यकीय यंत्रणा तत्पर करण्यासाठी झाला. अपुऱ्या सुविधा, रुग्णालयांमधल्या खाटांची कमतरता भरून काढणे, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरयुक्त खाटांची उपलब्धता निर्माण करणे यासाठी टाळेबंदीचा उपयोग झाला. मात्र या टाळेबंदीमुळे कोरोना संसर्गाची साखळीच तुटली हे सिद्ध करणारा अभ्यास झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभरानंतरही पुन्हा टाळेबंदीचा निर्णय राज्य सरकारने का घेतला आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच विषाणू तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनाही पडला आहे. गेल्यावर्षीची टाळेबंदी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यासाठी होता. आता यावर्षी गेल्या एक वर्षभराचा अनुभव राज्यकर्ते, प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेच्या गाठीशी आहे. असे असतानाही जमावबंदी, संचारबंदी लादून काय साध्य होणार, कोरोनाचा प्रसार फक्त संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेतच होतो आणि एरवी तो होत नाही, असे सरकारला वाटते का, अशा उद्विग्न प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.

चौकट

न्यायालयानेही उपस्थित होती हीच शंका

गेल्या वर्षी एका खटल्याचा निकाल देताना, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदी करावी लागते याला काही शास्त्रीय आधार आहे काय, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला केला होता. त्यावर सरकारला उत्तर देता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून (दि.३) पुण्यात पुन्हा लागू केलेल्या आठवड्याच्या अंशत: टाळेबंदीतून प्रशासन काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. कोरोनाच्या संकटाकडे आता राजकीय, पक्षीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. ‘साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकार काहीतरी करत आहे’, हे दाखवण्याचा राज्यकर्त्यांचा केविलवाणा अट्टहास असल्याचे ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

“कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी गेल्यावर्षी जो पहिला २१ दिवसांची टाळेबंदी लागली, त्या वेळेचा उपयोग देशात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी झाला. त्यावेळी साधे मास्क, जंतूनाशक, पीपीई कीट ही आवश्यक सामग्रीही पुरेशा प्रमाणात देशात नव्हती. मात्र वर्षभरानंतरही समाज जबाबदारीने वागत नसल्याने धाक निर्माण करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असावेत.”

- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

चौकट

भारतात टाळेबंदीचा उपयोग नाही

“लॉकडाऊनला कोणताही शास्त्रीय आधार नाही. तत्व म्हणून एखादी बाब योग्य असते, मात्र वास्तवात त्याचा उपयोग नसतो. साथ रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या, त्यांचा किती उपयोग झाला याचा अभ्यासच झालेला नाही. टाळेबंदीमुळे संसर्गाची साखळी तुटते, असा पुरावाही नाही. मोजकी रुग्णसंख्या असताना टाळेबंदी शक्य असू शकते. मात्र, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हा उपाय योग्य नाही. कोरोना दिवसा पसरतो आणि रात्री पसरत नाही, असे सरकारला वाटते का का?”

- डॉ. मिलिंद वाटवे, जैवशास्त्रज्ञ