शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीमुळे संसर्गाची साखळी तुटल्याचा नाही पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST

वैद्यकतज्ज्ञांचे ठाम मत : ''आम्ही काहीतरी करत आहोत'' हे दाखवण्याचा सरकारचा अट्टहास तज्ज्ञांचे स्पष्टीकरण : टाळेबंदी कशासाठी लादतात कोण ...

वैद्यकतज्ज्ञांचे ठाम मत : ''आम्ही काहीतरी करत आहोत'' हे दाखवण्याचा सरकारचा अट्टहास

तज्ज्ञांचे स्पष्टीकरण : टाळेबंदी कशासाठी लादतात कोण जाणे?

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षीच्या टाळेबंदीचा उपयोग कोरोना प्रसार रोखण्यासाठी कितपत झाला, याबाबत भारतात कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. टाळेबंदी आणि कोरोना संसर्ग रोखणे यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यास शास्त्रीय आधार नाही किंवा याचा अभ्यासही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याचे सांगत लादलेली टाळेबंदी अशास्त्रीय आणि अतार्किक असल्याचा सूर तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

कोरोना विषाणूच्या सुप्तावस्थेचा (इनक्युबेशन पीरियड) कालावधी साधारणपणे १४ दिवसांचा असतो. या १४ दिवसांनी विषाणूची घातकता आणि प्रसाराची ताकद कमी होऊ लागते. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी योग्य मानला जातो. गेल्यावर्षी २४ मार्च रोजी देशभर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीचा उपयोग हा प्रामुख्याने वैद्यकीय यंत्रणा तत्पर करण्यासाठी झाला. अपुऱ्या सुविधा, रुग्णालयांमधल्या खाटांची कमतरता भरून काढणे, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरयुक्त खाटांची उपलब्धता निर्माण करणे यासाठी टाळेबंदीचा उपयोग झाला. मात्र या टाळेबंदीमुळे कोरोना संसर्गाची साखळीच तुटली हे सिद्ध करणारा अभ्यास झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभरानंतरही पुन्हा टाळेबंदीचा निर्णय राज्य सरकारने का घेतला आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच विषाणू तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनाही पडला आहे. गेल्यावर्षीची टाळेबंदी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यासाठी होता. आता यावर्षी गेल्या एक वर्षभराचा अनुभव राज्यकर्ते, प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेच्या गाठीशी आहे. असे असतानाही जमावबंदी, संचारबंदी लादून काय साध्य होणार, कोरोनाचा प्रसार फक्त संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेतच होतो आणि एरवी तो होत नाही, असे सरकारला वाटते का, अशा उद्विग्न प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.

चौकट

न्यायालयानेही उपस्थित होती हीच शंका

गेल्या वर्षी एका खटल्याचा निकाल देताना, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदी करावी लागते याला काही शास्त्रीय आधार आहे काय, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला केला होता. त्यावर सरकारला उत्तर देता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून (दि.३) पुण्यात पुन्हा लागू केलेल्या आठवड्याच्या अंशत: टाळेबंदीतून प्रशासन काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. कोरोनाच्या संकटाकडे आता राजकीय, पक्षीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. ‘साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकार काहीतरी करत आहे’, हे दाखवण्याचा राज्यकर्त्यांचा केविलवाणा अट्टहास असल्याचे ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

“कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी गेल्यावर्षी जो पहिला २१ दिवसांची टाळेबंदी लागली, त्या वेळेचा उपयोग देशात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी झाला. त्यावेळी साधे मास्क, जंतूनाशक, पीपीई कीट ही आवश्यक सामग्रीही पुरेशा प्रमाणात देशात नव्हती. मात्र वर्षभरानंतरही समाज जबाबदारीने वागत नसल्याने धाक निर्माण करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असावेत.”

- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

चौकट

भारतात टाळेबंदीचा उपयोग नाही

“लॉकडाऊनला कोणताही शास्त्रीय आधार नाही. तत्व म्हणून एखादी बाब योग्य असते, मात्र वास्तवात त्याचा उपयोग नसतो. साथ रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या, त्यांचा किती उपयोग झाला याचा अभ्यासच झालेला नाही. टाळेबंदीमुळे संसर्गाची साखळी तुटते, असा पुरावाही नाही. मोजकी रुग्णसंख्या असताना टाळेबंदी शक्य असू शकते. मात्र, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हा उपाय योग्य नाही. कोरोना दिवसा पसरतो आणि रात्री पसरत नाही, असे सरकारला वाटते का का?”

- डॉ. मिलिंद वाटवे, जैवशास्त्रज्ञ