शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

...तर टंचाईला सामोरे जावे लागेल

By admin | Updated: June 24, 2016 01:58 IST

सन १९७२ च्या दुष्काळानंतर व १९८८ नंतर प्रथमच मंचर शहरासाठी वडगाव काशिंबेग येथील पद्मावती कुंडावरून पाणी न्यावे लागले आहे

मंचर : सन १९७२ च्या दुष्काळानंतर व १९८८ नंतर प्रथमच मंचर शहरासाठी वडगाव काशिंबेग येथील पद्मावती कुंडावरून पाणी न्यावे लागले आहे. २५ अश्वशक्तीचे दोन पंप लावून हे पाणी सायंकाळी उपसण्यात आल्याने शहराला काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले आहे. पाऊस लांबला तर मंचर शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.मंचर शहराला सुलतानपूर येथून पाणीपुरवठा होतो. पावसाअभावी सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा पडला आहे. सुरुवातीस वडगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने काही दिवस पाणीपुरवठा सुरू ठेवता आला. बंधाऱ्यातील पाणी संपल्याने पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पाणीबाणी निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला अक्षरश: घोड नदीवर तळ ठोकावा लागला.मागील चार दिवसांपासून पाणीच संपले, तेव्हा नदीपात्रातील डोह फोडून पाणी आणण्याचा प्रयत्न झाला. शेवटी वडगाव काशिंबेग येथील पद्मावती कुंडावरून पाणी उपसण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला. यापूर्वी १९७२ व १९८८ या दोन वर्षी मंचर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी या कुंडातून पाणी उपसण्यात आले होते. २८ वर्षांनंतर पुन्हा ही वेळ आलेली आहे.