शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

...तर पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी

By admin | Updated: May 4, 2016 04:36 IST

दौंड-इंदापूरसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी व तेही कालव्याने सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला डावलून घेतला आहे. त्यामुळे पुण्याला दोन दिवसांतू

पुणे : दौंड-इंदापूरसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी व तेही कालव्याने सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला डावलून घेतला आहे. त्यामुळे पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जाण्याची शक्यता पाटबंधारे खात्यातील अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली, तर त्याला पालकमंत्रीच जबाबदार असतील, अशी टीका महापौर प्रशांत जगताप यांनी केली.दौंड-इंदापूरला पाणी देताना पालकमंत्री गिरीश बापट पुण्याचा विचार करीत नाहीत. त्यांचे पुण्यातील सर्व आमदारही मूग गिळून गप्प बसले आहेत. महापौर म्हणून आपल्यासह सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून पालकमंत्र्यांनी दौंड-इंदापूरला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, असा आरोप महापौर जगताप यांनी केला. आॅक्टोबरमध्ये पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. त्यांनी केले नाही. आता ते करीत असलेले नियोजनही चुकीचेच आहे. त्यांना अर्धा टीमसी पाणी हवे आहे, मात्र पालकमंत्र्यांनी १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातून पुण्यासाठी येत्या महिनाभरात भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. खुद्द पाटबंधारे खात्याचे अधिकारीही खासगीत बोलताना पुण्याला दोन दिवसाआड पाणी द्यावे लागेल, असे बोलत असल्याचे महापौर म्हणाले.कालव्याने पाणी सोडले, तर ते तिथे पोहोचण्यासाठी ३ दिवस लागतील. कालवा कोरडा आहे. बरेचसे पाणी झिरपून जाईल. शेतीसाठी पाणी चोरले जाईल. त्यामुळेच महापालिकेने पाणी टँकरने द्यावे, असा पर्याय दिला होता. त्यासाठी होणारा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. तसे लेखी पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पालकमंत्र्यांनी त्याचा विचारच केला नाही व १ टीएमसी पाणी कालव्याने सोडण्याचा निर्णय घेतला. असे करून ते कोणाचे भले करीत असतील, पुणेकरांचे मात्र नुकसानच करीत आहे, असे महापौर म्हणाले. (प्रतिनिधी)टँकरचा खर्च करायला पालिका तयारटँकरला फार खर्च येईल असे म्हणतात, मात्र पालिका तो खर्च करायला तयार आहे. त्यात काही अडचणी असतील, तर महापौरांचा निधी त्यासाठी खर्च करण्याची तयारी आहे.पण पालकमंत्र्यांनी अजूनही विचार करावा. महापालिकेला विश्वासात न घेता केलेला कालव्याने पाणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन महापौर जगताप यांनी केले. ५ लाख वारकऱ्यांना पाणी दिलेच पाहिजेपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी असे करण्यास विरोध केला होता, अशी आपली माहिती असल्याचे सांगून महापौर म्हणाले, की पुण्याच्या पाण्यात कसलीही कपात होणार नाही, असे ते म्हणतात. मात्र, त्यांच्या नियोजनात पुण्यात जूनमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या पाण्याचे नियोजनच केलेले नाही. किमान ५ लाख वारकरी पुण्यात येतात. त्यांना पाणी देता आले नाही, तर अवघड होईल. मनसेने केलेले आंदोलन चुकीचेच आहे, मात्र अशी स्थिती आगामी काळात निर्माण होणार नाहीच, असे नाही. दुर्दैवाने तसे झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यांचीच असेल, असा इशारा महापौरांनी दिला.