शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी

By admin | Updated: May 4, 2016 04:36 IST

दौंड-इंदापूरसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी व तेही कालव्याने सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला डावलून घेतला आहे. त्यामुळे पुण्याला दोन दिवसांतू

पुणे : दौंड-इंदापूरसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी व तेही कालव्याने सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला डावलून घेतला आहे. त्यामुळे पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जाण्याची शक्यता पाटबंधारे खात्यातील अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली, तर त्याला पालकमंत्रीच जबाबदार असतील, अशी टीका महापौर प्रशांत जगताप यांनी केली.दौंड-इंदापूरला पाणी देताना पालकमंत्री गिरीश बापट पुण्याचा विचार करीत नाहीत. त्यांचे पुण्यातील सर्व आमदारही मूग गिळून गप्प बसले आहेत. महापौर म्हणून आपल्यासह सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून पालकमंत्र्यांनी दौंड-इंदापूरला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, असा आरोप महापौर जगताप यांनी केला. आॅक्टोबरमध्ये पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. त्यांनी केले नाही. आता ते करीत असलेले नियोजनही चुकीचेच आहे. त्यांना अर्धा टीमसी पाणी हवे आहे, मात्र पालकमंत्र्यांनी १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातून पुण्यासाठी येत्या महिनाभरात भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. खुद्द पाटबंधारे खात्याचे अधिकारीही खासगीत बोलताना पुण्याला दोन दिवसाआड पाणी द्यावे लागेल, असे बोलत असल्याचे महापौर म्हणाले.कालव्याने पाणी सोडले, तर ते तिथे पोहोचण्यासाठी ३ दिवस लागतील. कालवा कोरडा आहे. बरेचसे पाणी झिरपून जाईल. शेतीसाठी पाणी चोरले जाईल. त्यामुळेच महापालिकेने पाणी टँकरने द्यावे, असा पर्याय दिला होता. त्यासाठी होणारा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. तसे लेखी पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पालकमंत्र्यांनी त्याचा विचारच केला नाही व १ टीएमसी पाणी कालव्याने सोडण्याचा निर्णय घेतला. असे करून ते कोणाचे भले करीत असतील, पुणेकरांचे मात्र नुकसानच करीत आहे, असे महापौर म्हणाले. (प्रतिनिधी)टँकरचा खर्च करायला पालिका तयारटँकरला फार खर्च येईल असे म्हणतात, मात्र पालिका तो खर्च करायला तयार आहे. त्यात काही अडचणी असतील, तर महापौरांचा निधी त्यासाठी खर्च करण्याची तयारी आहे.पण पालकमंत्र्यांनी अजूनही विचार करावा. महापालिकेला विश्वासात न घेता केलेला कालव्याने पाणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन महापौर जगताप यांनी केले. ५ लाख वारकऱ्यांना पाणी दिलेच पाहिजेपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी असे करण्यास विरोध केला होता, अशी आपली माहिती असल्याचे सांगून महापौर म्हणाले, की पुण्याच्या पाण्यात कसलीही कपात होणार नाही, असे ते म्हणतात. मात्र, त्यांच्या नियोजनात पुण्यात जूनमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या पाण्याचे नियोजनच केलेले नाही. किमान ५ लाख वारकरी पुण्यात येतात. त्यांना पाणी देता आले नाही, तर अवघड होईल. मनसेने केलेले आंदोलन चुकीचेच आहे, मात्र अशी स्थिती आगामी काळात निर्माण होणार नाहीच, असे नाही. दुर्दैवाने तसे झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यांचीच असेल, असा इशारा महापौरांनी दिला.