शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जोवर माणसांना एकमेकांशी बोलायची गरज वाटते तोवर रंगभूमी अमर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 21:53 IST

' नसीर अत्यंत प्रामाणिक. विद्यार्थी, नवोदित कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास मी त्याच्याबरोबर केला आहे. आपल्याला अभिरुची असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध त्याने अधाशासारखा घेतला आहे'. Theater culture is not dead until people need to talk to each other:

पुणे :जोवर माणसांना एकमेकांशी बोलायची गरज वाटते तोवर रंगभूमी अमर आहे ,असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी नसरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले. पुण्यात त्यांना तन्वीर सन्मान प्रदान करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. 

पुण्यात रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा तन्वीर सन्मान ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक गोंविद निहलानी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुण्यात प्रायोगिक रंगभूमी रूजविणाऱ्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरला 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार' देण्यात आला.याप्रसंगी किरण यज्ञोपवित, शुभांगी दामले, प्रमोद काळे, रत्ना पाठक शाह, दीपा लागू आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेते बेंजामिन गिलानी यांनाही गौरवण्यात आले.   

पुढे ते म्हणाले की, पन्नास वर्षांपासून ऐकतो आहे, की रंगभूमी मरत आहे. तिच्या जीवाला धोका आहे, तिला नव्या श्वासाची गरज आहे वगैरे, मात्र मला तसं अजिबात वाटतं नाही. काही लोक ज्यांना रंगभूमीवर कोणत्याही हेतूशिवाय प्रेम करतात तोवर रंगभूमीला मरण नाही. लोकांना एकमेकांशी बोलायची गरज वाटते तो रंगभूमी अमर आहे, असाही उल्लेख त्यांनी केला. मी इतकी वर्षे थिएटर करू शकलो, कारण माझे रंगभूमीवर निस्सीम प्रेम आहे. तू श्रीमंत हो, असे आशीर्वाद आईने कधीच दिले नाहीत. तुला प्रतिष्ठा मिळावी, हीच तिची कायम इच्छा असायची. कारण, आदर थेट ह्रदयात घर करतो.

रत्ना पाठक शाह म्हणाल्या की, ' नसीर अत्यंत प्रामाणिक. विद्यार्थी, नवोदित कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास मी त्याच्याबरोबर केला आहे. आपल्याला अभिरुची असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध त्याने अधाशासारखा घेतला आहे. प्रत्येक नाटकाचा तो आजवर नव्या दृष्टीने विचार करत आला आहे. ज्ञानपिपासू वृत्ती त्याच्या ठायी आहे. प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेण्याची कास त्याने कधीच सोडली नाही. अधिकाधिक चांगल्याचा शोध घ्यावा, स्वतःमध्ये कायम बदल करावेत आणि स्वतःशी आणि प्रेक्षकांशी प्रामाणिक रहावे हीच वृत्ती त्याने आजवर जोपासली आहे. गोविंद निहलानी म्हणाले, 'नसीर यांना लवकर राग येतो, चुकीच्या गोष्टी पटत नाहीत आणि ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. अभिनेता चांगला असला तरी रागीट आहे, असे आधीपासून ऐकले होते. एकत्र काम करायला सुरुवात केल्यावर लक्षात आले की, जे ऐकले ते खरे होते. त्यांच्या कलाकलाने घ्यायला सुरुवात केली. संवाद पाठांतर असो की आवराआवरी, ते सर्वांच्या आधी तयार असायचे. मग इतर कलाकारांकडून तालीम करून घेऊन मग त्यांना बोलवायचो. हळूहळू त्यांचा रागीट स्वभाव सौम्य होत गेला'.. 

टॅग्स :Naseeruddin Shahनसिरुद्दीन शाहcultureसांस्कृतिकartकलाTheatreनाटक