शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पवना धरणाचं पाणी वाढलं; सध्यातरी पाणी कपात नाही! पावसामुळे पाणीपातळीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:30 IST

धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे...

पिंपरी :पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे.

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेचार वर्षे झाले तरी शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. धरण परिसरात १ जूनपासून २९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पाणीसाठा १९.०१ टक्के आहे. हा साठा २० जुलैपर्यंत पुरेल एवढाच आहे. गेल्या वर्षी जुलैच्या सुरुवातीला २०.१६ टक्के पाणीसाठा होता. तर ४२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ३४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज...

मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जर पाऊस चांगला राहिला, तर शहरावर असलेली पाणी कपातीची टांगती तलवार बाजूला होणार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे तक्रारींत वाढ...

पिंपरी-चिंचवडला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवसाला ६१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा....

पालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५, असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. जुलै महिन्यात पाण्याची कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास पाणी कपातीची आवश्यकता नाही. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीनुसार पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Damधरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड