शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरणाचं पाणी वाढलं; सध्यातरी पाणी कपात नाही! पावसामुळे पाणीपातळीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:30 IST

धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे...

पिंपरी :पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे.

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेचार वर्षे झाले तरी शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. धरण परिसरात १ जूनपासून २९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पाणीसाठा १९.०१ टक्के आहे. हा साठा २० जुलैपर्यंत पुरेल एवढाच आहे. गेल्या वर्षी जुलैच्या सुरुवातीला २०.१६ टक्के पाणीसाठा होता. तर ४२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ३४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज...

मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जर पाऊस चांगला राहिला, तर शहरावर असलेली पाणी कपातीची टांगती तलवार बाजूला होणार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे तक्रारींत वाढ...

पिंपरी-चिंचवडला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवसाला ६१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा....

पालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५, असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. जुलै महिन्यात पाण्याची कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास पाणी कपातीची आवश्यकता नाही. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीनुसार पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Damधरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड