शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पवना धरणाचं पाणी वाढलं; सध्यातरी पाणी कपात नाही! पावसामुळे पाणीपातळीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:30 IST

धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे...

पिंपरी :पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे.

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेचार वर्षे झाले तरी शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. धरण परिसरात १ जूनपासून २९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पाणीसाठा १९.०१ टक्के आहे. हा साठा २० जुलैपर्यंत पुरेल एवढाच आहे. गेल्या वर्षी जुलैच्या सुरुवातीला २०.१६ टक्के पाणीसाठा होता. तर ४२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ३४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज...

मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जर पाऊस चांगला राहिला, तर शहरावर असलेली पाणी कपातीची टांगती तलवार बाजूला होणार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे तक्रारींत वाढ...

पिंपरी-चिंचवडला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवसाला ६१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा....

पालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५, असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. जुलै महिन्यात पाण्याची कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास पाणी कपातीची आवश्यकता नाही. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीनुसार पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Damधरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड