शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रशासनाची स्टील फ्रेम गंजलेली! पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

By श्रीकिशन काळे | Updated: January 2, 2024 21:33 IST

शेखर गायकवाड लिखित ‘प्रशासकीय योगायोग’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: ‘‘पूर्वी प्रशासनाला लोकशाहीचे, समाजाचे ‘स्टील फ्रेम’ समजले जायचे. परंतु, आता ही ‘स्टील फ्रेम’ गंजलेले आहे, अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हे चिंताजनक आहे. त्यात बदल व्हायला हवा,’’ अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड लिखित ‘प्रशासकीय योगायोग’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२) झाले. तसेच महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर लिखित ‘सुप्रशासन’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर, जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, माजी वनाधिकारी सत्यजीत गुजर, माजी भुजल संचालक चिंतामणी जोशी, माजी वनाधिकारी रंगनाथ नाईकडे, अरविंद पाटकर, चेतना नंदकर आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, प्रशासनात काम करताना अनेक अनुभव आले. त्या अनुभवांचे किस्से यात आहेत. अनेक इरसाल माणसं भेटली. ही माणसं जर स्वातंत्र्यानंतर परदेशातील प्रत्येक देशात पाठवली तर त्यांची आर्थिक स्थिती आज नक्कीच खाली आली असती. अशा व्यक्तींमुळे मला पुस्तक लिहिता आले. हे देखील खरंय!’’

हे राहिले !मी मुख्यमंत्री असताना ‘यशदा’ संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार होता. परंतु, ते होऊ शकले नाही. ते झाली पाहिजे होते. कारण तिथे जर कोणाला नियोजनाचे काम शिकायचे असेल, तर शिकू द्यावे. कोणाला धोरणकर्ता म्हणून काम शिकायचे असेल तर ते शिकता येईल,’’ असे चव्हाण म्हणाले.

हे केले !

महाराष्ट्रात आजही नरबळी दिले जातात. हे अत्यंत दुदैवी आहे. एका महिन्याला एक नर बळी दिला जातो. ही २०१४ ची आकडेवारी आहे. त्यावर आम्ही तेव्हा कायदा करणार होतो. पण त्याला विरोध झाला. दारू बंदीचा कायदा करणार होतो, तो यशस्वी झाला नाही. परंतु, अंधश्रद्धेचा कायदा करता आला याचे समाधान आहे, असे चव्हाण म्हणाले.

ही खंत !आमच्या सरकारने गुटखा बंदीचा कायदा केला. पण आज मोठमोठे फिल्मस्टार त्याची जाहिरात करतात. त्यात विलायची असल्याचे सांगून जाहीरात केली जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणे