शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

प्रशासनाची स्टील फ्रेम गंजलेली! पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

By श्रीकिशन काळे | Updated: January 2, 2024 21:33 IST

शेखर गायकवाड लिखित ‘प्रशासकीय योगायोग’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: ‘‘पूर्वी प्रशासनाला लोकशाहीचे, समाजाचे ‘स्टील फ्रेम’ समजले जायचे. परंतु, आता ही ‘स्टील फ्रेम’ गंजलेले आहे, अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हे चिंताजनक आहे. त्यात बदल व्हायला हवा,’’ अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड लिखित ‘प्रशासकीय योगायोग’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२) झाले. तसेच महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर लिखित ‘सुप्रशासन’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर करंदीकर, जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, माजी वनाधिकारी सत्यजीत गुजर, माजी भुजल संचालक चिंतामणी जोशी, माजी वनाधिकारी रंगनाथ नाईकडे, अरविंद पाटकर, चेतना नंदकर आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, प्रशासनात काम करताना अनेक अनुभव आले. त्या अनुभवांचे किस्से यात आहेत. अनेक इरसाल माणसं भेटली. ही माणसं जर स्वातंत्र्यानंतर परदेशातील प्रत्येक देशात पाठवली तर त्यांची आर्थिक स्थिती आज नक्कीच खाली आली असती. अशा व्यक्तींमुळे मला पुस्तक लिहिता आले. हे देखील खरंय!’’

हे राहिले !मी मुख्यमंत्री असताना ‘यशदा’ संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार होता. परंतु, ते होऊ शकले नाही. ते झाली पाहिजे होते. कारण तिथे जर कोणाला नियोजनाचे काम शिकायचे असेल, तर शिकू द्यावे. कोणाला धोरणकर्ता म्हणून काम शिकायचे असेल तर ते शिकता येईल,’’ असे चव्हाण म्हणाले.

हे केले !

महाराष्ट्रात आजही नरबळी दिले जातात. हे अत्यंत दुदैवी आहे. एका महिन्याला एक नर बळी दिला जातो. ही २०१४ ची आकडेवारी आहे. त्यावर आम्ही तेव्हा कायदा करणार होतो. पण त्याला विरोध झाला. दारू बंदीचा कायदा करणार होतो, तो यशस्वी झाला नाही. परंतु, अंधश्रद्धेचा कायदा करता आला याचे समाधान आहे, असे चव्हाण म्हणाले.

ही खंत !आमच्या सरकारने गुटखा बंदीचा कायदा केला. पण आज मोठमोठे फिल्मस्टार त्याची जाहिरात करतात. त्यात विलायची असल्याचे सांगून जाहीरात केली जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणे