शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

भटक्या विमुक्तांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणारे शासनच खरे अपराधी; मेधा पाटकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 17:05 IST

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे

पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे. भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न आहे तसेच असून, त्यांना जाणीवपूर्वक परीघाबाहेर ठेवले जात आहे. मूलभूत गरजांपासून भटक्या विमुक्तांना वंचित ठेवणारे शासनच खरे अपराधी आहे, असा आरोप जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या नेत्या मेधा पाटकर यांनी मंगळवारी केला.

निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्कतर्फे आयोजित चौथ्या भटके विमुक्त महिला हक्क परिषदेचे उदघाटन मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी पाटकर बोलत होत्या. 

पाटकर म्हणाल्या,  समाजाच्या बाहेर ठेवणं, परिघावर ठेवणं, गुन्हेगार ठरवणं हे भटके विमुक्तांवर ऐतिहासिक अन्याय झाले आहेत, त्यांची स्थिती ही हत्या भोगणारी परिस्थिती आहे. राज्यघटनेतील समता, न्याय, स्वातंत्र्य हे हक्क नाकारले जात आहेत. समाजामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे वंचित, शोषित, पीडित आणि जाणीवपूर्वक वगळलेले असल्याचे दिसते. राज्यघटनेनुसार भटक्या विमुक्तांना समान हक्क देण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. आपल्या हक्कांसाठी दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांना लढावे लागत आहे. हात जोडून भीक मागण्यांसाठी नाही तर मूठ आवळून हक्क मिळवण्यासाठी भटके विमुक्तांचा लढा हा माणूस म्हणून जगण्यासाठी असायला हवा. हा लढा स्वबळाच्या आधारावर पुढे नेला पाहिजे. कोणताही गुन्हा घडल्यानंतर पारधी समाजाच्या लोकांना ताब्यात घेतले जाते. त्यामुळे गुन्हेगार जमात असा शिक्का असल्याने त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना अजूनही आहे. ती काढून टाकणे हा अस्मितेचा प्रश्न आहे. भटक्या विमुक्तांना परीघाबाहेर ठेवण्याचे काम केले जात आहे. भटक्या विमुक्तांच्या शिफारसीचे काय झाले याविषयी माहिती अधिकारातून माहिती मिळविण्याची गरज आहे. भटक्या विमुक्तांना मूलभूत सुविधांपासून दूर ठेवणारा समाज आणि शासन हेच खरे अपराधी आहेत, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरSocialसामाजिकGovernmentसरकारReligious programmeधार्मिक कार्यक्रम