शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पुरंदरचे विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:50 IST

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करणार असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

सासवड : पुरंदर तालुक्यात होणारा छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करणार असल्याचे सांगत अडीच हजार कोटींची तरतूद लाॅजिस्टिक पार्कसाठी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर शिवसेनेच्या वतीने मतदारांच्या आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शहर प्रमुख नाना भानगिरे, ईरफान सय्यद, जिल्हा उपप्रमुख रमेश कोंडे, आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल चव्हाण, शाखाप्रमुख नितीन ननवरे, महाराष्ट् चर्मकार संघाचे अध्यक्ष महादेव पाखरे, रमेश इंगळे, राजेश दळवी, माजी सरपंच गणेश मुळीक, हरिभाऊ लोळे, समीर जाधव, माणिक निंबाळकर, ममता शिवतारे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, तरुण, ज्येष्ठ नागरिक या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, समाधानाचे व धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. परंतु लाडक्या बहिणीने निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विरोधी पक्ष नेता होईल तेवढे पण संख्याबळ त्यांच्याकडे राहिले नाही. विरोधकांचा लाडक्या बहिणी सुपडा साफ करून टाकला, या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला.विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राखायचे असून त्यासाठी सदस्य नोंदणी अभियानाला तात्काळ गती द्यावी, असे आवाहन केले. आमदार, खासदार यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष द्यावे आणि या तालुक्यातील जेजुरी तसेच सासवड या दोन्ही नगरपरिषदेच्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री पुरंदरमध्ये येऊन कोणत्या घोषणा करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असतानाच सभेला मात्र अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. सात गावातील महिला सरपंचांचे शिष्टमंडळ विमानतळ विरोधी निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यास गेले असता, त्यांना यावेळी अडवण्यात आले.फेसबुक लाईव्हने राज्य चालत नाहीकाहींनी घरात बसून राज्य चालवण्याचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह करून हे राज्य चालत नाही. कार्यकर्त्यांसाठी जनतेत जावे लागते. कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ता मिळते व त्यामधून राज्य चालते. कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्यासाठी गावात गल्लीबोळामध्ये जावे लागते. घरात बसून राज्य चालवता येत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना जनतेने घरात बसवले असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाAirportविमानतळ