शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मानसिक कणखरता अन् सकारात्मकतेची कसोटी : डॉ. साैरभ सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मानसिक कणखरता आणि सकारात्मक विचार अत्यंत मोलाचे आहेत. या दोन बाबींचा जोडीला सातत्याने ...

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मानसिक कणखरता आणि सकारात्मक विचार अत्यंत मोलाचे आहेत. या दोन बाबींचा जोडीला सातत्याने परीक्षेचा सराव केल्यास यूपीएससीत हमखास यश मिळते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डाॅ. सौरभ सोनवणे यांनी पहिल्या प्रयत्नात केवळ ८ गुणांनी हुकलेली संधी दुसऱ्याच प्रयत्नात जिद्दीने आयएएस पद मिळवले. मसुरी येथील दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सध्या ते मध्य प्रदेश राज्यातील टिकमगढ जिल्ह्यातील जठाराचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. सौरभ सोनवणे यांनी मुंबईतील मेडिकल कॉलेज येथून २०१४ साली वैद्यकीय पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना प्रथम प्रयत्नात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या परीक्षेत असिस्टंट कमांडन्ट पद मिळाले. यूपीएससी २०१५ च्या प्रथम प्रयत्नात ते पूर्व, मुख्य परीक्षा पास करत मुलाखतीपर्यंत गेले होते. मात्र, केवळ ८ गुणांनी तेव्हा त्यांना पद मिळाले नव्हते. मात्र, वैद्यकीय अधिकारी असलेले वडील आणि आईने त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लासला न जाता स्वत: अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे.

* पूर्वपरीक्षेची तयारी :

पूर्वपरीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी आणि आकडेवारी (स्टॅटिक पार्ट), संदर्भ ग्रंथाच्या साहाय्याने सराव करणे, जास्तीत जास्त वैकल्पिक प्रश्न सोडवणे, त्याचबरोबर परीक्षेच्या आधी किमान महिनाभर नियमितपणे सराव परीक्षा देणे, मुख्यत: सी-सॅट पेपरचा जास्तीत जास्त सराव हा अंतिम परीक्षेला फायदेशीर ठरू शकतो. यासाठी मागील पाच वर्षातील पेपर तपासून त्याची तुलनात्मक उजळणी करणे गरजेचे आहे.

* मुख्य परीक्षेची तयारी :

मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या पेपरची तयारी करताना तुमचे त्या-त्या विषयातील आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करणे, त्यातील महत्त्वाचे पाॅइंट नोट करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य परीक्षेत तुमच्या लिखाणाचा कस लागतो. त्यामुळे जास्तीत पेपर वेळ लावून सोडवण्याचा सराव करणे गरजेचे आहे. सामान्य अध्ययनचे एकूण ४ पेपरचे १००० गुण आणि वैकल्पिक विषयाच्या दोन पेपरचे ५०० गुण तसेच २०० गुणांचा एक निबंध हे केवळ सातत्याने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केल्यास अंतिम परीक्षेवेळी पूर्ण करता येतात. यासाठी मागील सोडवलेल्या पेपरमधून किती गुण मिळाले आणि कोणत्या बाबी सोडवता आल्या नाहीत. त्या शिक्षकांकडून समजावूत घेत स्वत: उजळणी केल्यास पुढच्या पेपरला त्या फायदेशीर ठरतात.

* वेगवेगळे अहवाल/राजकीय घटनांची नोंद ठेवणे

राज्य तसेच देशपातळीवर वर्तमान पत्र, नियतकालिकातून प्रसिद्ध होणारे शासनाचे अहवाल, राज्यघटनेतील बदल, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची नोंद ठेवणे हे पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्हींसाठी अत्यंत मोलाचे आहेत. यासाठी मायक्रो नोट्स काढून ठेवल्यास परीक्षेपूर्वी उजळणी करण्यासाठी तुम्हाला त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

(फोटो : सौरभ सोनवणे डाॅ. आयएएस

या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)