शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक कणखरता अन् सकारात्मकतेची कसोटी : डॉ. साैरभ सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मानसिक कणखरता आणि सकारात्मक विचार अत्यंत मोलाचे आहेत. या दोन बाबींचा जोडीला सातत्याने ...

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मानसिक कणखरता आणि सकारात्मक विचार अत्यंत मोलाचे आहेत. या दोन बाबींचा जोडीला सातत्याने परीक्षेचा सराव केल्यास यूपीएससीत हमखास यश मिळते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डाॅ. सौरभ सोनवणे यांनी पहिल्या प्रयत्नात केवळ ८ गुणांनी हुकलेली संधी दुसऱ्याच प्रयत्नात जिद्दीने आयएएस पद मिळवले. मसुरी येथील दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सध्या ते मध्य प्रदेश राज्यातील टिकमगढ जिल्ह्यातील जठाराचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. सौरभ सोनवणे यांनी मुंबईतील मेडिकल कॉलेज येथून २०१४ साली वैद्यकीय पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना प्रथम प्रयत्नात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या परीक्षेत असिस्टंट कमांडन्ट पद मिळाले. यूपीएससी २०१५ च्या प्रथम प्रयत्नात ते पूर्व, मुख्य परीक्षा पास करत मुलाखतीपर्यंत गेले होते. मात्र, केवळ ८ गुणांनी तेव्हा त्यांना पद मिळाले नव्हते. मात्र, वैद्यकीय अधिकारी असलेले वडील आणि आईने त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लासला न जाता स्वत: अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे.

* पूर्वपरीक्षेची तयारी :

पूर्वपरीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी आणि आकडेवारी (स्टॅटिक पार्ट), संदर्भ ग्रंथाच्या साहाय्याने सराव करणे, जास्तीत जास्त वैकल्पिक प्रश्न सोडवणे, त्याचबरोबर परीक्षेच्या आधी किमान महिनाभर नियमितपणे सराव परीक्षा देणे, मुख्यत: सी-सॅट पेपरचा जास्तीत जास्त सराव हा अंतिम परीक्षेला फायदेशीर ठरू शकतो. यासाठी मागील पाच वर्षातील पेपर तपासून त्याची तुलनात्मक उजळणी करणे गरजेचे आहे.

* मुख्य परीक्षेची तयारी :

मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या पेपरची तयारी करताना तुमचे त्या-त्या विषयातील आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करणे, त्यातील महत्त्वाचे पाॅइंट नोट करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य परीक्षेत तुमच्या लिखाणाचा कस लागतो. त्यामुळे जास्तीत पेपर वेळ लावून सोडवण्याचा सराव करणे गरजेचे आहे. सामान्य अध्ययनचे एकूण ४ पेपरचे १००० गुण आणि वैकल्पिक विषयाच्या दोन पेपरचे ५०० गुण तसेच २०० गुणांचा एक निबंध हे केवळ सातत्याने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केल्यास अंतिम परीक्षेवेळी पूर्ण करता येतात. यासाठी मागील सोडवलेल्या पेपरमधून किती गुण मिळाले आणि कोणत्या बाबी सोडवता आल्या नाहीत. त्या शिक्षकांकडून समजावूत घेत स्वत: उजळणी केल्यास पुढच्या पेपरला त्या फायदेशीर ठरतात.

* वेगवेगळे अहवाल/राजकीय घटनांची नोंद ठेवणे

राज्य तसेच देशपातळीवर वर्तमान पत्र, नियतकालिकातून प्रसिद्ध होणारे शासनाचे अहवाल, राज्यघटनेतील बदल, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची नोंद ठेवणे हे पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्हींसाठी अत्यंत मोलाचे आहेत. यासाठी मायक्रो नोट्स काढून ठेवल्यास परीक्षेपूर्वी उजळणी करण्यासाठी तुम्हाला त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

(फोटो : सौरभ सोनवणे डाॅ. आयएएस

या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)