शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निविदेतील अटी, शर्तींचा निर्णय प्रलंबित

By admin | Updated: June 3, 2017 02:51 IST

महापालिकेच्या दवाखान्यांसाठीच्या औषध खरेदी निविदेच्या अटी, शर्तीमध्ये बदल करण्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत काही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या दवाखान्यांसाठीच्या औषध खरेदी निविदेच्या अटी, शर्तीमध्ये बदल करण्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत काही निर्णय होऊ शकला नाही. अटी, शर्तीमध्ये शिथिल करण्याबाबतचा स्थायी समितीचा लेखी ठराव मिळाल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. यात अनुभवाच्या अटीवर संक्रांत येण्याची दाट शक्यता आहे.गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधांचा साठाच नाही. शहरी गरीब तसेच आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी यांच्यासाठी म्हणून असाध्य व सर्वसामान्य आजारांवरची औषधेही महापालिकेच्या एका योजनेत विनामूल्य दिली जातात. यासाठीची औषधखरेदी आधीच लांबलेली असताना आता पुन्हा स्थायी समितीने पूर्ण झालेली निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या एका विशिष्ट निविदाधारकासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून दबाव येत असल्याने असा निर्णय झाला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळेच यापूर्वीच्या निविदेतील अटी, शर्ती शिथिल करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, यासंबंधी सुरू असलेल्या चर्चेमुळे आरोग्य विभागाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागातील विविध प्रकारच्या खरेदीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पर्चेस कमिटीची बैठक घेतली. त्या या समितीच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्याशिवाय डॉ. अंजली साबणे, गाडीखाना रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय वावरे, कमला नेहरू रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राहुल गागरे, डॉ. विद्या गायकवाड, डॉ. अनघा जोग आदी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत निविदा प्रक्रियेसंदर्भात आतापर्यंत झालेल्या घटनांचा आढावा घेण्यात आला. त्यात फेरनिविदा काढण्याचा निर्णय का झाला यावरही चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली.स्थायी समितीने केलेल्या फेरनिविदा काढण्याच्या ठरावाची लेखी प्रतच अद्याप आरोग्य विभागाला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अटी, शर्ती बदलण्याबाबत बैठकीत चर्चा झाली नाही, पण अन्न व औषध प्रशासनाने विशिष्ट प्रकारच्या औषधांसाठी परवाना असण्याची जी अट टाकली आहे, त्यात काहीही बद करू नये, अशी सूचना उगले यांनी बैठकीत केली. स्थायी समितीच्या ठरावाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर अनुभव किंवा अन्य अटींबाबत विचार करू, असे त्यांनी सांगितले.या बैठकीत काही निर्णयच झाला नसल्यामुळे आता महापालिकेची ही औषध खरेदी प्रदीर्घ काळासाठी लांबणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. किमान महिनाभर तरी अजून आवश्यक औषधे उपलब्ध होणार नाहीत, असे दिसते आहे. काही माजी पदाधिकारी तसेच नगरसेवकांची व सर्वसामान्य गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्यांना खुल्या बाजारातून त्यांच्यासाठीची औषधे घेणे परवडत नाही. त्यामुळे याबाबत लवकर काय तो निर्णय व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या वतीने आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे.