शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
5
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
6
Rold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
7
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
8
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
9
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
10
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
11
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
12
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
13
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
14
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
15
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
16
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
17
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
18
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
19
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
20
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

दहा वर्षे टोलवसुली; पण रस्ता असुरक्षित!

By admin | Updated: March 16, 2017 02:01 IST

गेल्या आठवड्यात उरुळी कांचन येथे झालेल्या अपघातस्थळी मोठी लोकवस्ती असतानाही रस्त्याच्या कडेला जाळ््या नव्हत्या. त्या असत्या तर रानडुक्कर महामार्गावर आलेच

तुळशीराम घुसाळकर , लोणी काळभोरगेल्या आठवड्यात उरुळी कांचन येथे झालेल्या अपघातस्थळी मोठी लोकवस्ती असतानाही रस्त्याच्या कडेला जाळ््या नव्हत्या. त्या असत्या तर रानडुक्कर महामार्गावर आलेच नसते व ११ निरपराध्यांचा बळी गेला नसता. दुभाजकाची उंची जास्त असती तर यातील काहींचे प्राण वाचले असते. यामुळे ‘लोकमत’ने कवडीपाट ते यवतदरम्यान केलेल्या पाहणीत गेली दहा वर्षे येथे टोलवसुली सुरू आहे, मात्र रस्ता असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. पुणे - सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते यवत (ता. दौंड) या भागातील रस्त्याचे काम आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने केले आहे. परंतु प्रवाशांना आवश्यक त्या सोई-सुविधा दिल्या नाहीत. आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मिळाले आहे. या सत्तावीस किलोमीटरच्या कामासाठी त्या वेळी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सन २००४ पासून या कंपनीने टोलवसुलीचे काम सुरू केले आहे. शासनाने या कंपनीला १९ वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी दिली आहे. महिलांसाठी एकही शौचालय नाही. पुरुषांसाठी एक शौचालय आहे; परंतु त्याचे पाणी टोलनाक्याशेजारी तेथेच रस्त्याच्या कडेला सोडले आहे. महिला प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होते. कंपनीने जेथे लोकवस्ती आहे; त्यापैकी काही ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी सर्व्हिस रोड तयार केले आहेत. खोलेवस्ती येथून लोणी काळभोर गावात येणाऱ्या पुलाखाली प्रचंड घाण पडलेली असते. कुत्री, डुकरे तेथे कायम असतात. महामार्गावरील वाहतुकीचा धोका पत्करायला नको, म्हणून महिला, शाळेतील मुले, वयोवृद्ध नागरिक या रस्त्याचा वापर करतात. परंतु प्रचंड दुर्गंधी व कुत्रे, डुकरांच्या तावडीतून सुटका करून त्यांना प्रवास करावा लागतो. कंपनी सहा महिने किंवा वर्षातून एकदा या रस्त्याची जेसीबी मशीन लावून स्वच्छता करते. कदमवस्तीसमोर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे एक गेट आहे. या गेटसमोरील सर्व्हिस रोडवर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी कंपनीत जाणारे व येणारे टँकर उभे असतात. तेथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक विद्युत रोहित्र आहे. याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. अधूनमधून हा कचरा पेटवला जातो, तो दिवसभर पेटत राहतो. या आगीमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाळूवाहतूक केली जाते. वाहतूकवेळी ही वाळू महामार्गावर सांडते. या सांडलेल्या वाळूवरून दुचाकी वाहने घसरतात. कधी कधी हात-पाय मोडण्यावर भागते, तर कधी दुचाकीचालकाचा जीवही जातो. सन २००४ मध्ये चारपदरी महामार्ग तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये जनावरे व नागरिक महामार्गावर येऊन अपघात होऊ नयेत, म्हणून लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु सध्या बहुतांश ठिकाणची जाळी गायब झालेली आहे. तसेच त्याखालचा फुटपाथही आपोआपच तुटला आहे.