शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

उन्हाच्या तडक्याची फळभाज्यांना फोडणी, आवक, मागणी आणि दरही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:39 IST

गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून, याचा फटका फळभाज्या व पालेभाज्यांना बसला आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून, याचा फटका फळभाज्या व पालेभाज्यांना बसला आहे. यामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागातील आवक घटली असून, भाज्यांची मागणीदेखील कमी झाली आहे. मागणी कमी झाल्याने दर देखील कमी झाले आहे. याचा फटक राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आवकच्या तुलनेत मागणी घटल्याने आले, घेवडा आणि मटारच्या दरात वाढ झाली आहे, तर गवार आणि भेंडीच्या दरात घट झाली आहे.इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवार (दि. ८) रोजी १५० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये परराज्यातून गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून तब्बल १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशमधून १ ट्रक मटार, कर्नाटक, गुजरात येथून ३ ते ४ ट्रक कोंबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ ट्रक शेवगा, राज्यस्थानातून ३ ट्रक गाजर, कर्नाटक येथून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाच्या ४ ते ५ गोणी आवक झाली आहे.तर महाराष्ट्रातून सातारी आले ७०० ते ८०० पोती, टोमॅटो साडे पाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, मटार २०० ते २५० गोणी, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची १४ ते १५ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गावरान कैरी ८ ते १० टेम्पो, चिंच २५ ते ३० पोती, कांद्याची १२० ट्रक, आग्रा, इंदौर, नाशिक आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ५५ ते ६० ट्रक इतकी आवक झाली.रसदार फळांची मागणी वाढलीउन्हाच्या तीव्रतेमुळे कलिंगड, खरबूज, डाळींब, संत्री आणि मोसंबी या रसदार फळांची मागणी बाजारात वाढली आहे. आवक व मागणी कायम असल्याने सध्या फळांचे दर स्थिर आहेत, तर मागणीअभावी पपई, सफरचंद, पेरूच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.उन्हामुळे पालेभाज्या तेजीतउन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे गेल्या काही दिवसांत पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मुळे, चवळई, पालक वगळता पालेभाज्यांच्या दरातील तेजी टिकून आहे. पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात ३ ते १२ रुपये मोजावे लागत आहेत आहे. किरकोळ बाजारात १० ते २५ रुपये भावाने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची सुमारे १ लाख २५ हजार, तर मेथीची १५ हजार जुडींची आवक झाल्याचे सांगण्यात आले.फुलाची मागणी कमीबदलत्या हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून मार्केट यार्डातील फूलबाजारात सर्वच प्रकारच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, सध्या सण, लग्नसराईचा सीझन थंडावला असल्याने फुलांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. यामुळे फुलांच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांची घट झाली आहे.