शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बीएसएनएलच्या मनमानी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:54 IST

आदिवासी भागातील जनता त्रस्त : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, व्यवहार ठप्प

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये दहा दिवसांपासून बीएसएनएल कंपनीच्या अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील जनता त्रस्त झाली आहे. या बीएसएनएल कंपनीच्या अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून या भागात नेटवर्कचा लपंडाव चालू आहे. कुठे केबल तुटणे, लाइट नसणे, मनोºयामध्ये नादुरुस्त होणे, तर कधी किरकोळ बिघाडांमुळे दूरध्वनी सेवा विस्कळीत होणे अशा समस्या निर्माण होतात. परंतु बीएसएनएल कंपनीचे अधिकारी याकडे ढुंकूणही पाहत नाहीत.

आज काय केबल नाही, उद्या काय डिझेल नाही त्यामुळे इंजिन बंद आहे, तर परवा काय लाईटची समस्या अशी उत्तरे देत हे अधिकारी आदिवासी जनतेला फसविण्याचे काम करीत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या भागातील बीएसएनएल सेवा बंद झाली आहे, याबाबत बीएसएनएल वरिष्ठ अधिकारी नारायणकर यांना विचारले असता तळेघर येथील मनोºयाला करण्यात येणारा विद्युत पुरवठा वीजबिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. विद्युत पुरवठा नसल्यामुळे बीएसएनएल सेवा बंद झाली आहे. ही जबाबदारी बीएसएनएल कंपनीच्या वरिष्ठांची आहे, असे सांगण्यात आले सध्या या भागामध्ये खासगी दूरध्वनी मनोºयांची उभारणी चालू आहे, या खासगी कंपन्यांची तर पाठराखण करण्यासाठी हे अधिकारी असे डाव तर करत नाही ना, अशी चर्चा आदिवासी भागात चालू आहे.बीएसएनएल कंपनीच्या या गलथान कारभारात लवकरात लवकर सुधारणा व्हावी; अन्यथा घोडेगाव येथील तहसील कार्यालय व मंचर येथील बीएसएनएल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.आर्थिक व्यवहार ठप्पतालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणारे तळेघर हे गाव शैक्षणिक, राजकीय, व्यापार, उद्योग,बँक या दृष्टीने केंद्रबिंदूचे ठिकाण असल्याने हे गाव आदिवासी भागाची राजधानी म्हणून ओळखले जाते. या गावाचा आदिवासी भागातील ४० गावांशी संपर्क जोडला आहे. बँकांचे व्यवहार आॅनलाइन झाल्यामुळे बँकांचे अधिकारी नेटवर्क असल्याशिवाय बँकांचे व्यवहार ग्राहकांशी करेणात, रेंज नसल्यामुळे साठ ते सत्तर कि.मी. अंतरावरून पायी चालत आलेल्या आदिवासी बांधवांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे, याचे सोयरसूतकही या अधिकाºयांना नाही. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलPuneपुणे