शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

घराण्याची शिकवण पालकांच्या संस्कारांप्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 02:04 IST

संजीव अभ्यंकर : गानसरस्वती पुरस्कार जाहीर

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने मिळत असलेला ‘गानसरस्वती पुरस्कार’ हा किशोरीतार्इंचा आशीर्वादच आहे, असे मी मानतो. रसनिष्पत्ती आणि बुद्धिजीविता यांचे अफाट मिश्रण त्यांच्या गाण्यात होते. त्या केवळ महान गायिकाच नाही; तर उत्तम गुरू होत्या. त्यांच्या गाण्यामधून खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याने प्रेम आणि आदर या दोन्ही भावना दाटून आल्या आहेत. या पुरस्काराला वलय तर आहेच; तसेच त्यामध्ये प्रेमाचा ओलावाही आहे.

संगीतातील लयकारी, स्वर लावण्याची पद्धत, ताल कोणते वापरावेत, गायन मांडण्याचा वेग, तिन्ही सप्तकांचा वापर, मिंड, गमक, खटका या संगीतातील गोष्टींचा कोण कसा वापर करतो, कोण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो, यावर प्रत्येक घराण्याची शैली आणि वेगळेपण अवलंबून असते. मेवाती घराण्याच्या गायकीमध्ये मिंड, कणस्वर, गमक यांचा वैविध्याने वापर केला जातो. भक्तिरस हा गायकीचा पाया असला, तरी सर्व रसांचा परिपोष गायकीमध्ये पाहायला मिळतो. तिन्ही सप्तकांचा सुरेख वापर मेवाती घराण्याच्या गायकीत केला जातो. आलापामध्ये शांत, स्थिर; पण संथप्रवाही असलेली, तानांच्या वेळी आक्रमक होणारी वैविध्यपूर्ण अशी ही गायकी आहे. पूर्वीच्या काळी घराण्याचे संस्थापक ज्या संस्थानामध्ये राहायचे, त्या नावाने घराणे प्रचलित व्हायचे. यातूनच किराणा, मेवाती, पटियाला, आग्रा अशी घराणी निर्माण झाली. सर्व घराणी संगीतातील मूल्येच वापरतात. पूर्वीच्या काळी एकमेकांच्या घराण्यांची गायकी सहजासहजी उपलब्ध होत नसे; त्यामुळे गुरूकडून संक्रमित झालेली विद्या जशीच्या तशी शिष्य मांडत असे. काळ बदलला त्याप्रमाणे एकमेकांच्या घराण्यांची गाणी सहज उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे घराण्यांनी एकमेकांचे चांगले प्रवाह आपलेसे केले आहेत. पूर्वीप्रमाणे घराण्यांमधील साचलेपणा दूर होऊन व्याप्ती वाढली आहे. घराणी ही आई-वडिलांच्या संस्कारांप्रमाणे असतात. मूल आई-वडिलांच्या संस्कारांबरोबरच आजूबाजूच्या वातावरणातून, प्रवाहातून प्रभावित होऊन स्वत:ला घडवत असते. त्याचप्रमाणे, गायकही स्वत:च्या घराण्याचे संस्कार स्वत:मध्ये रुजवत इतर वैविध्येही आत्मसात करीत असतो.

रसिक शास्त्रीय संगीतातून आत्मानंद घेत असतात. लय, सूर, ताल यातून आत्मिक समाधान मिळते. मात्र, संगीताचे शास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर बौद्धिक आनंदही आत्मसात करता येतो. बौद्धिक आनंद मिळविण्यासाठी संगीताचे शास्त्र समजून घेण्याची दृष्टी विकसित व्हावी लागते. शास्त्रीय संगीत आत्मिक आणि बौद्धिक असा दोन्ही प्रकारचा आनंद देते. संगीताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजकाल भरपूर माध्यमे उपलब्ध आहेत.अविरत साधना संगीतासाठी आवश्यक आहे. सादरीकरण हा त्यातला एक भाग. १५-१५ वर्षे साधना केल्यानंतर सादरीकरण करण्याची क्षमता हळूहळू विकसित होते. सादरीकरणामुळे रियाझाकडे दुर्लक्ष होते, असे वाटत नाही. रियाझातून कमावलेले ज्ञान सादरीकरणातून मांडण्याची संधी कलाकारांना मिळते. जो कलावंत रियाझावरील लक्ष न हटवता सादरीकरण करेल, त्याच्या साधनेची उंची वाढत राहील. तंत्रज्ञानामुळे कलेची उपलब्धता वाढली आहे. ज्याच्यावर विचारांचे संस्कार दृढ आहेत, त्याच्यावर तंत्रज्ञानातील गदारोळाचा परिणाम होणार नाही. जो कलाकार दूरदृष्टीने विचार करून तंत्रज्ञानाचा वापर करेल, त्याला शास्त्रीय संगीताच्या प्रवासामध्ये उंची गाठता येईल.शास्त्रीय संगीतातील घराण्यांनी एकमेकांचे चांगले प्रवाह आपलेसे केले आहेत. पूर्वीप्रमाणे घराण्यांमधील साचलेपणा दूर होऊन व्याप्ती वाढली आहे. घराणी ही आई-वडिलांच्या संस्कारांप्रमाणे असतात. गायक स्वत:च्या घराण्याचे संस्कार स्वत:मध्ये रुजवत इतर वैविध्येही आत्मसात करीत असतो. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने मिळत असलेला ‘गानसरस्वती पुरस्कार’ हा किशोरीतार्इंचा आशीर्वादच आहे, अशी भावना मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे