शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:24 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.

बारामती : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.यंदा बारामतीतील १२ शाळांमध्ये फोरमने शाडूच्या मातीची २५० पोती दिलेली आहेत. प्रत्येक शाळेला गणेशमूर्तींचे साचेही दिलेले आहेत. याशिवाय, या मूर्ती तयार करण्यासाठी या १२ शाळांतील कलाशिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मूर्ती रंगविण्यासाठी शाळांना रंगही फोरमच्या वतीने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे रंगदेखील पर्यावरणपूरक आहेत.यंदा प्रत्येक शाळेत ३०० अशा साडेतीन हजार मूर्ती विद्यार्थ्यांच्या हातातून साकाराव्यात आणि त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असाव्यात असा फोरमचा प्रयत्न आहे, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन होत नसल्याने या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.हे प्रदूषण रोखणे, प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा वापर कमी करून शाडूच्या मातीचा वापर वाढविणे, मुलांमधील कलागुणांना वाव देणे असे अनेक उद्देश या उपक्रमातून एकाच वेळी साध्य होतील, असे पवार यांनी सांगितले. बारामतीतील विविध शाळांमध्ये सध्या गणेशमूर्तींचे काम वेगाने सुरू आहे. मुले अत्यंत उत्साह व आनंदाने बाप्पांना साकारण्यात गुंग झाल्याचे चित्र शाळाशाळांतून दिसत आहे.एखाद्या सेवाभावी संस्थेनेप्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने ३ हजारांवर मूर्तींची निर्मिती करण्याची ग्रामीण भागातील ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात प्रदूषण कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले.विद्यार्थी बनणार संदेशदूत...प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना संदेशदूत करण्याचा फोरमचा प्रयत्न आहे. प्रत्येक कुटुंबातून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.