शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:24 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.

बारामती : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.यंदा बारामतीतील १२ शाळांमध्ये फोरमने शाडूच्या मातीची २५० पोती दिलेली आहेत. प्रत्येक शाळेला गणेशमूर्तींचे साचेही दिलेले आहेत. याशिवाय, या मूर्ती तयार करण्यासाठी या १२ शाळांतील कलाशिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मूर्ती रंगविण्यासाठी शाळांना रंगही फोरमच्या वतीने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे रंगदेखील पर्यावरणपूरक आहेत.यंदा प्रत्येक शाळेत ३०० अशा साडेतीन हजार मूर्ती विद्यार्थ्यांच्या हातातून साकाराव्यात आणि त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असाव्यात असा फोरमचा प्रयत्न आहे, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन होत नसल्याने या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.हे प्रदूषण रोखणे, प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा वापर कमी करून शाडूच्या मातीचा वापर वाढविणे, मुलांमधील कलागुणांना वाव देणे असे अनेक उद्देश या उपक्रमातून एकाच वेळी साध्य होतील, असे पवार यांनी सांगितले. बारामतीतील विविध शाळांमध्ये सध्या गणेशमूर्तींचे काम वेगाने सुरू आहे. मुले अत्यंत उत्साह व आनंदाने बाप्पांना साकारण्यात गुंग झाल्याचे चित्र शाळाशाळांतून दिसत आहे.एखाद्या सेवाभावी संस्थेनेप्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने ३ हजारांवर मूर्तींची निर्मिती करण्याची ग्रामीण भागातील ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात प्रदूषण कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले.विद्यार्थी बनणार संदेशदूत...प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना संदेशदूत करण्याचा फोरमचा प्रयत्न आहे. प्रत्येक कुटुंबातून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.