शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

टाकळी भीमाला ‘शासन आपल्या दारी’

By admin | Updated: April 20, 2016 00:48 IST

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत टाकळी भीमा येथे ग्रामस्थांना रेशनिंग कार्ड

पाटेठाण : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत टाकळी भीमा (ता. दौंड) येथे ग्रामस्थांना रेशनिंग कार्ड, विद्यार्थिनींना सायकली, शेतकरीवर्गाला रासायनिक खते, प्रमाणपत्र, दाखले अशा विविध वस्तूंचे वाटप माजी आमदार रंजना कुल, तहसीलदार उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकरी, मजूर यांच्या विविध तक्रारीचे निवारण झाल्याने ग्रामस्थांनी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे. टाकळी भीमा (ता. दौंड) येथे तहसीलदार उत्तम दिघे यांच्या नेतृत्वाखाली ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार रंजना कुल होत्या. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना महसूल, कृषी, आरोग्य, पशुवैद्यकीय, शिक्षण, अशा विविध क्षेत्रांत निगडित प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. म्हणूनच जनतेला शासकीय कार्यप्रणालीचा अनुभव घेता यावा, चावडी वाचनाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तत्काळ होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सुरू करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे तहसीलदार उत्तम दिघे यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार रंजना कुल म्हणाल्या, की नागरिकांनी आपल्या कामासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. टाकळी भीमा येथे दौंड व शिरूर तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे परिसराचा विकास होण्यासाठी मदत होईल.या वेळी गटविकास अधिकारी संतोष हराळे, पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, सरपंच रूपाली गरदरे, उपसरपंच योगेश वडघुले, राहूच्या सरपंच मनीषा नवले, डी. बी. झाडगे, अर्जुन स्वामी,गणेश खुटवड, विजय शिर्के, अप्पा ठाकर, संपत नरसाळे, संतोष गरदरे यांच्यासह विविध खात्याचे पदाधिकारी, शेतकरी, मजूर, तसेच महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.