शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत, आता परिस्थिती बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 03:24 IST

आठवणीतील निवडणूक ...

नि मगाव केतकीचा १९६१ मध्ये पहिला सरपंच, १९६२ मध्ये इंदापूर पंचायत समितीचा सभापती झालो. स्व. शंकरराव पाटील तालुक्याचे आमदार होते. १९६७ मध्ये शरद पवार पहिले आमदार झाले. अनंतराव पवारांच्याबरोबर छत्रपती भवानीनगर साखर कारखाना निवडणूक कार्यातून त्यांच्या संपर्कात आले. १९७६ पासून शंकरराव पाटील यांनी इंदिरा काँग्रेस पक्ष सोडून शरद पवार यांच्या एस. काँग्रेसचे काम चालू केले. १९८० मध्ये मी शरद पवार यांच्या एस. काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यावेळी आय. काँग्रेस उमेदवार राजेंद्र घोलप ४५०० मतांनी विजयी झाले. त्यावेळी शंकरराव पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्यांचा मतदारसंघात मोठा दबदबा होता. त्या वेळच्या निवडणूक यंत्रणा पाहिली तर प्रचारात जेमतेम चार-पाच गाड्या असत. त्याही ठिकठिकाणी डिझेलला पैसे नाहीत, म्हणून बंद पडायच्या, प्रचार थांबायचा. प्रचाराला निघताना घरातून भाकरीची चवड बांधून निघावं लागत होतं.

मला अजूनही आठवते, की माझ्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ व्याहळीच्या नाथाच्या मंदिरात वाढवून शुभारंभ केल्यानंतर लोकांनी त्याच ठिकाणी जमा केलेल्या वर्गणीत २५ हजार रुपये जमले होते. बाळासाहेब जाचक यांनी ५ हजार रुपये मदत केली होती. पूर्वी निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत होते. लासुर्ण्याचे गुणवंतराव पाटील प्रचारातील कार्यकर्त्यांना जेवणासाठी ३० ते ३५ भाकऱ्यांची चवड, बेसन, चटणी घेऊन येत असत. प्रचार झाल्यानंतर दुपारी कोठेतरी झाडाखाली बसून जेवण करायचे. पुढच्या गावाला जायचे. एखाद्या गावात प्रचारासाठी जायचे असेल तर पुढे आदल्या दिवशी कोणीतरी पाठवून निरोप द्यायचा. त्यानंतर सभा होत असे. मोठ्या गावात सभेला ४० ते ५० लोक असायचे, लहान गावात १०-२० असायचे. आज तशी परिस्थिती राहिली नाही. कार्यकर्त्यांना एसी गाडी, चांगल्या हॉटेलात जेवण, पद, खर्चासाठी पैसे द्यावे लागतात. तरीसुद्धा रुसवे-फुगवे आहेत. पूर्वीचा कार्यकर्ता एखाद्याला शब्द दिला तर बदलत नव्हता, नैतिकता होती. तत्त्वाने वागणारा, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या नेत्यासाठी उपाशी -तापाशी झटत असायचे. १९८५ च्या दुसऱ्या निवडणुकीत गणपतराव पाटील व माझ्यात झालेल्या लढतीत ५ हजार मतांनी गणपतराव पाटील निवडून आले. १९९० च्या तिसºया विधानसभा निवडणुकीवेळी एस. काँग्रेस आय. काँग्रेसमध्ये विलीन झाली. गणपतराव पाटील आय काँग्रेसमधून उभे होते. शंकरराव पाटील त्यांच्या पाठीशी होते. जनता दलातून विश्वासराव रणशिंग, शिवसेनेतून बलभीमराव जाधव आणि बंडखोरी करून हत्तीच्या चिन्हावर मी उभा होतो. त्यावेळी मराठा मताची विभागणी झाली. धनगर समाजाचे गणपतराव पाटील पुन्हा निवडून आले. तेव्हापासून तालुक्यात जातीय समीकरणाचे राजकारण चालू झाले. १९९५ ला हर्षवर्धन पाटील बंडखोरी करून निवडून आले. या राजकारणात आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. समीकरणे चुकत गेली आणि मी हळूहळू राजकारणातून बाहेर पडलो. समाजासाठी खूप पळालो. सणासुदीवेळी फक्त घरचं जेवण मिळायचे. इतर वेळी जिथे जाईल तेथे जेवण करायचे, अशी परिस्थिती होती. शरद पवारांचे माझ्यावर प्रेम असल्यामुळे आजही ते माझा शब्द ऐकतात. मला किंवा माझ्या मुलाला विधानसभेचे किंवा अन्य तिकीट नको आहे. फक्त पवारसाहेब मुख्यमंत्री असताना नीरा-डावा कालव्यावर शेळगाव कटाचा सर्व्हे करून कचरवाडीचा तलाव शेटफळ हवेलीसारखा विस्तारित करून पावसाळ्यात पाण्याने भरण्याचे काम व्हायला पाहिजे. त्याचे भूमिपूजन पवारसाहेबांनी केले होते.

(शब्दांकन : अर्जुन भोंग)ज. मा. मोरेसामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक