शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत, आता परिस्थिती बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 03:24 IST

आठवणीतील निवडणूक ...

नि मगाव केतकीचा १९६१ मध्ये पहिला सरपंच, १९६२ मध्ये इंदापूर पंचायत समितीचा सभापती झालो. स्व. शंकरराव पाटील तालुक्याचे आमदार होते. १९६७ मध्ये शरद पवार पहिले आमदार झाले. अनंतराव पवारांच्याबरोबर छत्रपती भवानीनगर साखर कारखाना निवडणूक कार्यातून त्यांच्या संपर्कात आले. १९७६ पासून शंकरराव पाटील यांनी इंदिरा काँग्रेस पक्ष सोडून शरद पवार यांच्या एस. काँग्रेसचे काम चालू केले. १९८० मध्ये मी शरद पवार यांच्या एस. काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यावेळी आय. काँग्रेस उमेदवार राजेंद्र घोलप ४५०० मतांनी विजयी झाले. त्यावेळी शंकरराव पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्यांचा मतदारसंघात मोठा दबदबा होता. त्या वेळच्या निवडणूक यंत्रणा पाहिली तर प्रचारात जेमतेम चार-पाच गाड्या असत. त्याही ठिकठिकाणी डिझेलला पैसे नाहीत, म्हणून बंद पडायच्या, प्रचार थांबायचा. प्रचाराला निघताना घरातून भाकरीची चवड बांधून निघावं लागत होतं.

मला अजूनही आठवते, की माझ्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ व्याहळीच्या नाथाच्या मंदिरात वाढवून शुभारंभ केल्यानंतर लोकांनी त्याच ठिकाणी जमा केलेल्या वर्गणीत २५ हजार रुपये जमले होते. बाळासाहेब जाचक यांनी ५ हजार रुपये मदत केली होती. पूर्वी निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत होते. लासुर्ण्याचे गुणवंतराव पाटील प्रचारातील कार्यकर्त्यांना जेवणासाठी ३० ते ३५ भाकऱ्यांची चवड, बेसन, चटणी घेऊन येत असत. प्रचार झाल्यानंतर दुपारी कोठेतरी झाडाखाली बसून जेवण करायचे. पुढच्या गावाला जायचे. एखाद्या गावात प्रचारासाठी जायचे असेल तर पुढे आदल्या दिवशी कोणीतरी पाठवून निरोप द्यायचा. त्यानंतर सभा होत असे. मोठ्या गावात सभेला ४० ते ५० लोक असायचे, लहान गावात १०-२० असायचे. आज तशी परिस्थिती राहिली नाही. कार्यकर्त्यांना एसी गाडी, चांगल्या हॉटेलात जेवण, पद, खर्चासाठी पैसे द्यावे लागतात. तरीसुद्धा रुसवे-फुगवे आहेत. पूर्वीचा कार्यकर्ता एखाद्याला शब्द दिला तर बदलत नव्हता, नैतिकता होती. तत्त्वाने वागणारा, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या नेत्यासाठी उपाशी -तापाशी झटत असायचे. १९८५ च्या दुसऱ्या निवडणुकीत गणपतराव पाटील व माझ्यात झालेल्या लढतीत ५ हजार मतांनी गणपतराव पाटील निवडून आले. १९९० च्या तिसºया विधानसभा निवडणुकीवेळी एस. काँग्रेस आय. काँग्रेसमध्ये विलीन झाली. गणपतराव पाटील आय काँग्रेसमधून उभे होते. शंकरराव पाटील त्यांच्या पाठीशी होते. जनता दलातून विश्वासराव रणशिंग, शिवसेनेतून बलभीमराव जाधव आणि बंडखोरी करून हत्तीच्या चिन्हावर मी उभा होतो. त्यावेळी मराठा मताची विभागणी झाली. धनगर समाजाचे गणपतराव पाटील पुन्हा निवडून आले. तेव्हापासून तालुक्यात जातीय समीकरणाचे राजकारण चालू झाले. १९९५ ला हर्षवर्धन पाटील बंडखोरी करून निवडून आले. या राजकारणात आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. समीकरणे चुकत गेली आणि मी हळूहळू राजकारणातून बाहेर पडलो. समाजासाठी खूप पळालो. सणासुदीवेळी फक्त घरचं जेवण मिळायचे. इतर वेळी जिथे जाईल तेथे जेवण करायचे, अशी परिस्थिती होती. शरद पवारांचे माझ्यावर प्रेम असल्यामुळे आजही ते माझा शब्द ऐकतात. मला किंवा माझ्या मुलाला विधानसभेचे किंवा अन्य तिकीट नको आहे. फक्त पवारसाहेब मुख्यमंत्री असताना नीरा-डावा कालव्यावर शेळगाव कटाचा सर्व्हे करून कचरवाडीचा तलाव शेटफळ हवेलीसारखा विस्तारित करून पावसाळ्यात पाण्याने भरण्याचे काम व्हायला पाहिजे. त्याचे भूमिपूजन पवारसाहेबांनी केले होते.

(शब्दांकन : अर्जुन भोंग)ज. मा. मोरेसामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक