शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत, आता परिस्थिती बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 03:24 IST

आठवणीतील निवडणूक ...

नि मगाव केतकीचा १९६१ मध्ये पहिला सरपंच, १९६२ मध्ये इंदापूर पंचायत समितीचा सभापती झालो. स्व. शंकरराव पाटील तालुक्याचे आमदार होते. १९६७ मध्ये शरद पवार पहिले आमदार झाले. अनंतराव पवारांच्याबरोबर छत्रपती भवानीनगर साखर कारखाना निवडणूक कार्यातून त्यांच्या संपर्कात आले. १९७६ पासून शंकरराव पाटील यांनी इंदिरा काँग्रेस पक्ष सोडून शरद पवार यांच्या एस. काँग्रेसचे काम चालू केले. १९८० मध्ये मी शरद पवार यांच्या एस. काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यावेळी आय. काँग्रेस उमेदवार राजेंद्र घोलप ४५०० मतांनी विजयी झाले. त्यावेळी शंकरराव पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्यांचा मतदारसंघात मोठा दबदबा होता. त्या वेळच्या निवडणूक यंत्रणा पाहिली तर प्रचारात जेमतेम चार-पाच गाड्या असत. त्याही ठिकठिकाणी डिझेलला पैसे नाहीत, म्हणून बंद पडायच्या, प्रचार थांबायचा. प्रचाराला निघताना घरातून भाकरीची चवड बांधून निघावं लागत होतं.

मला अजूनही आठवते, की माझ्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ व्याहळीच्या नाथाच्या मंदिरात वाढवून शुभारंभ केल्यानंतर लोकांनी त्याच ठिकाणी जमा केलेल्या वर्गणीत २५ हजार रुपये जमले होते. बाळासाहेब जाचक यांनी ५ हजार रुपये मदत केली होती. पूर्वी निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते नेत्यांना सांभाळत होते. लासुर्ण्याचे गुणवंतराव पाटील प्रचारातील कार्यकर्त्यांना जेवणासाठी ३० ते ३५ भाकऱ्यांची चवड, बेसन, चटणी घेऊन येत असत. प्रचार झाल्यानंतर दुपारी कोठेतरी झाडाखाली बसून जेवण करायचे. पुढच्या गावाला जायचे. एखाद्या गावात प्रचारासाठी जायचे असेल तर पुढे आदल्या दिवशी कोणीतरी पाठवून निरोप द्यायचा. त्यानंतर सभा होत असे. मोठ्या गावात सभेला ४० ते ५० लोक असायचे, लहान गावात १०-२० असायचे. आज तशी परिस्थिती राहिली नाही. कार्यकर्त्यांना एसी गाडी, चांगल्या हॉटेलात जेवण, पद, खर्चासाठी पैसे द्यावे लागतात. तरीसुद्धा रुसवे-फुगवे आहेत. पूर्वीचा कार्यकर्ता एखाद्याला शब्द दिला तर बदलत नव्हता, नैतिकता होती. तत्त्वाने वागणारा, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या नेत्यासाठी उपाशी -तापाशी झटत असायचे. १९८५ च्या दुसऱ्या निवडणुकीत गणपतराव पाटील व माझ्यात झालेल्या लढतीत ५ हजार मतांनी गणपतराव पाटील निवडून आले. १९९० च्या तिसºया विधानसभा निवडणुकीवेळी एस. काँग्रेस आय. काँग्रेसमध्ये विलीन झाली. गणपतराव पाटील आय काँग्रेसमधून उभे होते. शंकरराव पाटील त्यांच्या पाठीशी होते. जनता दलातून विश्वासराव रणशिंग, शिवसेनेतून बलभीमराव जाधव आणि बंडखोरी करून हत्तीच्या चिन्हावर मी उभा होतो. त्यावेळी मराठा मताची विभागणी झाली. धनगर समाजाचे गणपतराव पाटील पुन्हा निवडून आले. तेव्हापासून तालुक्यात जातीय समीकरणाचे राजकारण चालू झाले. १९९५ ला हर्षवर्धन पाटील बंडखोरी करून निवडून आले. या राजकारणात आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. समीकरणे चुकत गेली आणि मी हळूहळू राजकारणातून बाहेर पडलो. समाजासाठी खूप पळालो. सणासुदीवेळी फक्त घरचं जेवण मिळायचे. इतर वेळी जिथे जाईल तेथे जेवण करायचे, अशी परिस्थिती होती. शरद पवारांचे माझ्यावर प्रेम असल्यामुळे आजही ते माझा शब्द ऐकतात. मला किंवा माझ्या मुलाला विधानसभेचे किंवा अन्य तिकीट नको आहे. फक्त पवारसाहेब मुख्यमंत्री असताना नीरा-डावा कालव्यावर शेळगाव कटाचा सर्व्हे करून कचरवाडीचा तलाव शेटफळ हवेलीसारखा विस्तारित करून पावसाळ्यात पाण्याने भरण्याचे काम व्हायला पाहिजे. त्याचे भूमिपूजन पवारसाहेबांनी केले होते.

(शब्दांकन : अर्जुन भोंग)ज. मा. मोरेसामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक