शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

संवेदनशील क्षेत्राबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या

By admin | Updated: October 21, 2015 00:55 IST

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २१३३ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट होत आहेत. त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे,

घोडेगाव : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २१३३ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट होत आहेत. त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ईएसएचा (इको सेन्सिटिव्ह एरिया) अंतिम मसुदा जाहीर होण्यापूर्वी या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडचणी, बंदी नसणाऱ्या कामांना नियम लावून परवानगी देण्याची कायदेशीर प्रक्रिया; तसेच हे क्षेत्र ठरविण्यासाठी आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना कुठेही विचारात घेतलेले नाही, याचा अंतिम मसुदा जाहीर होण्यापूर्वी लोकप्रतिनिधींचे म्हणणे समजून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पश्चिम घाटाचा दुसरा मसुदा जाहीर झाला आहे. या मसुद्यावर हरकती नोंदविण्यासाठी २ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून याला मुदतवाढ मिळावी, हरकती नोंदविण्यासाठी हा मसुदा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या ६ राज्यांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध व्हावा. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच सगळ्यांना विश्वासात घेतले जावे, अशी अपेक्षा वळसे-पाटील यांनी व्यक्त केली. सर्व बाबींचा विचार करू : जावडेकर‘इको सेन्सेटिव्ह एरिया’चा सहा राज्यांवर याचा काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रात काय परिस्थिती राहील, याविषयी पवार व वळसे-पाटील यांनी जावडेकर यांना माहिती दिली. यावर गांभीर्याने विचार करू. अंतिम अधिसूचना जाहीर करण्यापूर्वी या सूचना व बदलांचा विचार केला जाईल, असे आश्वासन जावडेकर यांनी दिले.