शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

संवेदनशील क्षेत्राबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या

By admin | Updated: October 21, 2015 00:55 IST

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २१३३ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट होत आहेत. त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे,

घोडेगाव : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २१३३ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट होत आहेत. त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ईएसएचा (इको सेन्सिटिव्ह एरिया) अंतिम मसुदा जाहीर होण्यापूर्वी या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडचणी, बंदी नसणाऱ्या कामांना नियम लावून परवानगी देण्याची कायदेशीर प्रक्रिया; तसेच हे क्षेत्र ठरविण्यासाठी आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना कुठेही विचारात घेतलेले नाही, याचा अंतिम मसुदा जाहीर होण्यापूर्वी लोकप्रतिनिधींचे म्हणणे समजून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पश्चिम घाटाचा दुसरा मसुदा जाहीर झाला आहे. या मसुद्यावर हरकती नोंदविण्यासाठी २ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून याला मुदतवाढ मिळावी, हरकती नोंदविण्यासाठी हा मसुदा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या ६ राज्यांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध व्हावा. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच सगळ्यांना विश्वासात घेतले जावे, अशी अपेक्षा वळसे-पाटील यांनी व्यक्त केली. सर्व बाबींचा विचार करू : जावडेकर‘इको सेन्सेटिव्ह एरिया’चा सहा राज्यांवर याचा काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रात काय परिस्थिती राहील, याविषयी पवार व वळसे-पाटील यांनी जावडेकर यांना माहिती दिली. यावर गांभीर्याने विचार करू. अंतिम अधिसूचना जाहीर करण्यापूर्वी या सूचना व बदलांचा विचार केला जाईल, असे आश्वासन जावडेकर यांनी दिले.