शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

संवेदनशील क्षेत्राबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या

By admin | Updated: October 21, 2015 00:55 IST

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २१३३ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट होत आहेत. त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे,

घोडेगाव : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २१३३ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट होत आहेत. त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ईएसएचा (इको सेन्सिटिव्ह एरिया) अंतिम मसुदा जाहीर होण्यापूर्वी या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडचणी, बंदी नसणाऱ्या कामांना नियम लावून परवानगी देण्याची कायदेशीर प्रक्रिया; तसेच हे क्षेत्र ठरविण्यासाठी आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना कुठेही विचारात घेतलेले नाही, याचा अंतिम मसुदा जाहीर होण्यापूर्वी लोकप्रतिनिधींचे म्हणणे समजून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पश्चिम घाटाचा दुसरा मसुदा जाहीर झाला आहे. या मसुद्यावर हरकती नोंदविण्यासाठी २ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून याला मुदतवाढ मिळावी, हरकती नोंदविण्यासाठी हा मसुदा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या ६ राज्यांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध व्हावा. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच सगळ्यांना विश्वासात घेतले जावे, अशी अपेक्षा वळसे-पाटील यांनी व्यक्त केली. सर्व बाबींचा विचार करू : जावडेकर‘इको सेन्सेटिव्ह एरिया’चा सहा राज्यांवर याचा काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रात काय परिस्थिती राहील, याविषयी पवार व वळसे-पाटील यांनी जावडेकर यांना माहिती दिली. यावर गांभीर्याने विचार करू. अंतिम अधिसूचना जाहीर करण्यापूर्वी या सूचना व बदलांचा विचार केला जाईल, असे आश्वासन जावडेकर यांनी दिले.