शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी जाण्यासाठी २८ दिवसांत दोन डोस घेणाऱ्यांनो काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST

पुणे : नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाणार असलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी केंद्र शासनाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर ...

पुणे : नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाणार असलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी केंद्र शासनाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या नागरिकांना कोविशिल्डचे दोन डोस २८ दिवसांच्या फरकाने देता येतील, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, चार आठवड्यांत दुसरा डोस दिल्यास प्रतिपिंड (अँटिबॉडी) विकसित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे कोरोनापासून पूर्ण संरक्षण मिळू शकणार नाही, असा धोका डॉक्टरांनी वर्तवला आहे.

कोविशिल्डचा दुसरा डोस बारा ते सोळा आठवड्यांनी घेतला तर तो अधिक प्रभावी ठरतो, असे केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केले. मात्र, परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही अट पुन्हा शिथिल करण्यात आली. दुसरा डोस ८४ दिवसांनी घेतल्यास लसीची परिणामकारकता आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले. मात्र, परदेशी जाणाऱ्या नागरिकांना चार ते सहा आठवड्यांत दुसरा डोस दिल्यास अँटिबॉडी विकसित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे त्यांना कोरोनापासून मिळणारे संरक्षणही कमी होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारतातील विद्यार्थी मुख्यतः अमेरिका, युरोप या देशांमध्ये जातात. तेथील अभ्यासक्रम ऑगस्टमध्ये सुरू होतात. त्यानुसार, लसीकरणाचे वेळापत्रक आखावे लागणार आहे.

कोव्हॅक्सिन लस घेतल्यास काय?

कोव्हॅक्सिन लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे परदेशात जाणाऱ्यांनी ही लस घेतली तर त्यांना परदेशात जाण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. दुसऱ्या देशात जाण्यापूर्वी ४८ तास आधी त्यांना आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवावा लागेल. संबंधित देशातील नियमानुसार क्वारंटाइन व्हावे लागू शकते. त्यामुळे परदेशात जाणाऱ्यांना कोविशिल्ड लसच द्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

चौकट

“दोन डोसमधील अंतर बारा आठवड्यांचे असल्यास अँटिबॉडी दुपटीने वाढतात आणि लसीची परिणामकारकता ९० टक्क्यांपर्यंत पोहचते. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार, २८ दिवसांनी दुसरा डोस दिल्यास परिणामकारकता १५-२० टक्क्यांनी कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार पहिल्या डोसनंतर ७० टक्के अँटिबॉडी विकसित होतात. दुसऱ्या बूस्टर डोसनंतर हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढते. त्यामुळे कोरोनापासून पूर्ण संरक्षण मिळवायचे तर दोन डोसमधील अंतर पुरेसे असायला हवे.”

- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ

चौकट

“कोविशिल्ड लसीचे दोन डोसमधील अंतर कमी करणे वैद्यकीय दृष्टीने योग्य नाही. दोन डोसमध्ये दहा ते बारा आठवड्यांचे अंतर असल्यास लसीची परिणामकारकता वाढत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ जानेवारीपासून सांगताहेत. आपल्याकडे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उशिरा सुरू झाले. ते मार्चमध्येच सुरू होणे अपेक्षित होते. त्यानुसार लसीचा दुसरा डोस घेऊन ऑगस्ट महिन्यापर्यंत विद्यार्थी परदेशी जाऊ शकले असते.”

- डॉ. विजय नटराजन, वैद्यकीय संचालक