आंबेठाण : २००८मध्ये झालेल्या डाऊ कंपनीविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांवरील विविध गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, यासाठी शिंदे (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे निवेदन दिले आहे.फडणवीस खेड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. वासुली फाटा येथे ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. शिंदे येथील ग्रामस्थांनी २५ जुलै २००८ रोजी वारकऱ्यांबरोबर आंदोलन केले होते. या आंदोलनातूनच ४४ लोकांवर चाकण पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल केले होते. नंतरच्या काळात या कंपनीला ग्रामस्थ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी ही कंपनी उभारण्याचे रद्द केले होते; परंतु लोकांवर दाखल केलेले गुन्हे तसेच होते. यापूर्वीच्या शासनाने हे गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केले होते; पण त्यावर पुढे काहीही कार्यवाही झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुन्हे दाखल असल्याने नागरिकांना न्यायालयात हजर राहावे लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, यातून त्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच, हे आंदोलने जाणीवपूर्वक केले नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.यासाठी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे-पाटील यांनी सांगितले.या वेळी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार संजय भेगडे, भाजपानेते शरद बुट्टे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा ठाकर, सुनील देवकर, विठ्ठलतात्या पानमंद, शांताराम पानमंद, सचिन देवकर, नीलेश पानमंद, दत्तात्रय टेमगिरे, राजाराम पानमंद, उत्तम पानमंद, अंकुश घनवट, विनायक पानमंद आंदोलक उपस्थित होते. (वार्ताहर)
डाऊ आंदोलनातील गुन्हे मागे घ्या
By admin | Updated: June 23, 2016 02:10 IST