शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

डाऊ आंदोलनातील गुन्हे मागे घ्या

By admin | Updated: June 23, 2016 02:10 IST

२००८मध्ये झालेल्या डाऊ कंपनीविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांवरील विविध गुन्हे शासनाने मागे घ्यावेत

आंबेठाण : २००८मध्ये झालेल्या डाऊ कंपनीविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांवरील विविध गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, यासाठी शिंदे (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे निवेदन दिले आहे.फडणवीस खेड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. वासुली फाटा येथे ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. शिंदे येथील ग्रामस्थांनी २५ जुलै २००८ रोजी वारकऱ्यांबरोबर आंदोलन केले होते. या आंदोलनातूनच ४४ लोकांवर चाकण पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल केले होते. नंतरच्या काळात या कंपनीला ग्रामस्थ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी ही कंपनी उभारण्याचे रद्द केले होते; परंतु लोकांवर दाखल केलेले गुन्हे तसेच होते. यापूर्वीच्या शासनाने हे गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केले होते; पण त्यावर पुढे काहीही कार्यवाही झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुन्हे दाखल असल्याने नागरिकांना न्यायालयात हजर राहावे लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, यातून त्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच, हे आंदोलने जाणीवपूर्वक केले नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.यासाठी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे-पाटील यांनी सांगितले.या वेळी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार संजय भेगडे, भाजपानेते शरद बुट्टे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा ठाकर, सुनील देवकर, विठ्ठलतात्या पानमंद, शांताराम पानमंद, सचिन देवकर, नीलेश पानमंद, दत्तात्रय टेमगिरे, राजाराम पानमंद, उत्तम पानमंद, अंकुश घनवट, विनायक पानमंद आंदोलक उपस्थित होते. (वार्ताहर)