शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

घुमानची विमानवारी अधांतरीच

By admin | Updated: January 19, 2015 23:29 IST

घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठा गाजावाजा करून आखण्यात आलेली ‘विमानवारी’ची आशा धूसर होण्याचे संकेत मिळाले आहेत.

नम्रता फडणीस : पुणेघुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठा गाजावाजा करून आखण्यात आलेली ‘विमानवारी’ची आशा धूसर होण्याचे संकेत मिळाले आहेत. ज्या एअर कंपनीशी संमेलनाच्या आयोजकांची बोलणी सुरू होती, त्याच्यांशी सवलतीच्या दरात विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे ‘आकडे’च जुळत नसल्याने ही सेवा रद्द करण्याचा विचार आयोजक करीत आहेत. त्यामुळे पुण्याहून अमृतसरला भरारी घेणारे हे विमान ‘टेकआॅफ’ होण्यापूर्वीच जवळपास ‘लँडिंग’ झाल्याचे एका अर्थाने स्पष्ट झाले आहे. यंदा साहित्य संमेलन घुमानसारख्या लांब पल्ल्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्यामुळे रसिकांना संमेलनाकडे आकर्षित करण्यासाठी संमेलनाच्या इतिहासात प्रथमच आयोजकांकडून विशेष रेल्वे व पुणे ते अमृतसर विमानसेवा उपलब्ध करून देण्याचा घाट घालण्यात आला. यात रेल्वेसेवेला हिरवा कंदील मिळाला असला, तरी विमानसेवा सवलतीच्या दरात देण्याचे आयोजकांचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीने ‘गो एअर’ या विमान कंपनीकडे सवलतीच्या दरात विमानसेवा रसिकांना देण्यात यावी, यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, या विमान कंपनीने जाण्या-येण्याकरिता ३५ हजार रुपये दर सांगितला असून, तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शुल्क कमी करण्यास कंपनी तयार नाही. त्यामुळे अपरिहार्यतेमुळे ही विमानसेवा रद्द करावी लागणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तरीही, ३ महिने आधी ६० ते ७० रसिकांनी पुणे-दिल्ली-अमृतसर विमानसेवेचे वैयक्तिक बुकिंग केले असल्याचेही ते म्हणाले. ४अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यंदा महाराष्ट्रातून आलेल्या निमंत्रणांना बगल देत संमेलन खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक करण्यासाठी पंजाबमधील ‘घुमान’ या संत नामदेवांच्या कर्मभूमीत हे साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित केले. ४या महामंडळाच्या निर्णयावर साहित्य वर्तुळातून टीकेची झोडही उठली. त्या भागात मराठी भाषकांची संख्या कमी असल्यामुळे ग्रंथविक्री होणार नसल्याचे सांगून प्रकाशकांनी नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे संमेलनाला नक्की किती मराठी भाषक जाणार, हे अजून कोडेच आहे. तरीही संमेलनाला ७ ते ८ हजार रसिक येतील, असा दावा आयोजक करीत आहेत. ४रेल्वेने अमृतसरला जाण्यासाठी तब्बल दोन दिवस लागत असल्यामुळे अनेक जण सवलतीच्या दरातील विमानसेवेचा लाभ घेण्याचे नियोजन करीत होते; मात्र विमानसेवाच रद्द झाल्यामुळे त्याचा काहीअंशी संमेलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.