शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Neelam Gorhe : "लॉकडाऊनची घोषणा झाली अन् लोकांच्या मनात अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 20:02 IST

Neelam Gorhe : फ्लेम युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या 'survival of migrants in crisis' अहवालाचे प्रकाशन नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ऑनलाइनच्या माध्यमातून करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोनाामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितिबाबत नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केले.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या टाळेबंदीचा शहरी भागाचा कणा असलेल्या स्थलांतरित मजूर लोकांवर शारीरिक, आर्थिक आणि मानसिकरित्या कसे परिणाम झाले, याचे सविस्तर निरीक्षण फ्लेम युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या 'survival of migrants in crisis' अहवालात मांडण्यात आले आहेत. सदर अहवालाचे प्रकाशन नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ऑनलाइनच्या माध्यमातून करण्यात आले. या अहवालाचे प्रकाशन करताना नीलम गोऱ्हे यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले. (The 'Survival of Migrants in Crisis' report prepared by Flame University was published online by Neelam Gorhe)

कोरोनाामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितिबाबत नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केले. ज्यावेळी हे संकट आले, त्यावेळी जगातील कोणतेही सरकार, अशासकीय संस्था या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार नव्हत्या. भारतातील मागच्या चार पाच पिढ्यांनी महायुद्धही पाहिले नाही. त्यामुळे सर्वांसाठीच हे संकट नवीन होते. मध्यमवर्ग लोकांच्या हातात पुरेसा पैसा आल्यामुळे लोकांचे राहणीमान उंचावले होते.  सुशिक्षित उच्च श्रीमंतात एक प्रकारचा चंगळवाद लोकांमध्ये बळावला होता आणि अचानक वर्षभरापूर्वी २२ मार्चला केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. अशा परिस्थितीत लोकांच्या मनामध्ये अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले. लोक आपल्या जीवनावश्यक वस्तूचा साठा करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा केली व त्वरित लोकांना दिलासा दिला, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर स्थलांतरित कामगारांना ट्रेन कधी सुरू होतील, याची आस लागली होती. लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना बऱ्याच आर्थिक, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. असंघटित लोकांच्या हक्कांबद्दल सरकारकडून काय करणे शक्य आहे, याबद्दल आमचे प्रयत्न सुरू आहेत. असंघटित कामगारांची माहिती तयार करण्याबाबत मी या आधीही पुणे महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत असेही नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. तसेच, कोरोना काळात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांशी स्थलांतरित मजुरांच्या समस्यांबाबत चर्चा केली व त्यांच्या जेवणाची व निवासाची सोय करण्याबाबत त्यांना आदेश दिले. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी या काळात उल्लेखनीय काम केले आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

याचबरोबर, कोरोनाच्या काळातही स्थलांतरित मजूर जे आपापल्या गावी गेले त्यांच्यासाठी ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नव्हता. म्हणून शासनाची रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याबाबत रोजगार हमीचे मंत्री व शासकीय वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर अनेक बैठक घेतल्या व कामे सुरू करण्याच्या निर्देश दिले. राज्य सरकारच्या कामातून रोजगार हमी कामावर वीस लक्ष लोकांना रोजगार मिळाला. त्यातील  60 ते 70 टक्के या महिला होत्या. असंघटित कामगारांसाठी सरकारने कोणत्या विविध योजना सुरू करायचा  याबद्दल एक शिफारसी तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आम्ही चार ते पाच विभागांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करत आहोत अशी माहितीही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दिली. दरम्यान, स्थलांतरित मजुरांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल डॉ.शिवकुमार जलोद, डॉ.शलाका शहा आणि श्री.चैतन्य रवी यांनीही यावेळी त्यांची निरीक्षणे सादर केली.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या