शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वाधार योजनेचा २ हजार ५०८ विद्यार्थ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

पुणे: राज्यातील सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब ...

पुणे: राज्यातील सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ राबविली जात आहे. या योजनेंअंतर्गत २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात पुणे विभागातील २ हजार ५०८ अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण १० कोटी ४६ लाख ७५ हजार जमा झाले,असे पुणे विभागीय प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी सांगितले.

स्वाधार योजनेसाठी पुणे विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी एकुण २ हजार ५०८ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.त्यात पुणे जिल्ह्यातील १ हजार ३९१, साता-यातील ११०, सांगलीमधील २६०, सोलापूर येथील २८४ आणि कोल्हापूरमधील ४६३ विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे.इयत्ता अकरावी,बारावी आणि बारावीनंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांसाठी 2017 पासून ही योजना राबविली जात आहे.

राज्यात सामाजिक न्याय विभाग अंतर्गत ४४१ शासकीय वसतीगृहे चालविली जात असून त्यात २३४ मुलींची तर २०७ मुलांची वसतीगृहे आहेत. दोन्ही वसतीगृहातील विद्यार्थी मान्य संख्या ४१ हजार ४८० आहे. परंतु,राज्यात दिवसेंदिवस व्यवसायिक, बिगर व्यवसायिक महाविदयालयांची संख्या वाढत आहे. त्यात शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने ‘स्वाधार योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेनुसार विद्यार्थ्यांना भोजन ,निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाते.

पुणे, पिंपरी चिंचवड , या ठिकाणी शिक्षण घेण्या-या विद्याथ्यांनासाठी प्रतिवर्ष ६० हजार रुपये, क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांनासाठी प्रतिवर्ष ५१ हजार रुपये तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ४३ हजार रुपये रक्कम दिली जाते.सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सोळंकी यांनी केले आहे.