शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

स्वाधार योजनेचा २ हजार ५०८ विद्यार्थ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

पुणे: राज्यातील सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब ...

पुणे: राज्यातील सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ राबविली जात आहे. या योजनेंअंतर्गत २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात पुणे विभागातील २ हजार ५०८ अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण १० कोटी ४६ लाख ७५ हजार जमा झाले,असे पुणे विभागीय प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी सांगितले.

स्वाधार योजनेसाठी पुणे विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी एकुण २ हजार ५०८ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.त्यात पुणे जिल्ह्यातील १ हजार ३९१, साता-यातील ११०, सांगलीमधील २६०, सोलापूर येथील २८४ आणि कोल्हापूरमधील ४६३ विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे.इयत्ता अकरावी,बारावी आणि बारावीनंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांसाठी 2017 पासून ही योजना राबविली जात आहे.

राज्यात सामाजिक न्याय विभाग अंतर्गत ४४१ शासकीय वसतीगृहे चालविली जात असून त्यात २३४ मुलींची तर २०७ मुलांची वसतीगृहे आहेत. दोन्ही वसतीगृहातील विद्यार्थी मान्य संख्या ४१ हजार ४८० आहे. परंतु,राज्यात दिवसेंदिवस व्यवसायिक, बिगर व्यवसायिक महाविदयालयांची संख्या वाढत आहे. त्यात शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने ‘स्वाधार योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेनुसार विद्यार्थ्यांना भोजन ,निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाते.

पुणे, पिंपरी चिंचवड , या ठिकाणी शिक्षण घेण्या-या विद्याथ्यांनासाठी प्रतिवर्ष ६० हजार रुपये, क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांनासाठी प्रतिवर्ष ५१ हजार रुपये तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ४३ हजार रुपये रक्कम दिली जाते.सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सोळंकी यांनी केले आहे.