शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

.... अन उलगडले असामान्य व्यक्तिमत्वांचे अलौकिक पैलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 17:12 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र सैन्याची निर्मिती आणि महात्मा गांधीच्या दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा हे सर्व एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व उलगडत गेले.

ठळक मुद्दे‘गोल्डन हेरीटेज संस्कारमाला’ या चार दिवसीय व्याख्यानमालेचे निमित्त

पुणे : ’ आग्र्याहून सुटका’ हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचा आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीला कलाटणी देणारा प्रसंग, लोकमान्य टिळकांनी ज्ञानहेतू व कर्महेतू या जीवनध्येयामधील प्राधान्यक्रम कसा ठरवला आणि ती साध्य करण्यासाठी वेळेचे आणि माणसांचे व्यवस्थापन, तणाव आणि भावनांचे नियोजन कसे केले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केवळ दोन वर्षात अर्धे जग पालथे घालूनसशस्त्र सैन्याची निर्मिती कशी केली आणि महात्मा गांधींनी दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा काय होती, अशा एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व पुणेकर रसिकांसमोर उलगडत गेले.इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यातर्फे ‘गोल्डन हेरीटेज संस्कारमाला’ या चार दिवसीय व्याख्यानमालेचे निमित्त होते. या कार्यक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजीमहाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील काही प्रमुख प्रसंगांचे सखोल विवेचन करताना उपस्थितांना या व्यक्तींच्या गुणवैशिष्ट्यांची ओघवत्या शैलीत ओळख करून दिली.लोकमान्य टिळकांनी त्यांच्या जीवनात, संशोधक, राजकीय पुढारी, विचारवंत अशा वेगवेगळ्या भूमिकांमधील समन्वय कसा साधला हे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उपस्थितांना उलगडून दाखवले. शिवाजीमहाराजांचे धैर्य, परिस्थितीचा सर्वंकष केलेला अभ्यास, वेळेचा आणि पयार्यांचा सुयोग्य वापर, उद्दिष्टांप्रत असलेली निष्ठा, समविचारी माणसांची निर्माण केलेली व्यवस्था आणि संवादमार्ग यामुळे ते या आपत्तीचा यशस्वी सामना करू शकले. या प्रसंगाला उदाहरण म्हणून घेत डॉ. नाडकर्णी यांनी शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सर्वांसमोर मांडले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वगुण, जागतिक स्तरावरील राजकारण हाताळण्याचे कौशल्य, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि त्यासाठी वैयक्तिक सुुखांचा केलेला त्याग या व्यक्तिमत्व विशेषांचे दर्शन घडते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या दैदिप्यमान कालखंडाची एकहाती उभारणी करणा-या नेताजींच्या गुणवैशिष्ट्यांचा डॉ. नाडकर्णी यांनी वेध घेतला. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मैलाचा दगड आहे. सर्व जगात नोंद घेतल्या गेलेल्या या सत्याग्रहामागील गांधीजींची व्यावहारिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचारमंथन, सत्याग्रहाचे नियोजन, अंमलबजावणी, मिळालेला प्रतिसाद आणि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीवर त्याचे झालेले दूरगामी परिणाम याबद्दल डॉ. नाडकर्णी यांनी विवेचन केले.  राष्ट्रगीताने या व्याख्यानमालेचा समारोप झाला.

टॅग्स :PuneपुणेNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahatma Gandhiमहात्मा गांधी