शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

.... अन उलगडले असामान्य व्यक्तिमत्वांचे अलौकिक पैलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 17:12 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र सैन्याची निर्मिती आणि महात्मा गांधीच्या दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा हे सर्व एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व उलगडत गेले.

ठळक मुद्दे‘गोल्डन हेरीटेज संस्कारमाला’ या चार दिवसीय व्याख्यानमालेचे निमित्त

पुणे : ’ आग्र्याहून सुटका’ हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचा आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीला कलाटणी देणारा प्रसंग, लोकमान्य टिळकांनी ज्ञानहेतू व कर्महेतू या जीवनध्येयामधील प्राधान्यक्रम कसा ठरवला आणि ती साध्य करण्यासाठी वेळेचे आणि माणसांचे व्यवस्थापन, तणाव आणि भावनांचे नियोजन कसे केले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केवळ दोन वर्षात अर्धे जग पालथे घालूनसशस्त्र सैन्याची निर्मिती कशी केली आणि महात्मा गांधींनी दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा काय होती, अशा एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व पुणेकर रसिकांसमोर उलगडत गेले.इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यातर्फे ‘गोल्डन हेरीटेज संस्कारमाला’ या चार दिवसीय व्याख्यानमालेचे निमित्त होते. या कार्यक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजीमहाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील काही प्रमुख प्रसंगांचे सखोल विवेचन करताना उपस्थितांना या व्यक्तींच्या गुणवैशिष्ट्यांची ओघवत्या शैलीत ओळख करून दिली.लोकमान्य टिळकांनी त्यांच्या जीवनात, संशोधक, राजकीय पुढारी, विचारवंत अशा वेगवेगळ्या भूमिकांमधील समन्वय कसा साधला हे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उपस्थितांना उलगडून दाखवले. शिवाजीमहाराजांचे धैर्य, परिस्थितीचा सर्वंकष केलेला अभ्यास, वेळेचा आणि पयार्यांचा सुयोग्य वापर, उद्दिष्टांप्रत असलेली निष्ठा, समविचारी माणसांची निर्माण केलेली व्यवस्था आणि संवादमार्ग यामुळे ते या आपत्तीचा यशस्वी सामना करू शकले. या प्रसंगाला उदाहरण म्हणून घेत डॉ. नाडकर्णी यांनी शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सर्वांसमोर मांडले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वगुण, जागतिक स्तरावरील राजकारण हाताळण्याचे कौशल्य, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि त्यासाठी वैयक्तिक सुुखांचा केलेला त्याग या व्यक्तिमत्व विशेषांचे दर्शन घडते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या दैदिप्यमान कालखंडाची एकहाती उभारणी करणा-या नेताजींच्या गुणवैशिष्ट्यांचा डॉ. नाडकर्णी यांनी वेध घेतला. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मैलाचा दगड आहे. सर्व जगात नोंद घेतल्या गेलेल्या या सत्याग्रहामागील गांधीजींची व्यावहारिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचारमंथन, सत्याग्रहाचे नियोजन, अंमलबजावणी, मिळालेला प्रतिसाद आणि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीवर त्याचे झालेले दूरगामी परिणाम याबद्दल डॉ. नाडकर्णी यांनी विवेचन केले.  राष्ट्रगीताने या व्याख्यानमालेचा समारोप झाला.

टॅग्स :PuneपुणेNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahatma Gandhiमहात्मा गांधी