शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

ऊन्हाचा कडाका कायम

By admin | Updated: April 9, 2017 00:15 IST

राज्यात उष्णतेचा कहर सुरुच असून सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला.

पुणे/नागपूर : राज्यात उष्णतेचा कहर सुरुच असून सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. पुढील २४ तासांत उष्णतेची लाट कायम राहून दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ गेल्या काही दिवसात मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात घट झाली होती़ आता पुन्हा पारा चाळीशीकडे वेगाने जाऊ लागला आहे़ उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान वाढत असताना किमान तापमानात मात्र घट होताना दिसत आहे़ राज्यातील किमान १५ मोठ्या शहरातील पारा चाळीसपेक्षा अधिक होता़ सर्वाधिक झळ विदर्भाला बसली असून कडाक्याच्या उन्हाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील श्रीरामनगर, गजशहेदा येथे राजेंद्र चरपे (४७) या मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्याला मालकाने परतवाडा येथील श्रीरामनगरातील खुला भूखंड साफ करण्यासाठी सकाळी ७.३० वाजता पाठविले. रात्री जेवण केले नसल्याने काम करीत असताना भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला. लोकांना निदर्शनास येताच त्यांनी परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३ अंश तर आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३़७ अंश नोंदविले गेले़ प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८़७, अहमदनगर ४०़२, जळगाव ३८़८, कोल्हापूर ३८़६़, महाबळेश्वर ३४़५, मालेगाव ४०, नाशिक ३८़१, सांगली ४०़१, सातारा ३९़१, सोलापूर ४१़५़, मुंबई ३२, अलिबाग ३१़७, रत्नागिरी ३३, वेंगुर्ला ३५़१, डहाणू ३२़२, भिरा ४१, उस्मानाबाद ३९़६, औरंगाबाद ३८, परभणी ४०़९, अकोला ४०़५, अमरावती ४०़२, ब्रम्हपुरी ४३़, चंद्रपूर ४२़२, गोंदिया ४१़६, नागपूर ४२़७, वाशिम ३९़२, वर्धा ४२, यवतमाळ ४०़५़ (लोकमत न्यूज नेटवर्क)विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारायेत्या २४ तासांत उत्तर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राने वर्तविली आहे. अशावेळी गहू पीक काढणीस विलंब केल्यास उत्पादन घटते. त्यामुळे गहू पिकाची काढणी त्वरित करावी, तसेच फळबाग व भाजीपाला पिकांना वारंवार हलके ओलीत करावा, असा सल्लाही दिला आहे.