शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
4
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
5
मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
6
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
7
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
8
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
9
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
10
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
11
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
12
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
13
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
14
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
15
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
16
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
17
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
18
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
19
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
20
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
Daily Top 2Weekly Top 5

ऊन्हाचा कडाका कायम

By admin | Updated: April 9, 2017 00:15 IST

राज्यात उष्णतेचा कहर सुरुच असून सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला.

पुणे/नागपूर : राज्यात उष्णतेचा कहर सुरुच असून सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. पुढील २४ तासांत उष्णतेची लाट कायम राहून दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ गेल्या काही दिवसात मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात घट झाली होती़ आता पुन्हा पारा चाळीशीकडे वेगाने जाऊ लागला आहे़ उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान वाढत असताना किमान तापमानात मात्र घट होताना दिसत आहे़ राज्यातील किमान १५ मोठ्या शहरातील पारा चाळीसपेक्षा अधिक होता़ सर्वाधिक झळ विदर्भाला बसली असून कडाक्याच्या उन्हाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील श्रीरामनगर, गजशहेदा येथे राजेंद्र चरपे (४७) या मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्याला मालकाने परतवाडा येथील श्रीरामनगरातील खुला भूखंड साफ करण्यासाठी सकाळी ७.३० वाजता पाठविले. रात्री जेवण केले नसल्याने काम करीत असताना भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला. लोकांना निदर्शनास येताच त्यांनी परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३ अंश तर आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३़७ अंश नोंदविले गेले़ प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८़७, अहमदनगर ४०़२, जळगाव ३८़८, कोल्हापूर ३८़६़, महाबळेश्वर ३४़५, मालेगाव ४०, नाशिक ३८़१, सांगली ४०़१, सातारा ३९़१, सोलापूर ४१़५़, मुंबई ३२, अलिबाग ३१़७, रत्नागिरी ३३, वेंगुर्ला ३५़१, डहाणू ३२़२, भिरा ४१, उस्मानाबाद ३९़६, औरंगाबाद ३८, परभणी ४०़९, अकोला ४०़५, अमरावती ४०़२, ब्रम्हपुरी ४३़, चंद्रपूर ४२़२, गोंदिया ४१़६, नागपूर ४२़७, वाशिम ३९़२, वर्धा ४२, यवतमाळ ४०़५़ (लोकमत न्यूज नेटवर्क)विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारायेत्या २४ तासांत उत्तर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राने वर्तविली आहे. अशावेळी गहू पीक काढणीस विलंब केल्यास उत्पादन घटते. त्यामुळे गहू पिकाची काढणी त्वरित करावी, तसेच फळबाग व भाजीपाला पिकांना वारंवार हलके ओलीत करावा, असा सल्लाही दिला आहे.