शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ऊन्हाचा कडाका कायम

By admin | Updated: April 9, 2017 00:15 IST

राज्यात उष्णतेचा कहर सुरुच असून सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला.

पुणे/नागपूर : राज्यात उष्णतेचा कहर सुरुच असून सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. पुढील २४ तासांत उष्णतेची लाट कायम राहून दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ गेल्या काही दिवसात मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात घट झाली होती़ आता पुन्हा पारा चाळीशीकडे वेगाने जाऊ लागला आहे़ उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान वाढत असताना किमान तापमानात मात्र घट होताना दिसत आहे़ राज्यातील किमान १५ मोठ्या शहरातील पारा चाळीसपेक्षा अधिक होता़ सर्वाधिक झळ विदर्भाला बसली असून कडाक्याच्या उन्हाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील श्रीरामनगर, गजशहेदा येथे राजेंद्र चरपे (४७) या मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्याला मालकाने परतवाडा येथील श्रीरामनगरातील खुला भूखंड साफ करण्यासाठी सकाळी ७.३० वाजता पाठविले. रात्री जेवण केले नसल्याने काम करीत असताना भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला. लोकांना निदर्शनास येताच त्यांनी परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३ अंश तर आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३़७ अंश नोंदविले गेले़ प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८़७, अहमदनगर ४०़२, जळगाव ३८़८, कोल्हापूर ३८़६़, महाबळेश्वर ३४़५, मालेगाव ४०, नाशिक ३८़१, सांगली ४०़१, सातारा ३९़१, सोलापूर ४१़५़, मुंबई ३२, अलिबाग ३१़७, रत्नागिरी ३३, वेंगुर्ला ३५़१, डहाणू ३२़२, भिरा ४१, उस्मानाबाद ३९़६, औरंगाबाद ३८, परभणी ४०़९, अकोला ४०़५, अमरावती ४०़२, ब्रम्हपुरी ४३़, चंद्रपूर ४२़२, गोंदिया ४१़६, नागपूर ४२़७, वाशिम ३९़२, वर्धा ४२, यवतमाळ ४०़५़ (लोकमत न्यूज नेटवर्क)विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारायेत्या २४ तासांत उत्तर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राने वर्तविली आहे. अशावेळी गहू पीक काढणीस विलंब केल्यास उत्पादन घटते. त्यामुळे गहू पिकाची काढणी त्वरित करावी, तसेच फळबाग व भाजीपाला पिकांना वारंवार हलके ओलीत करावा, असा सल्लाही दिला आहे.