शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

उकाड्याने उन्हाळ्याची चाहूूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर मध्य महाराष्ट व लगतच्या भागात चक्रीय चक्रवात कायम आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तर मध्य महाराष्ट व लगतच्या भागात चक्रीय चक्रवात कायम आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्टावरील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता उत्तर केरळ किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. याचा परिणाम राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले असून रविवारी सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. रविवारी सायंकाळी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ३५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्याचवेळी किमान तापमानातही सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले आहे. विदर्भाच्या बर्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

१६ फेबुवारी रोजी मराठवाडा व विदभार्त मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटा होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१७ फेब्रुवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१८ फेब्रुवारी रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बर्याच ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.