शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उन्हाचा तडाखा : भीमा नदीपात्र ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:12 IST

उन्हाचा तडाखा : चासकमान धरणातून पाणी सोडण्याची मागणी

चासकमान : चास (ता. खेड) दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाण्याचे होणारे बाष्पीभवन व पिण्यासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात येऊन नदीपात्र कोरडे ठणठणीत पडल्याने नदीअंतर्गत गावातील पाणी प्रश्न निर्माण झाला असून, चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भीमा नदीचे वाढत्या उन्हामुळे पात्र कोरडे ठणठणीत पडले असल्याने भीमा नदी अंतर्गत असलेल्या गावातील नळपाणी पुरवठ्याच्या योजना विस्कळीत झाल्याने गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, भीमा नदी अंतर्गत असलेल्या मोहकल, कमान, चास, आखरवाडी, नेहेरेशिवार, पाडळी, दोंदे, वडगाव आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना नदीपात्रातच पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहे. तसेच, भीमा नदीपात्रावर असणारा राजगुरुनगर येथील केदारेश्वरच्या बंधाºयावर राजगुरुनगर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. परंतु बंधाºयातील पाण्याने तळ गाठला असून, बंधाºयातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे राजगुरुनगर शहराला काही प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होऊ लागला असून पाण्याचा वास येऊनदुर्गधी पसरली आहे. परिणामी नागरिकांना पोटाचे विकार, आदी सह विविध आजार होऊ लागले आहे. यामुळे चासकमान धरणामधून भीमा नदीपात्रात तत्काळ पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणे