शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उन्हाचा तडाखा : भीमा नदीपात्र ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:12 IST

उन्हाचा तडाखा : चासकमान धरणातून पाणी सोडण्याची मागणी

चासकमान : चास (ता. खेड) दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाण्याचे होणारे बाष्पीभवन व पिण्यासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात येऊन नदीपात्र कोरडे ठणठणीत पडल्याने नदीअंतर्गत गावातील पाणी प्रश्न निर्माण झाला असून, चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भीमा नदीचे वाढत्या उन्हामुळे पात्र कोरडे ठणठणीत पडले असल्याने भीमा नदी अंतर्गत असलेल्या गावातील नळपाणी पुरवठ्याच्या योजना विस्कळीत झाल्याने गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, भीमा नदी अंतर्गत असलेल्या मोहकल, कमान, चास, आखरवाडी, नेहेरेशिवार, पाडळी, दोंदे, वडगाव आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना नदीपात्रातच पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहे. तसेच, भीमा नदीपात्रावर असणारा राजगुरुनगर येथील केदारेश्वरच्या बंधाºयावर राजगुरुनगर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. परंतु बंधाºयातील पाण्याने तळ गाठला असून, बंधाºयातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे राजगुरुनगर शहराला काही प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होऊ लागला असून पाण्याचा वास येऊनदुर्गधी पसरली आहे. परिणामी नागरिकांना पोटाचे विकार, आदी सह विविध आजार होऊ लागले आहे. यामुळे चासकमान धरणामधून भीमा नदीपात्रात तत्काळ पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणे