शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ऊस उत्पादकांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 14, 2016 01:57 IST

राज्यातील साखर कारखानदारी जोमाने सुरु झाली आहे. राज्यासह जिल्हयात उसाची कमतरता असल्याने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे, यात शंकाच नाही.

राज्यातील साखर कारखानदारी जोमाने सुरु झाली आहे. राज्यासह जिल्हयात उसाची कमतरता असल्याने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे, यात शंकाच नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप उसाचा पहिला हप्ता अजूनही जाहीर न केल्याने ऊस उत्पादकांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.पिढ्यान्पिढ्या ऊस उत्पादक शेतकरी हा कारखाने, राज्य शासन धोरण आणि पहिला हप्ता या चक्रव्यूहात अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या उसाला चांगला दर मिळत नाही. नशिबाने गेल्या एक वर्षापासून साखरेला चांगले दर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पैसे मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सन २०१३—१४ आणि २०१४—१५ या गळीत हंगामात साखरेचे दर नीचांकी पातळीवर गेले होते. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांच्या मदतीला अक्षरश: केंद्र सरकारला धावून यावे लागले होते. सन २०१३— १४ साली साखरेला २६०० रूपये प्रतिकिवंटल दर असताना राज्यात ६७५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्या वेळी केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांसाठी ६६०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज जाहीर केले होते. त्यावेळी राज्याच्या वाट्याला २२०० कोटी रूपये आले होते. त्यातून ऊस उत्पादकांना प्रति टनास ३०० रूपये मिळाले होते. त्याउलट सन २०१४-१५ च्या हंगामात साखरेचे दर २१०० रूपये एवढ्या नीचांकी पातळीवर आले. तर मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील ऊसगाळप २५५ लाख टनाने वाढून ते ९३० लाख टनांवर गेले. यावेळी केंद्राने मात्र राज्याच्या वाटयाला १८५० कोटी रूपयेच दिले होते. आज राज्यात ऊसाचे क्षेत्र घटले आहे. काही कारखाने दोन महिने चालतील ,तर काही ३ महिने सुरु राहतील. मात्र,अजूनही ऊस उत्पादकांना पहिली उचल किती मिळणार याची प्रतीक्षा आहे. गेल्या दिवाळीपासून साखरेला चांगले दर मिळू लागले आहेत.१९०० रूपये एवढ्या नीचांकी पातळीवर साखरेचे दर आल्याने साखर कारखानदारी कर्जाच्या खाईल गेली होती. मात्र, गेल्या वर्षभरात साखरेत तेजी राहिल्याने कारखानदारांसह ऊसउत्पादक समाधानी आहे. सध्या ३२०० ते ३३०० रूपये साखरेचे दर अजूनही वाढले असते. मात्र, नुकताच केंद्र सरकारने कोठ्याची मर्यादा ठरवून देत कारखान्यांना अधिक मिळण्याच्या आशेवर पाणी फिरविले. यामध्ये कारखान्यांनी सप्टेंबरअखेर ३७ टकके तर आॅकटोबरअखेर २४ टकके एवढीच साखर गोडावूनमध्ये ठेवता येईल असा आदेश काढला आहे. परिणामी भराभर वाढणारे दर आपोआप नियंत्रणात आले आहेत. गेल्या हंगामातही पैशांअभावी साखर कारखान्यांकडे पैसे नसल्याने एफआरपी ८०-२० च्या सूत्रानुसार दोन टप्प्यांत घ्यावी लागली. नुकतेच मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यावर येऊन गेले. मुख्यमंत्री चालू गळीत हंगामातील पहिल्या उचलीबाबत काही बोलतील, असे समजून ऊसउत्पादकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. राज्यभर ऊसदराचे आंदोलन करणारे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत आज राज्य शासनाशी हातमिळवणी करत नरमाईची भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांना ते विसरलेले दिसत आहेत. त्यामुळे पहिला हप्त्यासाठी आंदोलन करणारा शेतकऱ्यांचा नेताच नसल्याने कारखाने ‘लॉबी’ करून जो दर ठरवितील तो शेतकऱ्यांना घ्यावाच लागणार आहे. त्यांना वालीच नसल्याने या हंगामातही ऊसउत्पादक दराबाबत भरडला जाण्याची शक्यता आहे.