शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 14, 2016 01:57 IST

राज्यातील साखर कारखानदारी जोमाने सुरु झाली आहे. राज्यासह जिल्हयात उसाची कमतरता असल्याने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे, यात शंकाच नाही.

राज्यातील साखर कारखानदारी जोमाने सुरु झाली आहे. राज्यासह जिल्हयात उसाची कमतरता असल्याने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे, यात शंकाच नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप उसाचा पहिला हप्ता अजूनही जाहीर न केल्याने ऊस उत्पादकांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.पिढ्यान्पिढ्या ऊस उत्पादक शेतकरी हा कारखाने, राज्य शासन धोरण आणि पहिला हप्ता या चक्रव्यूहात अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या उसाला चांगला दर मिळत नाही. नशिबाने गेल्या एक वर्षापासून साखरेला चांगले दर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पैसे मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सन २०१३—१४ आणि २०१४—१५ या गळीत हंगामात साखरेचे दर नीचांकी पातळीवर गेले होते. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांच्या मदतीला अक्षरश: केंद्र सरकारला धावून यावे लागले होते. सन २०१३— १४ साली साखरेला २६०० रूपये प्रतिकिवंटल दर असताना राज्यात ६७५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्या वेळी केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांसाठी ६६०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज जाहीर केले होते. त्यावेळी राज्याच्या वाट्याला २२०० कोटी रूपये आले होते. त्यातून ऊस उत्पादकांना प्रति टनास ३०० रूपये मिळाले होते. त्याउलट सन २०१४-१५ च्या हंगामात साखरेचे दर २१०० रूपये एवढ्या नीचांकी पातळीवर आले. तर मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील ऊसगाळप २५५ लाख टनाने वाढून ते ९३० लाख टनांवर गेले. यावेळी केंद्राने मात्र राज्याच्या वाटयाला १८५० कोटी रूपयेच दिले होते. आज राज्यात ऊसाचे क्षेत्र घटले आहे. काही कारखाने दोन महिने चालतील ,तर काही ३ महिने सुरु राहतील. मात्र,अजूनही ऊस उत्पादकांना पहिली उचल किती मिळणार याची प्रतीक्षा आहे. गेल्या दिवाळीपासून साखरेला चांगले दर मिळू लागले आहेत.१९०० रूपये एवढ्या नीचांकी पातळीवर साखरेचे दर आल्याने साखर कारखानदारी कर्जाच्या खाईल गेली होती. मात्र, गेल्या वर्षभरात साखरेत तेजी राहिल्याने कारखानदारांसह ऊसउत्पादक समाधानी आहे. सध्या ३२०० ते ३३०० रूपये साखरेचे दर अजूनही वाढले असते. मात्र, नुकताच केंद्र सरकारने कोठ्याची मर्यादा ठरवून देत कारखान्यांना अधिक मिळण्याच्या आशेवर पाणी फिरविले. यामध्ये कारखान्यांनी सप्टेंबरअखेर ३७ टकके तर आॅकटोबरअखेर २४ टकके एवढीच साखर गोडावूनमध्ये ठेवता येईल असा आदेश काढला आहे. परिणामी भराभर वाढणारे दर आपोआप नियंत्रणात आले आहेत. गेल्या हंगामातही पैशांअभावी साखर कारखान्यांकडे पैसे नसल्याने एफआरपी ८०-२० च्या सूत्रानुसार दोन टप्प्यांत घ्यावी लागली. नुकतेच मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यावर येऊन गेले. मुख्यमंत्री चालू गळीत हंगामातील पहिल्या उचलीबाबत काही बोलतील, असे समजून ऊसउत्पादकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. राज्यभर ऊसदराचे आंदोलन करणारे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत आज राज्य शासनाशी हातमिळवणी करत नरमाईची भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांना ते विसरलेले दिसत आहेत. त्यामुळे पहिला हप्त्यासाठी आंदोलन करणारा शेतकऱ्यांचा नेताच नसल्याने कारखाने ‘लॉबी’ करून जो दर ठरवितील तो शेतकऱ्यांना घ्यावाच लागणार आहे. त्यांना वालीच नसल्याने या हंगामातही ऊसउत्पादक दराबाबत भरडला जाण्याची शक्यता आहे.