शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर घसरले, राज्य बँकही मूल्यांकनात घट करण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:37 IST

सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे.

सोमेश्वरनगर : सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. मागील महिन्यात साखरेच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण झाली आहे. ३२०० रुपये क्विंटलवर असणारे साखरेचे दर २९०० रुपयांवर आले आहेत.जानेवारीत साखरेच्या दरात घसरण झाली होती. त्या वेळी राज्य बँकेने मूल्यांकनही कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना आता एफआरपी देणेही कठीण बनले होते. या नंतर साखरदरात पुन्हा सुधारणा झाली होती. १२ फेब्रुवारी रोजी साखरेचे दर ३२०० रुपये क्विंटलवर होते. मात्र, महिन्याभरातच या दरात घसरण होत काल १५ मार्चला हे दर ३०० रुपयांनी खाली येत २९०० रुपयांवर आले. मागच्या वेळी साखर दर खाली आल्याने काही कारखान्यांनी तर जाहीर केलेल्या ऊसदरातही कपात करण्यास सुरुवात केल्याने साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. सगळेच साखर कारखाने उसाचा भाव कमी करतात की काय, अशी धास्ती ऊसउत्पापदकांनी घेतली आहे.नोव्हेंबर २०१७मध्ये बाजारातील साखरेचे दर ३ हजार ६०० रुपये क्विंटलवरून जानेवारीत २ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत घसरले होते. त्यामुळे राज्यातील साखर कारखाने पुन्हा एकदा शॉर्ट मार्जिनमध्ये जातात की काय, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहेत. साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ६०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत. साखर कारखाने सुरु होताना साखरेला ३ हजार ६००च्या आसपास दर होते. त्यामुळे राज्य बँक साखरेचेही चांगले मूल्यांकन करत होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत साखरेचे दर तब्बल ६०० रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बँकेनेही साखरेचे मूल्यांकन क्विंटलमागे ४०० रुपयांनी कमी केले. राज्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचेही बंपर उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने साखरेचे दर उतरले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या राज्य बँक साखर कारखान्याना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्के प्रमाणे २ हजार ६३५ रुपये उचल देत आहे. यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १ हजार ८८५ रुपये उरत आहेत. तर दुरीकडे यावर्षीची एफआरपी २ हजार ६४२ रुपयांच्या आसपास असल्याने ऊसउत्पादकांना देवायची रक्कम व उत्पादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशेब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ७५७ रुपये कमी पडत असल्याने ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागावणार? या चिंतेत कारखानदार सापडेल आहेत.सध्या साखर हंगाम सुरू आहे त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २ हजार ६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करत एफआरपी भागवावी लागली आहे.