शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर घसरले, राज्य बँकही मूल्यांकनात घट करण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:37 IST

सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे.

सोमेश्वरनगर : सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. मागील महिन्यात साखरेच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण झाली आहे. ३२०० रुपये क्विंटलवर असणारे साखरेचे दर २९०० रुपयांवर आले आहेत.जानेवारीत साखरेच्या दरात घसरण झाली होती. त्या वेळी राज्य बँकेने मूल्यांकनही कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना आता एफआरपी देणेही कठीण बनले होते. या नंतर साखरदरात पुन्हा सुधारणा झाली होती. १२ फेब्रुवारी रोजी साखरेचे दर ३२०० रुपये क्विंटलवर होते. मात्र, महिन्याभरातच या दरात घसरण होत काल १५ मार्चला हे दर ३०० रुपयांनी खाली येत २९०० रुपयांवर आले. मागच्या वेळी साखर दर खाली आल्याने काही कारखान्यांनी तर जाहीर केलेल्या ऊसदरातही कपात करण्यास सुरुवात केल्याने साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. सगळेच साखर कारखाने उसाचा भाव कमी करतात की काय, अशी धास्ती ऊसउत्पापदकांनी घेतली आहे.नोव्हेंबर २०१७मध्ये बाजारातील साखरेचे दर ३ हजार ६०० रुपये क्विंटलवरून जानेवारीत २ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत घसरले होते. त्यामुळे राज्यातील साखर कारखाने पुन्हा एकदा शॉर्ट मार्जिनमध्ये जातात की काय, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहेत. साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ६०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत. साखर कारखाने सुरु होताना साखरेला ३ हजार ६००च्या आसपास दर होते. त्यामुळे राज्य बँक साखरेचेही चांगले मूल्यांकन करत होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत साखरेचे दर तब्बल ६०० रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बँकेनेही साखरेचे मूल्यांकन क्विंटलमागे ४०० रुपयांनी कमी केले. राज्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचेही बंपर उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने साखरेचे दर उतरले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या राज्य बँक साखर कारखान्याना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्के प्रमाणे २ हजार ६३५ रुपये उचल देत आहे. यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १ हजार ८८५ रुपये उरत आहेत. तर दुरीकडे यावर्षीची एफआरपी २ हजार ६४२ रुपयांच्या आसपास असल्याने ऊसउत्पादकांना देवायची रक्कम व उत्पादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशेब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ७५७ रुपये कमी पडत असल्याने ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागावणार? या चिंतेत कारखानदार सापडेल आहेत.सध्या साखर हंगाम सुरू आहे त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २ हजार ६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करत एफआरपी भागवावी लागली आहे.